शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
3
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
4
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
5
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
6
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
7
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
8
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
9
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
10
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
11
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
12
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
13
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
14
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
15
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
16
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
18
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
19
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
20
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

लाचखोर अद्याप शिरजोरच..

By admin | Updated: July 4, 2014 23:43 IST

तक्रारींत वाढ : सहा महिन्यात ६ जणांवर कारवाई

प्रकाश वराडकर : रत्नागिरी .गेल्या दोन वर्षांच्या काळात अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्या लाचखोरीविरोधात जनतेच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यांंच्या काळात रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ जणांविरोधात कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन लाचखोरी प्रकरणांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत कोणतेही काम ‘वजन’ ठेवल्याशिवाय होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या कठोर कारवाईनंतरही शिरजोर बनलेल्या लाचखोरांमुळे ‘वजन काही चुकेना’, अशी नागरिकांची स्थिती झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत झालेल्या कारवायांमध्ये ज्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपी निलंबित आहेत. मालगुंड येथे तलाठी म्हणून काम करणारे अशोक हुल्लाप्पा गांजुलवार यांना १५ हजारांची लाच स्वीकारताना १६ जानेवारी २०१४ रोजी रंगेहात पकडण्यात आले. राजापूर ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक महेश सखाराम पवार याच्यावर २७ जानेवारी २०१४ रोजी दोन हजार रुपये लाचप्रकरणी सापळा लावून कारवाई केली. रत्नागिरी नगररचना कार्यालयातील लिपिक राजन गजानन बेंद्रे याला ३० एप्रिल २०१४ रोजी २ हजारांची लाच घेताना अटक झाली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत देवरुख उपविभाग कनिष्ठ अभियंता संतोष यशवंत भालेकर याला २८ जून २०१४ रोजी १३ हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर अवघ्या चारच दिवसांनी देवरुखमध्ये या विभागाने दुसरी कारवाई ३ जुलै रोजी केली. त्यात देवरुखच्या उपकोषागार कार्यालयातील दीपाली दिलीप केळकर या कर्मचारी महिलेस ५०० रुपये लाच घेताना सापळा रचून पकडण्यात आले. तसेच अपसंपदा प्रकरणी रत्नागिरी विभागाचे उपअधीक्षक विराग पारकर यांनी कर्जत येथे जाऊन कर्जतचे तहसीलदार युवराज बांगर यांच्याविरोधात १९ जून २०१४ रोजी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यभार असल्याने जून महिन्यात तेथील दोन सापळे रचून कारवाई करण्यात आली. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रत्नागिरीसह सिंधुदुर्गचाही कार्यभार असल्याने नजीकच्या काळात दोन्ही जिल्ह्यातील अशा अनेक केसेस पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)