शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वणवे रोखण्यात अपयश

By admin | Updated: February 13, 2015 00:54 IST

कायद्याची गरज : नैसर्गिक साखळी येतेय धोक्यात

फुणगूस : जिल्ह्यातील बहुतांश वणवे जानेवारी ते मे या काळात लागतात. या वणव्यात आंबा आणि काजूच्या बागा बेचिराख होतात. यातील बरेचसे वणवे मानवनिर्मित असतात. वणव्याचे वाढते प्रमाण पाहता पर्यावरण संरक्षणासाठी वणवा निर्मूलनात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. जैवविविधतेने नटलेल्या भागात हजारो वनस्पती व प्राण्यांच्या जाती आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र, अलिकडे डोंगर रांगांना वणव्यांचे गालबोट लागलेले दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी शेतजमिनीवरील गवत नाहिसे होऊन शेती चांगली पिकावी, यासाठी भाजावळ केली जायची. याच आगीचे काही वेळेला वणव्यात रुपांतर होते. भडकत गेलेली आग आंबा, काजूच्या बागांना गिळंकृ त करते. त्यामुळे नैसर्गिक साखळी धोक्यात येत आहे.वनक्षेत्रात वणवा लावणे, निष्काळजीपणामुळे लावलेली, लागलेली आग वनक्षेत्रात पसरणे, हा कायदेशीर गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. वणवे लावणाऱ्याविरोधात पूर्वी कायद्याने कोणती ना कोणती शिक्षा केली जात होती. मात्र, सध्या असे काही घडताना दिसत नाही.वणव्यामुळे रानटी जनावरांचे व प्राण्यांचे या सहा महिन्यांचे खाद्य नष्ट होते. त्यामुळे त्यांच्या पैदासीवर, अनिष्ट परिणाम होतो. वातावरणातही मोठ्या प्रमाणात बदल होतो. पशु-पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होतात. गवतावर भूक भागवणारी भेकर, ससे, हरीण आदी प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत असून, हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दुसऱ्या बाजूला या प्राण्यांच्या जीवावर आपली भूक भागवणारे वाघ, कोल्हे, लांडगे यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांनी आपला मोर्चा भक्ष्यशोधार्थ मानवी वस्तीकडे वळविला असून, त्यांच्याकडून जनावरांची शिकार केली जात आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. या वणव्यामुळे कोकणात निर्माण होणाऱ्या कृषी पर्यटक व्यवसायालाही फटका बसत आहे.वणवा हा मुख्य मुद्दा ठरत आहे. हे लक्षात घेऊन सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने पर्यावरणप्रेमी तसेच संघटनांमार्फ त वनक्षेत्रात वणवा निर्मूलन मोहीम व वनसंरक्षण अभियानाला सुरुवात केल्यास भविष्यात ओढवणाऱ्या आपत्तींना वेळीच आळा घालता येईल, असे मत व्यक्त केले जात अ्हे. नजिकच्या काळात वणवे लावण्याचे प्रमाण कमी होईल व जंंगलाचे संरक्षण केले जाईल असे मत व्यक्त होत आहे. (वार्ताहर)लोकसहभाग महत्त्वाचा रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी ते मार्च दरम्यान जोरदार वणवे लागतात. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू असून, वणवे लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक डोंगरावर असे प्रकार केले जात असून, शासन यंत्रणा गप्प का, असा सवाल विचारला जात आहे. शेतजमीन अथवा जैवविविधता असलेल्या डोंगरावर असे वणवे लावण्याचे प्रमाण मोठे आहे.