शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

जामदा प्रकल्पग्रस्त मागणी रेटणार !

By admin | Updated: February 19, 2015 23:44 IST

ग्रामस्थ आक्रमक : पुनर्वसन उपजिल्हाधिकारी आज घेणार बैठक

राजापूर : शासनाच्या पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी राऊत यांच्या उपस्थितीत काजिर्डा गावी जामदा प्रकल्पाबाबत २० रोजी बैठक पार पडत असून, त्यामध्ये समस्य प्रकल्पग्रस्त हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रद्द करा, अशी मागणी रेटून धरणार आहेत. समस्त ग्रामस्थांना धर्मराज्य शेतकरी संघटनेचा भक्कम पाठींबा आहे.मागील १९ वर्षे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्या कालावधीत समाधानकारक काम मार्गी लागलेले नाही. पुनर्वसनाबाबत तर काहीच काम झालेले नाही. एकूणच ही प्रक्रियाच चुकीच्या पद्धतीने राबविली गेली, असा आरोप प्रकल्पग्रस्तातून करण्यात येत आहे. सुमारे ४१ कोटी खर्चाचा प्रकल्प ५१९ कोटींवर जाऊन पोहोचला. भूमी संपादन अधिनियमानुसार ८० टक्के ग्रामस्थांची संमती, ग्रामस्थांच्या जनसुनावणी व ठराव आवश्यक असतानाही, तसे काहीही न घडता मनमानीपणे लोकांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. त्यामुळे शासन जनतेला फसवत आहे. त्यामुळे मागील चार-पाच वर्षे प्रकल्पाचे काम पुनर्वसनावरुन स्थानिक ग्रामस्थांनी बंद पाडले होते. त्यामुळे संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी आता हा प्रकल्पच रद्द करा, अशी मागणी प्रजासत्ताक दिनी गावात पार पडलेल्या शेतकरी धर्मपरिषदेत केली होती.दरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकरवी लावलेल्या चौकशीत जामदा प्रकल्पाचा समावेश आहे. त्यामुळे दोलायमान स्थितीत सापडलेल्या या प्रकल्पातील पुनर्वसनाबाबत जिल्ह्याचे पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी राऊत हे २० फेब्रुवारीला काजिर्डा गावी जाऊन बैठक घेणार आहेत.यापूर्वी काजिर्डावासियांनी धर्मराज्य शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली पुनर्वसन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे आरोप प्रकल्पग्रस्तांमधून करण्यात आले होते. परिणामी उद्याच्या बैठकीत पुनर्वसनाचा विषय शासनाने सोडून द्यावा व हा प्रकल्पच कायमचा रद्द करावा, अशी मागणी बैठकीत रेटून धरणार आहेत, अशी माहिती काजिर्डा उपसरपंच अशोक आर्डे यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत काजिर्डा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, यासाठी धर्मराज्य शेतकरी संघटनेसह काजिर्डावासिय एकवटले आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत समस्त प्रकल्पग्रस्त कशा प्रकारे विरोध करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उपस्थित पुनर्वसनाचे उपजिल्हाधिकारी राऊत कोणती भूमिका घेतात, हा देखील महत्तवाचा मुद्दा ठरणार आहे. (प्रतिनिधी)