शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

सरकारने ताकद द्यावी : खानविलकर

By admin | Updated: July 9, 2014 00:26 IST

आम्ही आशावादी : उत्पादन वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची मागणी

चिपळूण : जनतेने पूर्ण विश्वास व्यक्त करुन मोदी सरकार केंद्रस्थानी आणले आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरी केंद्र सरकारच्या नवीन धोरणाकडे डोळे लावून बसले आहेत. या धोरणावरच शेतीचे पर्यायाने देशाच्या उत्पन्नाचे भवितव्य अवलंबून आहे. तरी उत्पादन वाढविणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ताकद द्यावी, अशी मागणी कृषिभूषण रणजित खानविलकर यांनी केली आहे. देशातील विविध भागातील हवामान व भौगोलिक परिस्थितीत बदल होत आहे. या बदलत्या विविधतेचा धोरणात्मक बदल जर शेतकऱ्यांनी अपेक्षिला तर चुकीचे होणार नाही. एखाद्या विकासाच्या योजनेचा खर्च भौगोलिक परिस्थितीनुसार बदलणे स्वाभाविक आहे. कृषी विभागासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विकासासाठी भरमसाठ किमतीत घ्याव्या लागणाऱ्या कृषी निविष्टा योग्य दरात मिळतील. त्यामुळे कृषी उत्पादन खर्च मर्यादित राहील. देशाच्या विविधतेनुसार प्रत्येक भागाच्या उत्पादनाला पोषक वातावरण असते. त्यामुळे उत्पादन खर्च इतर भागापेक्षा कमी असतो. या विविधतेचा विचार करुन देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्याच ठिकाणी त्या उत्पादनाला प्राधान्य देण्यात यावे. कृषी विकासाची प्राथमिक गरज सिंचन आहे. पाण्याची बचत व जादा उत्पादन याकरिता योग्य प्रमाणात सिंचन होणे गरजेचे आहे. सिंचन साहित्यावरील शासकीय करावर सवलत दिल्यास हे साहित्य ेशेतकऱ्यांना वाजवी भावात मिळेल. साहित्याचा उत्पादन खर्च व शेतकऱ्यांना घ्याव्या लागणाऱ्या खरेदी किमतीवर शासनाने नियंत्रण आणावे. केंद्र सरकारच्या कृषी विकासासाठी असणाऱ्या अनुदानाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहज जलदगतीने मिळण्यासाठी जिल्हास्तरावर मंजुरीचा अधिकार असावा, यासाठी शेतकऱ्यांना जिल्हास्तर, राज्यस्तर व केंद्रस्तरावर मंजुरीसाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे होणारा उशीर याचा परिणाम अखेर उत्पादनावर होत असतो. देशाच्या कृषी विकासासाठी कार्पोरेट फार्मिंग धोरणाचा स्वीकार करावा. कृषी विकासाला पहिली पसंती देऊन देशाचे उत्पन्न वाढविणाऱ्या शेतकऱ्यांना ताकद द्यावी, अशी अपेक्षाही खानविलकर यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)