शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

चिपळूणकर अजूनही पिताहेत गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : महापूर ओसरून आज दोन महिने उलटले तरी त्याचे परिणाम चिपळूणकरांना अजूनही भोगावे लागत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : महापूर ओसरून आज दोन महिने उलटले तरी त्याचे परिणाम चिपळूणकरांना अजूनही भोगावे लागत आहेत. पुरासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आल्याने वाशिष्ठी नदी गढूळ झाली. त्यानंतर आजतागायत ही परिस्थिती कायम आहे. परिणामी या नदीवरील नगर परिषद व अन्य ग्रामपंचायतींच्या पाणी योजनेतून गढूळ पाणीपुरवठा होत असून, शहरातील अनेक हॉटेलमध्येही तीच परिस्थिती असल्याने ग्राहकांसह नागरिक हैराण झाले आहेत.

येथे २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुराने चिपळूणकरांची दयनीय अवस्था केली. या महापुरात अवघे चिपळूण शहर उद्ध्वस्त झाले. या प्रसंगातून चिपळूणकर आजही सावरलेले नाहीत. महापुरामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांमध्ये गढूळ पाण्याची समस्या डोकेदुखी बनली आहे. अतिवृष्टीत कोयना धरणापासून कोळकेवाडी धरणाकडे येणाऱ्या जलप्रवाहात डोंगराचा मोठा भाग खचल्याने तेथील माती मोठ्या प्रमाणात वाशिष्ठी नदीला वाहून आली. गाळाचे हे प्रमाण इतके होते की शहरातील बहुतांशी रस्ते गाळात रुतले होते. पूर ओसरल्यानंतरही केवळ गाळामुळे काही गावांचा व वाडी वस्तीचा संपर्क काही दिवस तुटला होता. त्यातच बहुतांशी भागातील शेतीचे गाळामुळे अस्तित्वच संपून गेले आहे.

अजूनही अनेक ठिकाणी गाळ साचलेला असून पावसासोबत तो थेट नदीपात्रात वाहून येतो. पूर ओसरल्यानंतरही सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथील वाशिष्ठी नदीचे पाणी आजही गढूळ आहे. त्यामुळे नदीवर अवलंबून असलेल्या पाणी योजनांनाही गढूळ पाणीपुरवठा होत आहे. विशेषतः नगर परिषदेच्या दोन्ही जॅकवेल वाशिष्ठी नदीवर असून, या पाणी योजनेलाही गढूळ पाणीपुरवठा होत आहे. काही योजनांचे पंपहाऊस गाळामुळे निकामी झाले. अजूनही काही योजनांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. याच पद्धतीने अनेक हॉटेलमधील कुलर व शुद्धीकरण केंद्र निकामी झाल्याने अनेक ठिकाणी गढूळ पाणी ग्राहकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढली आहे.

.................

...तर धोका वाढला असता!

महापूर ओसरल्यानंतर काही तासांतच रत्नागिरी, जयगड, अलिबाग व अन्य भागांतील अनेक सामाजिक संस्था पाण्याच्या बाटल्या घेऊन दाखल झाले. त्यानंतर किमान पंधरा दिवस सातत्याने पाण्याचा पुरवठा केला जात होता. लाखोंच्या संख्येने बाटल्या पुरविण्यात आल्या. त्यामुळे या कालावधीत साथीच्या रोगांवर नियंत्रण राहिले. मात्र, आता पाण्याच्या बाटल्या पुरवल्या जात नसल्याने त्याचा परिणाम दिसू लागला आहे. शहरासह लगतच्या गावांमध्येही डेंग्यू, मलेरिया व अन्य साथीचे रुग्ण आढळून येत आहेत.