शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
4
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
5
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
6
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
7
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
8
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
9
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
10
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
11
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
12
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
13
Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
14
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
15
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
16
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
17
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
18
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
19
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
20
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मिरची, मसाले जिन्नसांना महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वर्षभरासाठी लागणारे तिखट अथवा मसाला घरोघरी तयार करण्यात येतो. सध्या घरोघरी मिरची खरेदी करणे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वर्षभरासाठी लागणारे तिखट अथवा मसाला घरोघरी तयार करण्यात येतो. सध्या घरोघरी मिरची खरेदी करणे, वाळविणे, दळण काढून आणणे, याची लगबग सुरू आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत मसाल्यासाठी लागणारी मिरची व मसाल्याच्या अन्य जिन्नसाच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. लाल मिरचीच्या किमतीत शंभर रुपयांनी वाढ झाली आहे.

तिखटासाठी लवंगी, तर रंगासाठी काश्मिरी मिरचीचा वापर केला जातो. मात्र, दरामुळे एकाच प्रकारची मिरची खरेदी न करता, बजेटप्रमाणे मिश्र मिरचीची खरेदी करण्यात येत आहे. वर्षभरासाठी लागणाऱ्या तिखटाचा अंदाज असल्याने त्याप्रमाणे मिरची खरेदी सुरू असली तरी वाढत्या दरामुळे खरेदीच्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनामुळे गतवर्षी लॉकडाऊन मार्चमध्ये झाले होते. त्यामुळे कित्येकांना मसाले बनविता आले नव्हते. कोरोना रूग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन होण्याची भीती असल्यामुळेच गृहिणींची मिरची खरेदीबरोबर तिखट दळून आणण्याची लगबग सुरू असल्याने मसाल्याची गिरण, डंकावर नंबर लागत आहेत. महागाईने पोळलेल्या ग्राहकांना मिरची व मसाल्याच्या जिन्नसाची दरवाढ सोसावी लागत आहे.

कोल्हापुरातून आवक

- जिल्ह्यात विक्रीसाठी येणारी मिरची, मसाल्याचे अन्य साहित्य कोल्हापूर तसेच नवी मुंबई येथून विक्रीसाठी येत आहे.

- घाऊक बाजारात गुजरातमधून मिरचीची आवक होत आहे

- स्थानिक शेतकरी मिरचीचे उत्पादन घेऊ लागले असले तरी या मिरच्यांचा वापर अद्याप तरी वाळवणांसाठी होत नाही.

वर्षभरासाठी लागणारे तिखट एकदाच तयार केले जाते. मिरचीच्या दरात तसेच मसाल्यासाठी लागणाऱ्या अन्य जिन्नसाचे दरही कडाडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत शंभर रुपयांनी घसघशीत वाढ झाली आहे. महागाईने आधीच जीव मेटाकुटीस आणला आहे. प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ अद्याप सुरू आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे खर्चाला कोठे कात्री लावावी, हा प्रश्न आहे. यावर्षी इंधनाच्या दरात झालेल्या दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होत असल्याने शासनाने महागाईवर कुठेतरी निर्बंध आणणे गरजेचे आहे.

- दुर्वा रसाळ, गृहिणी

महागाईचा दर निश्चित करताना सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे. महागाई सातत्याने वाढत असली तरी मजुरीचे दर मात्र सतत वाढत नाहीत. जीवनाश्यक वस्तूंमध्ये डाळी, तेल, कडधान्य, तांदूळ, गव्हाचे दर आधीच वाढलेले आहेत. कांद्याचे दर आता खाली येऊ लागले आहेत. मात्र, मसाल्यांचे दर चांगलेच भडकले आहेत. पोटाला चिमटे काढून जमवलेली पूंजी लॉकडाऊन काळात संपली. आता लॉकडाऊन झाले तर आर्थिक परिस्थिती विचित्र होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा विचार करूनच दरवाढ करणे आवश्यक आहे.

- शिल्पा जोशी, गृहिणी