शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सामूहिकपणे होतेय बुध्दविहाराची स्वच्छता

By admin | Updated: September 18, 2014 23:22 IST

गेल्या दहा वर्षांपासून सामूहिक पद्धतीने केली जात आहे. घर म्हटल की स्वच्छता

चिपळूण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये बुद्धधम्माची दीक्षा घेतली. विशिष्ट जातीचा समावेश असलेल्या देशभरातील लाखो अनुयायांनी या धम्माची दीक्षा घेतली. पूर्वीच्या काळी बुद्धविहारे विरळ होती. आता प्रत्येक गावात एक तरी बुद्धविहार पाहायला मिळते. चिपळूण तालुक्यातील पाग - बौद्धवाडी येथे बांधण्यात आलेल्या बुद्धविहाराची स्वच्छता गेल्या दहा वर्षांपासून सामूहिक पद्धतीने केली जात आहे. घर म्हटल की स्वच्छता आली. घराबरोबरच परिसराची स्वच्छता व्हायला हवी. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून संत गाडगेबाबांनी स्वत: झाडू हातात घेतला आणि स्वच्छतेचे महत्त्व सर्वधर्मीय समाजबांधवांना पटवून दिले. स्वच्छतेमुळे आरोग्यही निरोगी राहाते. राज्य शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु केले. त्याचे अनुकरण आजही काही ठिकाणी केले जात असल्याचे चित्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा घेतल्यानंतर या धम्माचे अनुकरण करणाऱ्या समाज बांधवांनी पिंपळाच्या झाडाखाली पूजा पाठ करण्यास प्रारंभ केला. पाग - बौद्धवाडी येथे जुना पिंपळ असून, येथे धार्मिक कार्यक्रमही केले जात असत. हे सारे घडत असताना एखादे बुद्धविहार असावे, अशी संकल्पना जुन्या जाणत्या कार्यकर्त्याच्या मनात आली. सामुहिकपणे पागेवरील बुध्दविहाराची स्वच्छता करण्यात येत असल्याबद्दल अनेकांनी या मंडळींचे अभिनंदन केले. बुद्धविहार बांधण्यासाठी दानशूर व प्रतिष्ठित व्यक्ती प्रत्येक घरातील मंडळींच्या हातून आर्थिक मदत जमा करुन आॅक्टोबर २००४ मध्ये बुद्धविहाराची संकल्पना पूर्णत्त्वास गेली. इमारत उभी राहिल्याने विविध धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी जागाही उपलब्ध झाली. मात्र, या विहाराची स्वच्छता झाली तरच या विहाराचे पावित्र्य अबाधित राहील. या विचारातून वाडीतील प्रत्येक घरातील व्यक्तींकडे स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली. आळीपाळीने दररोज या विहाराची साफसफाई केली जात असून, पूजापाठही घेतला जात आहे. गेली दहा वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरु असून, याचा आदर्श अन्य गावांनी घेण्यासारखा आहे. (वार्ताहर)