शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

संकटमोचक ‘सागरी बोयाज’ संकटात!

By admin | Updated: July 12, 2014 00:38 IST

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी मच्छिमारांना सागरी नौकानयनाचा सुरक्षित मार्ग दाखविणारी व अपघातांपासून अप्रत्यक्षरित्या वाचवित ‘संकटमोचक’ म्हणून

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीमच्छिमारांना सागरी नौकानयनाचा सुरक्षित मार्ग दाखविणारी व अपघातांपासून अप्रत्यक्षरित्या वाचवित ‘संकटमोचक’ म्हणून भूमिका बजावणारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रातील १६ बोयाजच यंदा संकटात सापडली आहेत. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्री लाटांनी साखळ्या तुटल्याने ५ बोयाज खोल सागरात वाहनू गेली आहेत, तर बेजार झालेली उर्वरित ११ बोयाज साखळ्या तुटून भरकटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरवर्षी ही बोयाज मे महिन्यात मेरिटाईम बोर्डाकडून त्यांच्या बार्जमार्फत समुद्रातून काढून बंदरात आणल्यानंतर ती सुरक्षित ठिकाणी ठेवली जातात. तसेच सप्टेंबर महिन्यात ही बोयाज पुन्हा सागरात त्यांच्या नियोजित स्थळी लावली जातात. यंदा ही बोयाज मे महिन्यात सागरातून काढलीच गेली नाहीत. परिणामी सर्वच बोयाज सध्या खवळलेल्या समुद्रात संकटात सापडली आहेत. मेरिटाईम बोर्डाच्या दुर्लक्षामुळे हे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेपर्यंत सागरात किनाऱ्यालगत अशी १६ बोयाज आहेत. रत्नागिरीच्या समुद्रात असलेल्या तीनपैकी दोन बोयाज साखळ्या तुटून खोल सागरात वाहून गेली आहेत. मालवणमधील २, तर वेंगुर्लेतील १ बोयाजही साखळी तुटल्याने सागरात भरकटली आहेत. शासकीय खात्याच्या उदासिनतेचा फटका या बोयाजना बसला असून, हे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आहे. या निष्क्रियतेला जबाबदार कोण, असा सवाल केला जात असून, याबाबत मच्छिमारांतून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)अशी आहे बोयाज यंत्रणा...कोकणच्या संपूर्ण किनाऱ्यावरच १२ ते २८ मीटर खोलीच्या सागरी पाण्यात ही बोयाज नौकानयनाचा सुरक्षित मार्ग दर्शविण्यासाठी ब्रिटीशकाळापासूनच उभारली जात होती. स्वातंत्र्यानंतरही ही सुरक्षा यंत्रणा कायम आहे. बलूनसारख्या आकारातील एका लोखंडी बोयाजचे वजन अडीच ते तीन टनापर्यंत असते. त्याची किंमत २ लाखापर्यंत असून, त्यावर दीड लाख रुपये किमतीचा सौरऊर्जेवर चालणारा दिवा बसविलेला असतो. लोखंडाच्या जाड साखळीत हा बोया अडकवून साखळीचे दुसरे टोक ४ ते ५ टन वजनाच्या सिमेंट ब्लॉकला अडकवून सिमेंट ब्लॉक बार्जद्वारे सागरात सोडला जातो. त्याद्वारे हे बोयाज सप्टेंबर महिन्यात स्थिर केले जाते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यात बार्जद्वारेच ही बोयाज साखळी वर खेचून व सिमेंट ब्लॉकची साखळी तोडून बार्ज (नौका) मध्ये घेतले जाते व सिमेंट ब्लॉक पाण्यात सोडून दिला जातो.