शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या पिढीची अधोगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:12 IST

वाजपेयी सरकारच्या वेळी शिक्षण अहवाल ज्या भांडवलदारांच्या कमिटीने तयार केला होता, त्यात त्यांनी देशात शिक्षण सर्वांना घेण्याची गरज ...

वाजपेयी सरकारच्या वेळी शिक्षण अहवाल ज्या भांडवलदारांच्या कमिटीने तयार केला होता, त्यात त्यांनी देशात शिक्षण सर्वांना घेण्याची गरज नाही, असे म्हटले होते तेच आता घडते आहे. सरकारने सर्वांनाच ऑनलाईन शिक्षण सुरू केले. इथेच शासनाने मेख मारली. ज्यांची परिस्थिती आहे, ऑनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या सुविधा आहेत, तीच मुले शिक्षण घेऊ शकत आहेत. खेड्यात राहणारी, गरीब व आदिवासी मुले शिक्षणापासून आपोआप वंचित झाली.

या लॉकडाऊनमुळे फक्त एवढेच झाले नाही. मुलांचे खच्चीकरण झाले, ती मानसिक रोगी होऊ लागली. त्यांच्यावर फार मोठा मानसिक आघात झालाय. शाळा बंद, बाहेर फिरणे बंद, मित्रांचा सहवास नाही, शारीरिक हालचाल बंद, मेंदूला काम नाही, शरीराला काम नाही, याचा मुलांवर काय परिणाम होईल, याचा कोणीच विचार केला नाही, सरकारलाही बंदचा मुलांवर परिणाम होतोय ते महत्त्वाचे वाटले नाही. देशाची भावी पिढी मानसिकरित्या शारीरिकरित्या संपवली जातेय. ज्या पिढीच्या हातात देशाचे भवितव्य आहे तिची आजची परिस्थिती बघा. कधीच न अनुभवलेले

लॉकडाऊनचे वातावरण मुलांना अस्वस्थ करीत आहे. त्यांच्यात नकारात्मकता वाढत आहे. कसली तरी अनामिक भीती त्यांच्या मनाला ग्रासते आहे. त्यांना परीक्षेसंदर्भातील भीती आहे, परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत, त्याबद्दलची चिंता आहे, ऑनलाईन परीक्षेची चिंता आहे. ही सर्व भीती कशी व्यक्त करावी, तेच त्यांना कळत नाहीये. ज्या वयात मैदानी खेळ खेळले पाहिजेत, मित्रांबरोबर गप्पा मारल्या पाहिजेत, सुख - दुःखाची देवाण - घेवाण केली पाहिजे, ते सर्व थांबले आहे. ज्या मुलांच्या पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्या घरातले वातावरण निराशेने भरलेले आहे, कुटुंब कसे चालवायचे, या चिंतेने घरात चिडचिड वाढली आहे. आपापसातला राग पालक पाल्यावर काढीत आहेत, ही सर्व परिस्थिती मुलांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण करीत आहे. घरातले वातावरण सतत तणावाचे राहिल्यास मुलांमध्ये

पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरची लक्षणे दिसू लागतात. आपला एकटेपणा घालविण्यासाठी मुले हिंसक ऑनलाईन गेम खेळणे, पॉर्नोग्राफी साईट पाहणे याकडे वळत आहेत.

शिक्षण घेणे हा सर्वांचा अधिकार आहे. यासाठी शाळा सुरू झाल्या पाहिजेत, पुन्हा पहिल्यासारखी शिक्षण पद्धती सुरू झाली पाहिजे. परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजेत आणि पास होणारी मुलेच वरच्या वर्गात गेली पाहिजेत. भारताची भावी पिढी तंदुरुस्त कशी राहील, याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. उगाच नसलेला आजार आहे आहे म्हणत भुई बडविण्यात काय हशील आहे?

डॉ. मीनल कुष्टे, लांजा