शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

कुणीतरी टाकेल का नजर रत्नागिरीतील १९० अंधांच्या डोळ्यांवर?

By admin | Updated: September 16, 2014 23:33 IST

२०१२-१३मध्ये जिल्ह्यातील ४ व्यक्तिंना नेत्रदानाचा लाभ.

मेहरुन नाकाडे- रत्नागिरी -मानवी शरीर महत्त्वाचे आहे. प्रत्येक अवयव हा तेवढाच अनमोल आहे. ज्यावेळी एखादा अवयव निकामी होतो किंवा तो नसतो, त्याचवेळी त्याचे महत्व कळून चुकते. सृष्टीची किमया पाहण्यासाठी मानवाला ‘डोळे’ लाभले आहेत. मात्र, ज्या व्यक्तिना डोळे नाहीत, त्याबाबत आपण कधी विचार केला आहे का? नेत्रदानामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सावरू शकते. धकाधकीच्या जीवनात व पारंपरिक विचारसरणी असणाऱ्या मंडळींमुळे कित्येकांना अंधारे आयुष्य जगावे लागत आहे. १६.१३ लाख लोकसंख्या असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील १९० अंध व्यक्ती दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत. ‘नेत्रदान श्रेष्ठदान’ संकल्पना घेऊन सन २०१२-१३ पासून जिल्ह्यात नेत्रदान मोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यातील ४ व्यक्तिंना नेत्रदानाचा लाभ मिळाला होता. २०१३-१४ मध्ये दोन, तर चालू वर्षात आतापर्यंत दोन अंध व्यक्तिंना नेत्रदानाचा लाभ मिळाला आहे. शासनाकडून नेत्रदानाची संकल्पना सर्वसामान्यांच्या मनात बिंबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामान्य नागरिक उत्साहात नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून देतात. परंतु संबंधित व्यक्तीचे निधन झाल्यानंतर मात्र त्याच्या कुटुंबातील सदस्य नेत्रदानासाठी आग्रही नसतात. बहुतेक वेळा विरोध करतात. त्यामुळे संकल्प करणारे हजारो असले तरी नेत्रदान करणारी मंडळी मात्र मोजकीच आहे. याबाबत सामाजिक संघटनांनी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. भारताचा विचार केला तर दहा लोक अंध आहे. कोणी नेत्रदान केले तर त्यांचेही आयुष्यात प्रकाश येणार आहे. दरवर्षी देशात एक कोटी लोक मृत्यू पावतात. मृत्यूचे प्रमाण लक्षात घेतले तर दृष्टीची मागणी शिल्लकच राहणार नाही. परंतु तसे होत नसल्यामुळेच हजारो अंध बांधव दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत. अपघात तसेच अन्य कारणांमुळे तरूण व्यक्ती अंधत्वाच्या शिकार झाल्याचे दिसते. अपघातात किंवा अन्य कारणांमुळे मृत झालेल्या तरूणांच्या कुटुंबांचे समुपदेशन करून त्यांचे डोळे दान केले गेले तर त्यांच्या आयुष्यात नक्कीच प्रकाश येईल. जिल्हा शासकीय रूग्णालयात नेत्रदान समुपदेशन गेली तीन वर्षे सुरू आहे. आतापर्यंत केवळ आठ लोकांनाच याचा लाभ मिळाला असला तरी अद्याप १९० अंध दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत.कसे करावे नेत्रदान ?मृत्यूनंतर ४ ते ५ तासांच्या कालावधीत मृत व्यक्तीचे डोळे नेत्रतज्ज्ञाकडून नेत्रपेढीत जमा करता येतात.कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्वरित नेत्रपेढीशी संपर्क साधावा.मृत व्यक्तीची संमती नसल्यासही नातेवाइकांच्या संमतीचे नेत्रदान करता येते.नेत्रदान केल्याने मृत व्यक्तिचा चेहरा विद्रुप होत नाही.मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यावर कापूस व बर्फ ठेवा.खोलीतील पंखा बंद ठेवा.नेत्रदान केलेले डोळे कधीच विकले जात नाहीत.१६.१३ लाख लोकसंख्या असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील १९० अंध व्यक्ती दृष्टीच्या प्रतीक्षेत.२०१२-१३मध्ये जिल्ह्यातील ४ व्यक्तिंना नेत्रदानाचा लाभ.आतापर्यंत जिल्ह्यात केवळ आठ लोकांनाच मिळाला लाभसामाजिक संघटनांमार्फत नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे.