शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

तंटामुक्त समित्या राहताहेत...कागदोपत्री

By admin | Updated: February 9, 2017 00:29 IST

निर्माण होणारे तंटे थेट पोलिसांकडे : स्पर्धेसह पुरस्कारांची भासतेय उणीव; शासन दुर्लक्षाने विश्वासाला उतरती कळा

 महेश चव्हाण ल्ल ओटवणेगावातील तंटे सामंजस्याने गावातच मिटवून मैत्रीपूर्ण सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने साकारलेली महात्मा गांधी तंटामुक्ती समित्या सध्या कागदावरच तंटे सोडविताना दिसत आहेत. सन २००७ साली तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेला हा गाव पातळीवरील उपक्रम सुरूवातीस आदर्शवत ठरला. तळागाळाच्या गावांमध्ये या समित्या कार्यरत होऊन गावातच न्यायनिवाडे होऊ लागले आणि पुन्हा एकदा गाव चव्हाट्यावरील न्यायनिवाड्याची जुनी रंगत आणि त्यातून सलोख्याने मिळणारे न्याय १९ व्या शतकाची आठवण देऊ लागले. गावातच मैत्रीपूर्ण वातावरणात मिटणाऱ्या तंट्यामुळे समितीची व्याप्ती वाढू लागली आणि गावात सलोखा नांदू लागला. मात्र, सध्या या तंटामुक्ती समित्यांचे काम बंद पडल्यात जमा आहे.शासनस्तरावरून विशेष करून गृहखात्याकडून गाव तंटामुक्त करणाऱ्या समित्यांना पुरस्कार, विशेष पुरस्कार जाहीर झाले. तब्बल १ लाख रूपयांपासून ते ३ लाख रूपयांपर्यंतची धनादेशी रक्कम स्थानिक ग्रामपंचायतींना देण्यात आली. त्यामुळे आपसुकच या तंटामुक्ती समित्यांना गाव पातळीवर हत्तीचे बळ येऊ लागले. गाव पातळीवरील तंटामुक्तीचे उल्लेखनीय कार्य, पुरस्कार स्वरूप शासनाकडून मिळणारी रक्कम व समितीकडे लोकांचा वाढता ओघ यामुळे तंटामुक्त समित्या गाव विकासाच्या अविभाज्य घटक बनू लागल्या. पण मागील दोन वर्षांत समितीकडे गावातील येणाऱ्या छोट्या-मोठ्या तंट्यांची गर्दी असायची. पण आता या समित्या तंट्याविना निपचित पडल्या आहेत. तर काही समित्यांना नाईलाजास्तव कागदोपत्री तंटे दाखवून अस्तित्व अबाधित ठेवण्याची वेळ येऊ लागली. गावातील तंटे समितीकडे येत नाहीत, म्हणजे कदाचित गाव तंटामुक्त असेल. पण तसे नाही. गावात तंटे निर्माण होतात, पण ते समितीकडे न येता पोलीस ठाणे किंवा न्यायालयात जातात. महात्मा गांधी तंटामुक्ती समिती म्हणजे गावाच्या सामाजिक व एकात्मक विकासगंगेची अविभाज्य घटक होय. पण त्याकडे प्रकर्षाने बघण्याची मानसिकता शासनाची नाही. आघाडी सरकार असताना या समित्यांना चार चाँद लागले होते. समिती आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी पारितोषिकांसहीत विविध प्रोत्साहनपर प्रयत्न झाले. पण सत्ता परिवर्तन म्हणजे युतीच्या सध्याच्या काळात कुठेतरी शासन कमी पडल्याची भावना या समितीच्या पदाधिकाऱ्यांतून व्यक्त होत आहे. दरवर्षी संस्था बांधणी होते. गावातील प्रेरणादायी तसेच तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती होते. पण लोकसमुदाय मात्र या समित्यांपासून हरवलेलाच आहे. तसेच समितीवरील आर्थिक भार उचलताना पदाधिकाऱ्यांची मानसिकता आखुडते आणि त्याचा परिणाम बैठकांवर होतो. अर्थातच तंट्यावर होतो. गाव एकोप्याचा मुख्य भाग या समित्या आहेत. यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हायला हवेत.