शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

बोटिंग प्रकल्प पर्यटकांना आकर्षित करतोय

By admin | Updated: September 5, 2014 23:31 IST

जलपर्यटन : मोडकाआगर धरणाने घेतले रोजगार निर्मितीचे नवे रूप

असगोली : अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेल्या गुहागर तालुक्यातील मोडकाआगर धरणामध्ये असणारा बोटिंग प्रकल्प पर्यटकांसाठी पर्वणी ठरला आहे. पावसाळ्यातदेखील या बोटिंगचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहे. या बोटिंग प्रकल्पामुळे गुहागरचा आर्थिक विकास होणार आहे. गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या धरणामध्ये बोटिंग प्रकल्पाने पर्यटनामध्ये आपले यशस्वी नाव कोरले आहे. येथे आणखी सोयीसुविधा शासनाने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी पर्यटकांमधून व्यक्त होत आहे. २००६ साली दुर्लक्षित असलेल्या मोडका आगर धरणामध्ये गुहागर पर्यटन विकास संस्थेच्या उज्ज्वला रहाटे यांनी धाडसाने बोटिंग प्रकल्प सुरु केला. गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या धरणाला बोटिंग प्रकल्पामुळे नवसंजीवनी मिळाली. येथे मुंबई - पुणे तसेच परदेशी पर्यटकांची ये-जा सुरु झाली. तालुका व जिल्ह्यातील पर्यटनप्रेमी आपल्या कुटुंबासमवेत निसर्गाच्या सौंदर्याची मजा लुटण्याबरोबर जल पर्यटनाची मजा घेऊ लागले.गुहागर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत व समुद्र किनारी वसलेल्या अतिशय सुंदर गावाला देखणा समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यावर मिळणारे शंखशिंपले, समुद्रस्थान, डोलणाऱ्या नारळी - पोफळीच्या बागा, पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिरे, शिवरायांचा गोपाळगड अशा अनेक गोष्टी मनाला भुरळ पाडणाऱ्या आहेत. त्यामुळे बोटिंग प्रकल्पामुळे आणखीनच भर पडली आहे. परंतु तालुक्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अजूनही येथे काही गोष्टी गरजेच्या आहेत. त्यामध्ये धरणावरील असलेल्या बेटावर जंगल सफर, रॅपलिंग, निसर्गाेपचार केंद्र, लेक क्रॉसिंग प्रदूषणविरहीत साहसी व करमणूक खेळांचा नियोजनबद्ध विकास, सुसज्ज गार्डन, अल्पोपाहार आदी महत्त्वाच्या गोष्टींमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. सध्या तेथे लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या खेळांचे साहित्य उपलब्ध आहे. त्याचा आनंद लहान मुले घेताना दिसत आहेत.ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. गुहागर तालुक्यात निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. यामुळे वर्षभर पर्यटकांची मांदियाळी असते. गुहागरात जल पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटन करणे महत्त्वाचे असून, या उपक्रमांमुळे अधिक पर्यटक गुहागरला येतील. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)