शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
8
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
9
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
10
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
11
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
12
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
13
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
14
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
15
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
16
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
17
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
18
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
19
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
20
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?

टंचाईग्रस्त वाड्यांचे शतक पाणीटंचाई : १०३ वाड्यांची तहान भागेना...

By admin | Updated: May 11, 2014 00:09 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात टंचाईग्रस्त १५ गावामध्ये ३६ वाड्यांची भर पडली आहे. या टंचाईग्रस्तांना करण्यात येणारा पाणीपुरवठा केवळ १४ टँकर्स करण्यात येत असून

रत्नागिरी : जिल्ह्यात टंचाईग्रस्त १५ गावामध्ये ३६ वाड्यांची भर पडली आहे. या टंचाईग्रस्तांना करण्यात येणारा पाणीपुरवठा केवळ १४ टँकर्स करण्यात येत असून तो अपुरा असल्याने जनता हैराण झाली आहे. मात्र गतवर्षी पावसाचे प्रमाण जास्त होते तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे यंदा पाणीटंचाई कमी आहे. डोंगरदर्‍यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. कारण या वाड्यावस्त्या डोंगरदर्‍यामध्ये असल्याने पाण्याची पातळी खालावल्यामुळे येथील विहीरी, विंधन विहीरी, ओढे, झरे आटल्याने रहिवाशांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे़ मागील आठवड्यामध्ये ४१ गावातील ६७ वाड्यांमध्ये पाणीटंचाई होती. या टंचाईग्रस्तांना ६ शासकीय आणि ८ खासगी टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत होता़ यामध्ये १५ गावातील ३६ वाड्यांची भर पडली आहे़ मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात टंचाईग्रस्तांची संख्या वाढलेली असतानाही केवळ २ टँकरची वाढ करण्यात आली आहे. दापोलीमध्ये १ गाव ९ वाड्या, संगमेश्वरमध्ये ९ गावातील १३ वाड्या, लांजात ५ वाड्या व राजापूरात ३ गावातील ५ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. तर रत्नागिरी तालुक्यातही यावेळी पाणीटंचाई सुरु झाली असून २ गावातील ४ वाड्यांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे प्रमाण खूप कमी आहे. कारण जिल्ह्यात ठिकठिकाणी अवेळी पाऊस पडत असल्याने त्याचे परिणाम पाण्याच्या पातळीवर झाला आहे. पावसाचे पाणी झिरपल्याने पाण्याची पातळी जैसे थे राहत आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील मंडणगड, गुहागर, चिपळूण या तालुक्यांमध्ये पाण्याच्या पातळीची स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे तीनही तालुके अजूनही टंचाईमुक्त आहेत. (शहर वार्ताहर)