शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत बाप्पाने आणले चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:31 IST

कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव आणि शिमगा हे दोन सण अत्यंत उत्साहाने साजरे होतात. होळीच्या दिवसात बाजारपेठेला ...

कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव आणि शिमगा हे दोन सण अत्यंत उत्साहाने साजरे होतात. होळीच्या दिवसात बाजारपेठेला फारशी चालना मिळत नाही. पण गणेशोत्सवात मात्र बाजारपेठेला मोठा आधार मिळतो. या वेळी १५ ऑगस्टपासून सरकारने निर्बंध शिथिल केल्यामुळे बाजारपेठ रात्री आठ वाजेपर्यंत उघडी राहण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याचा खूप मोठा फायदा झाला. सर्वच ठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे क्षण आले ते गणेशोत्सवामुळेच.

तिसरी लाट येणार, अशी चर्चा दुसरी लाट तीव्र असतानाच सुरू होती. त्यामुळे गणेशोत्सव धडपणे साजरा करता येईल की नाही, अशी भीती आधीपासून होती. पण सुदैवाने कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आणि म्हणून बाजारावरचे निर्बंधही कमी झाले. त्यामुळेच मुंबईकरांच्या येण्याचा मार्गही मोकळा झाला. चाकरमानी येणार म्हटल्यावर बाजारपेठेला चैतन्य येणार, हेही निश्चित झाले.

.............................

रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६६ हजार घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. या मूर्तिकामातूनच जवळपास ३ ते ४ कोटींची उलाढाल झाली आहे. कोरोनामुळे लोकांच्या उत्पन्नावर मर्यादा आली असली तरी गणपती बनवण्यासाठी लागणारे साहित्य महाग झाले असल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. त्यातून झालेली उलाढाल खूप मोठी आहे.

..................

गणपतीसाठी आरास करण्याची प्रथा शेकडो वर्षांची जुनी. पूर्वी आरास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वेलीझुडपांचा वापर होत होता. त्याला रत्नागिरी जिल्ह्यात मंडपी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात माटवी म्हणतात. त्याला शेरवाडे, सोनतळ, आगलावी (अग्निशिखा), कळलावी, कौंडाळं यांचा समावेश त्यात असायचा. आता काळानुसार त्यात बदल झाले आणि मंडपीची जागा कृत्रिम/तयार साहित्याने घेतली आहे. वेगवेगळ्या प्रकारची मखरे हा आता सजावटीचा मुख्य भाग झाला आहे. आधी त्यासाठी थर्माकोलचा वापर केला जात होता. मात्र आता थर्माकोलच्या वापरावर बंदी असल्याने कापडी मखर केले जाते. त्यासाठी बाजारात वेगवेगळे पर्याय आहेत. एकच मखर सातत्याने वापरले जात नाही. दरवर्षी वेगळे मखर वापरले जाते. त्यामुळे त्यातून दरवर्षी मोठी उलाढाल होते. यंदाही हा बाजार तेजीत होता.

............................

गणपतीचे पूजा साहित्य आणि मिठाई या दोन गोष्टी तर सर्वात महत्त्वाच्या. दीड दिवसाच्या गणपतीपासून ते २१ दिवसांच्या गणपतीपर्यंत प्रत्येक वेळी लागणाऱ्या पूजा साहित्य विक्रीतून मोठी उलाढाल होते. वाती, कापूर, वस्त्र, हळद-पिंजर, सुकामेवा याची विक्री खूप मोठ्या प्रमाणात होते. गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी मोदकाच्या आकाराचे पेढे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. दुसऱ्याकडे गणपती दर्शनाला जाताना मिठाई नेण्याची पद्धत आहे. त्यासाठी होणारा खपही खूप मोठा आहे. त्यामुळे मिठाई विक्रीनेही कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत.

.........................

बाजारपेठ बंद असल्याने दुकानदारांची आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे. कोरोनामुळे घराघरातले अर्थकारण बदलले आहे. लोकांनी आपले खर्च आटोक्यात आणले आहेत. मात्र गणेशोत्सवात लोकांनीही खर्चाची मर्यादा वाढवली. वर्षातून एकदाच येणारा आणि सर्वात लाडका सण असल्याने त्यासाठी लोकांनी खर्चावर बंधने ठेवली नाहीत. त्यामुळेही बाजारपेठेला चांगली चालना मिळाली आहे.