शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

मिरची, मसाले जिन्नसांना महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वर्षभरासाठी लागणारे तिखट अथवा मसाला घरोघरी तयार करण्यात येतो. सध्या घरोघरी मिरची खरेदी करणे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वर्षभरासाठी लागणारे तिखट अथवा मसाला घरोघरी तयार करण्यात येतो. सध्या घरोघरी मिरची खरेदी करणे, वाळविणे, दळण काढून आणणे, याची लगबग सुरू आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत मसाल्यासाठी लागणारी मिरची व मसाल्याच्या अन्य जिन्नसाच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. लाल मिरचीच्या किमतीत शंभर रुपयांनी वाढ झाली आहे.

तिखटासाठी लवंगी, तर रंगासाठी काश्मिरी मिरचीचा वापर केला जातो. मात्र, दरामुळे एकाच प्रकारची मिरची खरेदी न करता, बजेटप्रमाणे मिश्र मिरचीची खरेदी करण्यात येत आहे. वर्षभरासाठी लागणाऱ्या तिखटाचा अंदाज असल्याने त्याप्रमाणे मिरची खरेदी सुरू असली तरी वाढत्या दरामुळे खरेदीच्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनामुळे गतवर्षी लॉकडाऊन मार्चमध्ये झाले होते. त्यामुळे कित्येकांना मसाले बनविता आले नव्हते. कोरोना रूग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन होण्याची भीती असल्यामुळेच गृहिणींची मिरची खरेदीबरोबर तिखट दळून आणण्याची लगबग सुरू असल्याने मसाल्याची गिरण, डंकावर नंबर लागत आहेत. महागाईने पोळलेल्या ग्राहकांना मिरची व मसाल्याच्या जिन्नसाची दरवाढ सोसावी लागत आहे.

कोल्हापुरातून आवक

- जिल्ह्यात विक्रीसाठी येणारी मिरची, मसाल्याचे अन्य साहित्य कोल्हापूर तसेच नवी मुंबई येथून विक्रीसाठी येत आहे.

- घाऊक बाजारात गुजरातमधून मिरचीची आवक होत आहे

- स्थानिक शेतकरी मिरचीचे उत्पादन घेऊ लागले असले तरी या मिरच्यांचा वापर अद्याप तरी वाळवणांसाठी होत नाही.

वर्षभरासाठी लागणारे तिखट एकदाच तयार केले जाते. मिरचीच्या दरात तसेच मसाल्यासाठी लागणाऱ्या अन्य जिन्नसाचे दरही कडाडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत शंभर रुपयांनी घसघशीत वाढ झाली आहे. महागाईने आधीच जीव मेटाकुटीस आणला आहे. प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ अद्याप सुरू आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे खर्चाला कोठे कात्री लावावी, हा प्रश्न आहे. यावर्षी इंधनाच्या दरात झालेल्या दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होत असल्याने शासनाने महागाईवर कुठेतरी निर्बंध आणणे गरजेचे आहे.

- दुर्वा रसाळ, गृहिणी

महागाईचा दर निश्चित करताना सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे. महागाई सातत्याने वाढत असली तरी मजुरीचे दर मात्र सतत वाढत नाहीत. जीवनाश्यक वस्तूंमध्ये डाळी, तेल, कडधान्य, तांदूळ, गव्हाचे दर आधीच वाढलेले आहेत. कांद्याचे दर आता खाली येऊ लागले आहेत. मात्र, मसाल्यांचे दर चांगलेच भडकले आहेत. पोटाला चिमटे काढून जमवलेली पूंजी लॉकडाऊन काळात संपली. आता लॉकडाऊन झाले तर आर्थिक परिस्थिती विचित्र होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा विचार करूनच दरवाढ करणे आवश्यक आहे.

- शिल्पा जोशी, गृहिणी