शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

सामूहिकपणे होतेय बुध्दविहाराची स्वच्छता

By admin | Updated: September 18, 2014 23:22 IST

गेल्या दहा वर्षांपासून सामूहिक पद्धतीने केली जात आहे. घर म्हटल की स्वच्छता

चिपळूण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये बुद्धधम्माची दीक्षा घेतली. विशिष्ट जातीचा समावेश असलेल्या देशभरातील लाखो अनुयायांनी या धम्माची दीक्षा घेतली. पूर्वीच्या काळी बुद्धविहारे विरळ होती. आता प्रत्येक गावात एक तरी बुद्धविहार पाहायला मिळते. चिपळूण तालुक्यातील पाग - बौद्धवाडी येथे बांधण्यात आलेल्या बुद्धविहाराची स्वच्छता गेल्या दहा वर्षांपासून सामूहिक पद्धतीने केली जात आहे. घर म्हटल की स्वच्छता आली. घराबरोबरच परिसराची स्वच्छता व्हायला हवी. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून संत गाडगेबाबांनी स्वत: झाडू हातात घेतला आणि स्वच्छतेचे महत्त्व सर्वधर्मीय समाजबांधवांना पटवून दिले. स्वच्छतेमुळे आरोग्यही निरोगी राहाते. राज्य शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु केले. त्याचे अनुकरण आजही काही ठिकाणी केले जात असल्याचे चित्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा घेतल्यानंतर या धम्माचे अनुकरण करणाऱ्या समाज बांधवांनी पिंपळाच्या झाडाखाली पूजा पाठ करण्यास प्रारंभ केला. पाग - बौद्धवाडी येथे जुना पिंपळ असून, येथे धार्मिक कार्यक्रमही केले जात असत. हे सारे घडत असताना एखादे बुद्धविहार असावे, अशी संकल्पना जुन्या जाणत्या कार्यकर्त्याच्या मनात आली. सामुहिकपणे पागेवरील बुध्दविहाराची स्वच्छता करण्यात येत असल्याबद्दल अनेकांनी या मंडळींचे अभिनंदन केले. बुद्धविहार बांधण्यासाठी दानशूर व प्रतिष्ठित व्यक्ती प्रत्येक घरातील मंडळींच्या हातून आर्थिक मदत जमा करुन आॅक्टोबर २००४ मध्ये बुद्धविहाराची संकल्पना पूर्णत्त्वास गेली. इमारत उभी राहिल्याने विविध धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी जागाही उपलब्ध झाली. मात्र, या विहाराची स्वच्छता झाली तरच या विहाराचे पावित्र्य अबाधित राहील. या विचारातून वाडीतील प्रत्येक घरातील व्यक्तींकडे स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली. आळीपाळीने दररोज या विहाराची साफसफाई केली जात असून, पूजापाठही घेतला जात आहे. गेली दहा वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरु असून, याचा आदर्श अन्य गावांनी घेण्यासारखा आहे. (वार्ताहर)