शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

चारा निर्मितीसाठी शासनाचे अनुदान

By admin | Updated: July 11, 2014 00:33 IST

आर. सी. म्हस्के : पडीक जमिनीचा विकास

सुमय्या तांबे - खाडीपट्टा , राज्यातील कमी पर्जन्यमानाच्या कारणास्तव चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेंतर्गत खाद्य व वैरण विकास अभियान राबवण्याचे निर्देश जिल्हा परिषद पशुधन विभागाला देण्यात आले आहेत. या अभियानातून पडीक व चराऊ जमिनीचा विकास करुन चारा निर्मितीसाठी शासनाकडून ३० हजार रुपयांपासून १ लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी आर. सी. म्हस्के यांनी दिली.जून महिना संपला तरी पाऊस सुरु झाला नव्हता. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाच्या कमतरतेमुळे राज्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी वैरणीची आवश्यकता लक्षात घेऊन राष्ट्रीय पशुधन अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत खाद्य व वैरण विकास प्रस्तावांची २ जुलैपर्यंत मागणी करण्यात आली होती.हलक्या किंवा पडीक जमिनी विकसित करुन कृषी विभागानुसार व हवामानाला साजेसे एकदल किंवा द्वीदल प्रजातींची लागवड याद्वारे करण्यात येणार आहे. जमिनीची धूप थांबवण्यासाठी वैरणीचे उत्पादन घेण्यात येईल. अतिरिक्त उत्पादित वैरण चारा साठवणीसाठी उपयोगात आणणे, किफायतशीर खर्चात पशुधनासाठी पोषक वैरण तयार करणे याला प्राधान्य देण्यात आले. योजनेचे स्वरुप म्हणून जमिनीच्या प्रकारानुसार प्रती हेक्टरसाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. त्यामध्ये केंद्राचा ७५% व राज्याचा २५% हिस्सा राहणार आहे. ज्या जमिनीला मशागतीची आवश्यकता आहे, अशा जमिनीसाठी १ लाख रुपये अनुदान देण्यात येईल. चराऊ किंवा पडीक जमीन सुधारण्यासाठी मशागतीची आवश्यकता नाही, अशा जमिनीला ३५ हजार रुपये, शासकीय जमिनी किंवा गोशाळा, पांझरपोळ यांच्याकडील जमिनीसाठी ६५ हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थीची निवड करताना संस्था किंवा शेतकरी यांच्याकडे स्वत:च्या मालकी हक्काची पडीक जमीन असण्याची अट घालण्यात आली आहे. कमीत कमी ५० व वैयक्तिक ५ ते १०पर्यंत पशुधन असावे. अटींची पूर्तता करणाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.४राज्यात कमी पर्जन्यमान झाल्याने गुरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीररूप धारण करू लागला आहे. यासाठी राज्यात चारा निर्मितीसाठी शासनाने अनुदान देण्याबतचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेंतर्गत खाद्य व वैरणविकास योजनेतून शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार आहे. पर्याप्त जागेबाबत विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. याची अंमलबजावणी महत्वाची आहे.