शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचा केंद्रबिंदू धोकादायक

By admin | Updated: February 13, 2015 00:49 IST

इमारती मोडकळीस : २०४ ग्रामपंचायतींचा विकास कधी होणार?

रहिम दलाल -रत्नागिरी ग्रामीण भागातील गावांच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींच्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. या इमारती फार जुन्या असून, त्यांचा विकास कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १९ लाख २०६१ असून, त्यापैकी १५ लाख ४४१ लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागात ८४४ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावे, वाड्यांमध्ये विविध योजना राबविण्यात येत आहेत़ या योजनांमध्ये पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान, यशवंत ग्रामसमृध्दी योजना, ग्रामसचिवालय योजना व अन्य योजनांचा समावेश आहे़ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांमुळे विविध विकासकामे करीत असताना आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आराखडा ग्रामपंचायतींमध्ये तयार करुन शासनाकडून कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात येत आहेत़ त्यातून स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध झाला आहे़ग्रामीण भागात विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींच्या इमारती २५ ते ३० वर्षांपूर्वीच्या आहेत़ या धोकादायक असलेल्या ग्रामपंचायतींच्या इमारतींमधून केवळ ४३ ग्रामपंचायतींना नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. या प्रत्येक ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींसाठी १० लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यामध्ये गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या ग्रामपंचायत जनसुविधासाठी विशेष अनुदानातून २३ ग्रामपंचायती घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजनमधून २० ग्रामपंचायती घेण्यात आल्या आहेत.धोकादायक असलेल्या या ग्रामपंचायतींच्या इमारतीचे छत मोडकळीस आले असून, काही इमारतींच्या भिंतीना तडे गेले आहेत़ ग्रामपंचायतींच्या इमारतींमध्ये कर्मचारी व लोकप्रतिनिधी जीव मुठीत धरुन काम करीत आहेत़ मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यालयामध्ये पावसाळ्यात कागदपत्र भिजल्याने जुनी कागदपत्र खराब होत आहेत़ त्यासाठी नवीन इमारतींची मागणीही ग्रामपंचायतींकडून करण्यात आली आहे़एकीकडे गावच्या विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाच दुसरीकडे ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी शासनाकडे पुरेसा निधी नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़भाड्याच्या जागेत इमारतीजिल्ह्यातील ८४४ ग्रामपंचायतींपैकी ८३६ ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीची कार्यालये आहेत. उर्वरित ८ ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. त्यामध्ये खेडमधील ४, चिपळुणातील २ आणि खेड व लांजातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे़ या ग्रामपंचायती भाड्याच्या जागेत आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी झटणाऱ्या ग्रामपंचायतींच्या इमारती डळमळीत झालेल्या असतानाही त्यांना पुरेसा निधी नाही. त्यामुळे त्यांची कामे टप्प्याने घेण्यात येत आहेत. धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने शासन त्यांच्या बांधकामासाठी पुरेसा निधी कधी देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राजीव गांधी भवन या योजनेतून ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींसाठी १२ लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यातून २ ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींची कामे घेण्यात येत आहेत. राष्ट्रीय ग्राम स्वराज योजनेतून ११ ग्रामपंचायतींना नवीन इमारती देण्यात येत असून, आणखी १३ ग्रामपंचायतींच्या नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत.तालुका ग्रामपंचायत इमारतीमंडणगड१२दापोली४५खेड२१चिपळूण२४गुहागर१४संगमेश्वर१३रत्नागिरी२०लांजा१०राजापूर१२एकूण१७१