शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

टंचाईग्रस्त वाड्यांचे शतक पाणीटंचाई : १०३ वाड्यांची तहान भागेना...

By admin | Updated: May 11, 2014 00:09 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात टंचाईग्रस्त १५ गावामध्ये ३६ वाड्यांची भर पडली आहे. या टंचाईग्रस्तांना करण्यात येणारा पाणीपुरवठा केवळ १४ टँकर्स करण्यात येत असून

रत्नागिरी : जिल्ह्यात टंचाईग्रस्त १५ गावामध्ये ३६ वाड्यांची भर पडली आहे. या टंचाईग्रस्तांना करण्यात येणारा पाणीपुरवठा केवळ १४ टँकर्स करण्यात येत असून तो अपुरा असल्याने जनता हैराण झाली आहे. मात्र गतवर्षी पावसाचे प्रमाण जास्त होते तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे यंदा पाणीटंचाई कमी आहे. डोंगरदर्‍यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. कारण या वाड्यावस्त्या डोंगरदर्‍यामध्ये असल्याने पाण्याची पातळी खालावल्यामुळे येथील विहीरी, विंधन विहीरी, ओढे, झरे आटल्याने रहिवाशांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे़ मागील आठवड्यामध्ये ४१ गावातील ६७ वाड्यांमध्ये पाणीटंचाई होती. या टंचाईग्रस्तांना ६ शासकीय आणि ८ खासगी टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत होता़ यामध्ये १५ गावातील ३६ वाड्यांची भर पडली आहे़ मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात टंचाईग्रस्तांची संख्या वाढलेली असतानाही केवळ २ टँकरची वाढ करण्यात आली आहे. दापोलीमध्ये १ गाव ९ वाड्या, संगमेश्वरमध्ये ९ गावातील १३ वाड्या, लांजात ५ वाड्या व राजापूरात ३ गावातील ५ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. तर रत्नागिरी तालुक्यातही यावेळी पाणीटंचाई सुरु झाली असून २ गावातील ४ वाड्यांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे प्रमाण खूप कमी आहे. कारण जिल्ह्यात ठिकठिकाणी अवेळी पाऊस पडत असल्याने त्याचे परिणाम पाण्याच्या पातळीवर झाला आहे. पावसाचे पाणी झिरपल्याने पाण्याची पातळी जैसे थे राहत आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील मंडणगड, गुहागर, चिपळूण या तालुक्यांमध्ये पाण्याच्या पातळीची स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे तीनही तालुके अजूनही टंचाईमुक्त आहेत. (शहर वार्ताहर)