शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

जीवनदायी योजना त्यांना लाभ कधी

By admin | Updated: September 18, 2014 23:21 IST

शिधापत्रिकाधारक : नवीनचा समावेश हवा

चिपळूण : राज्य शासनाने अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना वैद्यकीय खर्चात हातभार लाभला असला तरी शासनाने केवळ मार्च २०१३ पूर्वीच्या शिधापत्रिकाधारकांचा या योजनेच्या लाभार्थींमध्ये समावेश केला आहे. त्यानंतर शिधापत्रिका काढलेली लाखो कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहिली आहेत. या योजनेच्या लाभार्थींमध्ये मार्च २०१३ नंतरच्या नवीन शिधापत्रिकांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. राज्य शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी व नॅशनल इन्श्युरन्स कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार राज्यभरातील ३५ जिल्ह्यांमध्ये तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आठ, दुसऱ्या टप्प्यात २७ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. परंतु, शासनाने मार्च २०१३ पूर्वीच्या अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांचा समावेश लाभार्थींमध्ये केल्याने त्यानंतर तयार झालेल्या नवीन शिधापत्रिकाधारक या योजनेच्या लाभापासून वंचित राहात आहेत. राज्यातील अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये शासनातर्फे करण्यात आलेल्या करारानुसार ९७२ प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार व १२१ प्रकारच्या फेरतपासणी उपचारांचा लाभ घेता येत आहे. या योजनेमुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांवर अचानक पडणारा आजारपणातील खर्चाचा बोजा काही प्रमाणात कमी झाला आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ८ जिल्ह्यांतील ४९ लाख ३ हजार १४० कुटुंब, दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २७ जिल्ह्यांतील एकूण १ कोटी ५८ लाख ९१ हजार १५४ अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिकांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील करोडो लोकांच्या वैद्यकीय खर्चाची बचत होणार आहे. योजना अमलात आल्यापासून त्याअंतर्गत दिली जाणारी हेल्थ कार्ड अद्याप लाभार्थींना देण्याची प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अनेकजण या योजनेच्या लाभापासून वंचित राहात असल्याचे चित्र आहे. शासनाकडे प्रत्येक महिन्याला नवीन अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांची भर पडत असून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. आता या योजनेतील लाभार्थींपर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग बिकट होत आहे. (वार्ताहर)लाभार्थींपर्यंत पोहोचण्यास उशीर शासनाच्या अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी आजारात सहाय्य मिळण्याचा उद्देशसमाजातल्या विविध दुर्बल घटकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न.शिधापत्रिकाधारकांना लाभ वैद्यकीय खर्चाची बचत.या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला मिळावा, हा प्रमुख हेतू आहे. खासगी वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महागडी होत आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा हेतू मनात ठेवून पुढे आलेली ही योजना शिधापत्रिकांच्या समस्यांमुळे कठीण बनली आहे.