शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने ताकद द्यावी : खानविलकर

By admin | Updated: July 9, 2014 00:26 IST

आम्ही आशावादी : उत्पादन वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची मागणी

चिपळूण : जनतेने पूर्ण विश्वास व्यक्त करुन मोदी सरकार केंद्रस्थानी आणले आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरी केंद्र सरकारच्या नवीन धोरणाकडे डोळे लावून बसले आहेत. या धोरणावरच शेतीचे पर्यायाने देशाच्या उत्पन्नाचे भवितव्य अवलंबून आहे. तरी उत्पादन वाढविणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ताकद द्यावी, अशी मागणी कृषिभूषण रणजित खानविलकर यांनी केली आहे. देशातील विविध भागातील हवामान व भौगोलिक परिस्थितीत बदल होत आहे. या बदलत्या विविधतेचा धोरणात्मक बदल जर शेतकऱ्यांनी अपेक्षिला तर चुकीचे होणार नाही. एखाद्या विकासाच्या योजनेचा खर्च भौगोलिक परिस्थितीनुसार बदलणे स्वाभाविक आहे. कृषी विभागासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विकासासाठी भरमसाठ किमतीत घ्याव्या लागणाऱ्या कृषी निविष्टा योग्य दरात मिळतील. त्यामुळे कृषी उत्पादन खर्च मर्यादित राहील. देशाच्या विविधतेनुसार प्रत्येक भागाच्या उत्पादनाला पोषक वातावरण असते. त्यामुळे उत्पादन खर्च इतर भागापेक्षा कमी असतो. या विविधतेचा विचार करुन देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्याच ठिकाणी त्या उत्पादनाला प्राधान्य देण्यात यावे. कृषी विकासाची प्राथमिक गरज सिंचन आहे. पाण्याची बचत व जादा उत्पादन याकरिता योग्य प्रमाणात सिंचन होणे गरजेचे आहे. सिंचन साहित्यावरील शासकीय करावर सवलत दिल्यास हे साहित्य ेशेतकऱ्यांना वाजवी भावात मिळेल. साहित्याचा उत्पादन खर्च व शेतकऱ्यांना घ्याव्या लागणाऱ्या खरेदी किमतीवर शासनाने नियंत्रण आणावे. केंद्र सरकारच्या कृषी विकासासाठी असणाऱ्या अनुदानाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहज जलदगतीने मिळण्यासाठी जिल्हास्तरावर मंजुरीचा अधिकार असावा, यासाठी शेतकऱ्यांना जिल्हास्तर, राज्यस्तर व केंद्रस्तरावर मंजुरीसाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे होणारा उशीर याचा परिणाम अखेर उत्पादनावर होत असतो. देशाच्या कृषी विकासासाठी कार्पोरेट फार्मिंग धोरणाचा स्वीकार करावा. कृषी विकासाला पहिली पसंती देऊन देशाचे उत्पन्न वाढविणाऱ्या शेतकऱ्यांना ताकद द्यावी, अशी अपेक्षाही खानविलकर यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)