शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जामदा प्रकल्पग्रस्त मागणी रेटणार !

By admin | Updated: February 19, 2015 23:44 IST

ग्रामस्थ आक्रमक : पुनर्वसन उपजिल्हाधिकारी आज घेणार बैठक

राजापूर : शासनाच्या पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी राऊत यांच्या उपस्थितीत काजिर्डा गावी जामदा प्रकल्पाबाबत २० रोजी बैठक पार पडत असून, त्यामध्ये समस्य प्रकल्पग्रस्त हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रद्द करा, अशी मागणी रेटून धरणार आहेत. समस्त ग्रामस्थांना धर्मराज्य शेतकरी संघटनेचा भक्कम पाठींबा आहे.मागील १९ वर्षे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्या कालावधीत समाधानकारक काम मार्गी लागलेले नाही. पुनर्वसनाबाबत तर काहीच काम झालेले नाही. एकूणच ही प्रक्रियाच चुकीच्या पद्धतीने राबविली गेली, असा आरोप प्रकल्पग्रस्तातून करण्यात येत आहे. सुमारे ४१ कोटी खर्चाचा प्रकल्प ५१९ कोटींवर जाऊन पोहोचला. भूमी संपादन अधिनियमानुसार ८० टक्के ग्रामस्थांची संमती, ग्रामस्थांच्या जनसुनावणी व ठराव आवश्यक असतानाही, तसे काहीही न घडता मनमानीपणे लोकांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. त्यामुळे शासन जनतेला फसवत आहे. त्यामुळे मागील चार-पाच वर्षे प्रकल्पाचे काम पुनर्वसनावरुन स्थानिक ग्रामस्थांनी बंद पाडले होते. त्यामुळे संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी आता हा प्रकल्पच रद्द करा, अशी मागणी प्रजासत्ताक दिनी गावात पार पडलेल्या शेतकरी धर्मपरिषदेत केली होती.दरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकरवी लावलेल्या चौकशीत जामदा प्रकल्पाचा समावेश आहे. त्यामुळे दोलायमान स्थितीत सापडलेल्या या प्रकल्पातील पुनर्वसनाबाबत जिल्ह्याचे पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी राऊत हे २० फेब्रुवारीला काजिर्डा गावी जाऊन बैठक घेणार आहेत.यापूर्वी काजिर्डावासियांनी धर्मराज्य शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली पुनर्वसन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे आरोप प्रकल्पग्रस्तांमधून करण्यात आले होते. परिणामी उद्याच्या बैठकीत पुनर्वसनाचा विषय शासनाने सोडून द्यावा व हा प्रकल्पच कायमचा रद्द करावा, अशी मागणी बैठकीत रेटून धरणार आहेत, अशी माहिती काजिर्डा उपसरपंच अशोक आर्डे यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत काजिर्डा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, यासाठी धर्मराज्य शेतकरी संघटनेसह काजिर्डावासिय एकवटले आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत समस्त प्रकल्पग्रस्त कशा प्रकारे विरोध करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उपस्थित पुनर्वसनाचे उपजिल्हाधिकारी राऊत कोणती भूमिका घेतात, हा देखील महत्तवाचा मुद्दा ठरणार आहे. (प्रतिनिधी)