शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

ग्रामपंचायतीच आर्थिक दुर्बल

By admin | Updated: July 16, 2015 22:55 IST

रत्नागिरी जिल्हा : घरपट्टी वसुली बंद

रहिम दलाल -रत्नागिरी -न्यायालयाच्या आदेशानुसार घरपट्टी वसुली बंद असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा आर्थिक कणाच मोडला आहे. आर्थिकदृष्ट्या ग्रामपंचायती दुर्बल झाल्याने विकासाला खीळ बसली आहे. ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण भागाचा विकासाचा केंद्रबिंदू मानला जातो. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांमध्ये विविध योजना राबवून विकास साधला जातो. विकासकामांसाठी शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान ग्रामपंचायतींना देण्यात येते. मात्र, ग्रामपंचायतींची हक्काची कमाई असलेली घरपट्टी वसूली बंद झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामस्थांना विविध सोयीसुविधा पुरवण्यात येतात. त्यासाठी ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारीवगळता ग्रामपंचायत स्तरावर इतरही कर्मचारी काम करीत असतात. त्यांना ग्रामपंचायतींकडून मानधन देण्यात येते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची उपजीविका ग्रामपंचायतींकडून मिळणाऱ्या तूटपुंज्या मानधनावरच अवलंबून असते. जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून, त्यांना सन २०१५-१६चे घरपट्टी वसूलीचे उद्दिष्ट २२ कोटी ५५ लाख ६९ हजार ९१ रुपये एवढे देण्यात आले होते. दर महिन्याला प्रत्येक ग्रामपंचायतीकडून सुमारे १० टक्के घरपट्टीची रक्कम वसूल करण्यात येते. मात्र, गणेशोत्सव, दीपावली आणि मे महिन्याची सुटी या दिवसांमध्ये घरपट्टी वसुलीचे प्रमाण जादा असते. मात्र, एप्रिलमध्ये उच्च न्यायालयाने घरपट्टी वसूलीवर बंदी आणल्याने सर्वच ग्रामपंचायतींचा आर्थिक कणा मोडला आहे. वसूल करण्यात येणाऱ्या घरपट्टीच्या रकमेतून ग्रामपंचायतीच्या वीजबिलाचा भरणा करण्यात येतो. तसेच कर्मचाऱ्यांचे मानधनही काढण्यात येऊन विकासकामे करण्यात येतात. ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाच्या मागासवर्गीयांसाठी १५ टक्के निधी खर्च, महिला व बालकल्याणसाठी १० टक्के निधी खर्च, ३ टक्के अपंग कल्याणसाठी खर्च व अन्य कामांवर हा निधी खर्च करण्यात येतो. घरपट्टी वसूली पूर्णत: बंद असल्याने ग्रामपंचायतींसमोर विकासकामांचा मोठा पेच निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेले दोन महिने मानधन मिळालेले नसल्याची ओरड सुरु आहे. बहुतांश ग्रामपंचायती छोट्या असून, त्यांना घरपट्टीव्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर काहीही साधन नसल्याने त्यांच्या वीजबिलाचा भरणा करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वीजबिल न भरल्यास त्यांना आंधारात काम करावे लागणार आहे. शिवाय मोठ्या ग्रामपंचायतींकडे असलेला कर्मचारीवर्गही मानधन न मिळाल्याने काम बंद करण्याच्या तयारीत आहे. विकासाला बसणार खीळ...उच्च न्यायालयाचा निर्णय.ग्रामपंचायतीच्या अडचणी वाढल्या.गावची विकासकामे रेंगाळणार.जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतींना २२ कोटी ५५ लाख घरपट्टी वसुलीचे उद्दीष्ट.बहुतांश ग्रामपंचायती छोट्या असल्याने घरपट्टीव्यतिरिक्त उत्पन्नाचे साधनच नाही.