शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

‘त्यां’चा बंधूभाव जीवनापासून मृत्यूपर्यंतचा...!

By admin | Updated: July 16, 2015 00:29 IST

आडवलीवर शोककळा : भावाचा मृत्यू सहन न झाल्याने दुसऱ्या भावाचाही हृदयविकाराने मृत्यू

राजापूर : धाकट्या भावाच्या निधनाचा मानसिक धक्का बसल्याने मोठ्या भावाचा हृदय विकाराच्या धक्क्याने अंत झाला. ही हृदयद्रावक घटना आडवली गावी घडली.तालुक्याच्या सौंदळ पट्ट्यातील आडवली गावी यशवंत कृष्णा चव्हाण (५४) हे आपल्या कुटुंबासमवेत राहात होते. ते एकूण सहा भाऊ असून, परिवार मोठा आहे. स्वत: यशवंत चव्हाण हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात संपूर्ण परिसरात चांगलेच परिचित होते. काही वर्षे ते आडवली गावचे सरपंचदेखील होते. शिवाय व्यावसायिक होते.मागील काही महिने ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते. रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात आठवड्यातून तीन वेळा डायलेसीस करण्यासाठी त्यांना न्यावे लागत होते. गेल्या चार - पाच दिवसांपासून त्यांची प्रकृ ती नाजूक बनली होती. परिणामी हातखंबा येथील मुलीकडे त्यांना ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांचा मुलगा सूर्यकांत व अन्य सदस्य त्यांना रत्नागिरीला आणत असतानाच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली. नंतर त्यांचे पार्थिव आडवलीत आणण्यात आले. या घटनेची माहिती सर्व नातेवाईकांना देण्यात आली. यशवंत चव्हाण यांचे भाऊ मुंबईत राहतात. तेदेखील आपापल्या कुटुंबासमवेत घरी पोहोचले तोवर सर्व तयारी पूर्ण झाली होती. गावातील ग्रामस्थही अंत्यविधीला हजर होते.आपल्या भावाचे शव पाहून मयत यशवंत चव्हाण यांचे ज्येष्ठ बंधू शंकर कृष्णा चव्हाण (६०) यांना शोक अनावर झाला व त्या घटनेचा जोरदार मानसिक धक्कासुद्धा बसला. मात्र, स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत ते लगतच्या वहाळावर नैसर्गिक विधीसाठी गेले. काही क्षणातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व ते तत्काळ खाली कोसळले. तत्पूर्वी मदतीसाठी त्यांनी जोरदार आरडाओरडा केला. पण ते ऐकायला जवळ कुणीच नव्हते. सर्वजण मृत यशवंत चव्हाण यांच्या अंत्ययात्रेच्या तयारीत होते. तेवढ्यात बाजूला कुणीतरी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. त्याने आरडाओरड करताच अंत्ययात्रेतील अनेकांनी त्या वहाळाकडे धाव घेतली. त्यावेळी शंकर जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळले. काहींनी त्यांना धरुन तत्काळ सौंदळला डॉक्टरकडे नेले. पण, तोवर फार उशीर झाला होता.या घटनेने आडवलीत खळबळ उडाली. एका भावाच्या अंत्ययात्रेची तयारी सुरु असतानाच विरह सहन न झाल्याने दुसरा भाऊ मृत्यूमुखी पडला होता. अखेर दोन्ही भावांची अंत्ययात्रा एकाच दिवशी निघाली व स्मशानात बाजूबाजूलाच दोन्ही भावांनी चीरनिद्रा घेतली. या घटनेने आडवलीसह सौंदळ पट्ट्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत यशवंत कृष्णा चव्हाण हे आडवली गावचे शिवसेना शाखाप्रमुख सूर्यकांत चव्हाण यांचे वडील होते. या दु:खद घटनेनंतर शोकाकूल चव्हाण कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी अनेकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. यशवंत यांच्यामागे पत्नी व दोन मुलगे, तर शंकर चव्हाण यांच्यामागेही मोठा परिवार आहे. (प्रतिनिधी)