शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणकर अजूनही पिताहेत गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : महापूर ओसरून आज दोन महिने उलटले तरी त्याचे परिणाम चिपळूणकरांना अजूनही भोगावे लागत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : महापूर ओसरून आज दोन महिने उलटले तरी त्याचे परिणाम चिपळूणकरांना अजूनही भोगावे लागत आहेत. पुरासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आल्याने वाशिष्ठी नदी गढूळ झाली. त्यानंतर आजतागायत ही परिस्थिती कायम आहे. परिणामी या नदीवरील नगर परिषद व अन्य ग्रामपंचायतींच्या पाणी योजनेतून गढूळ पाणीपुरवठा होत असून, शहरातील अनेक हॉटेलमध्येही तीच परिस्थिती असल्याने ग्राहकांसह नागरिक हैराण झाले आहेत.

येथे २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुराने चिपळूणकरांची दयनीय अवस्था केली. या महापुरात अवघे चिपळूण शहर उद्ध्वस्त झाले. या प्रसंगातून चिपळूणकर आजही सावरलेले नाहीत. महापुरामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांमध्ये गढूळ पाण्याची समस्या डोकेदुखी बनली आहे. अतिवृष्टीत कोयना धरणापासून कोळकेवाडी धरणाकडे येणाऱ्या जलप्रवाहात डोंगराचा मोठा भाग खचल्याने तेथील माती मोठ्या प्रमाणात वाशिष्ठी नदीला वाहून आली. गाळाचे हे प्रमाण इतके होते की शहरातील बहुतांशी रस्ते गाळात रुतले होते. पूर ओसरल्यानंतरही केवळ गाळामुळे काही गावांचा व वाडी वस्तीचा संपर्क काही दिवस तुटला होता. त्यातच बहुतांशी भागातील शेतीचे गाळामुळे अस्तित्वच संपून गेले आहे.

अजूनही अनेक ठिकाणी गाळ साचलेला असून पावसासोबत तो थेट नदीपात्रात वाहून येतो. पूर ओसरल्यानंतरही सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथील वाशिष्ठी नदीचे पाणी आजही गढूळ आहे. त्यामुळे नदीवर अवलंबून असलेल्या पाणी योजनांनाही गढूळ पाणीपुरवठा होत आहे. विशेषतः नगर परिषदेच्या दोन्ही जॅकवेल वाशिष्ठी नदीवर असून, या पाणी योजनेलाही गढूळ पाणीपुरवठा होत आहे. काही योजनांचे पंपहाऊस गाळामुळे निकामी झाले. अजूनही काही योजनांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. याच पद्धतीने अनेक हॉटेलमधील कुलर व शुद्धीकरण केंद्र निकामी झाल्याने अनेक ठिकाणी गढूळ पाणी ग्राहकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढली आहे.

.................

...तर धोका वाढला असता!

महापूर ओसरल्यानंतर काही तासांतच रत्नागिरी, जयगड, अलिबाग व अन्य भागांतील अनेक सामाजिक संस्था पाण्याच्या बाटल्या घेऊन दाखल झाले. त्यानंतर किमान पंधरा दिवस सातत्याने पाण्याचा पुरवठा केला जात होता. लाखोंच्या संख्येने बाटल्या पुरविण्यात आल्या. त्यामुळे या कालावधीत साथीच्या रोगांवर नियंत्रण राहिले. मात्र, आता पाण्याच्या बाटल्या पुरवल्या जात नसल्याने त्याचा परिणाम दिसू लागला आहे. शहरासह लगतच्या गावांमध्येही डेंग्यू, मलेरिया व अन्य साथीचे रुग्ण आढळून येत आहेत.