शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

सरकारने ताकद द्यावी : खानविलकर

By admin | Updated: July 9, 2014 00:26 IST

आम्ही आशावादी : उत्पादन वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची मागणी

चिपळूण : जनतेने पूर्ण विश्वास व्यक्त करुन मोदी सरकार केंद्रस्थानी आणले आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरी केंद्र सरकारच्या नवीन धोरणाकडे डोळे लावून बसले आहेत. या धोरणावरच शेतीचे पर्यायाने देशाच्या उत्पन्नाचे भवितव्य अवलंबून आहे. तरी उत्पादन वाढविणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ताकद द्यावी, अशी मागणी कृषिभूषण रणजित खानविलकर यांनी केली आहे. देशातील विविध भागातील हवामान व भौगोलिक परिस्थितीत बदल होत आहे. या बदलत्या विविधतेचा धोरणात्मक बदल जर शेतकऱ्यांनी अपेक्षिला तर चुकीचे होणार नाही. एखाद्या विकासाच्या योजनेचा खर्च भौगोलिक परिस्थितीनुसार बदलणे स्वाभाविक आहे. कृषी विभागासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विकासासाठी भरमसाठ किमतीत घ्याव्या लागणाऱ्या कृषी निविष्टा योग्य दरात मिळतील. त्यामुळे कृषी उत्पादन खर्च मर्यादित राहील. देशाच्या विविधतेनुसार प्रत्येक भागाच्या उत्पादनाला पोषक वातावरण असते. त्यामुळे उत्पादन खर्च इतर भागापेक्षा कमी असतो. या विविधतेचा विचार करुन देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्याच ठिकाणी त्या उत्पादनाला प्राधान्य देण्यात यावे. कृषी विकासाची प्राथमिक गरज सिंचन आहे. पाण्याची बचत व जादा उत्पादन याकरिता योग्य प्रमाणात सिंचन होणे गरजेचे आहे. सिंचन साहित्यावरील शासकीय करावर सवलत दिल्यास हे साहित्य ेशेतकऱ्यांना वाजवी भावात मिळेल. साहित्याचा उत्पादन खर्च व शेतकऱ्यांना घ्याव्या लागणाऱ्या खरेदी किमतीवर शासनाने नियंत्रण आणावे. केंद्र सरकारच्या कृषी विकासासाठी असणाऱ्या अनुदानाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहज जलदगतीने मिळण्यासाठी जिल्हास्तरावर मंजुरीचा अधिकार असावा, यासाठी शेतकऱ्यांना जिल्हास्तर, राज्यस्तर व केंद्रस्तरावर मंजुरीसाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे होणारा उशीर याचा परिणाम अखेर उत्पादनावर होत असतो. देशाच्या कृषी विकासासाठी कार्पोरेट फार्मिंग धोरणाचा स्वीकार करावा. कृषी विकासाला पहिली पसंती देऊन देशाचे उत्पन्न वाढविणाऱ्या शेतकऱ्यांना ताकद द्यावी, अशी अपेक्षाही खानविलकर यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)