शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

बाजारपेठेत बाप्पाने आणले चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:31 IST

कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव आणि शिमगा हे दोन सण अत्यंत उत्साहाने साजरे होतात. होळीच्या दिवसात बाजारपेठेला ...

कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव आणि शिमगा हे दोन सण अत्यंत उत्साहाने साजरे होतात. होळीच्या दिवसात बाजारपेठेला फारशी चालना मिळत नाही. पण गणेशोत्सवात मात्र बाजारपेठेला मोठा आधार मिळतो. या वेळी १५ ऑगस्टपासून सरकारने निर्बंध शिथिल केल्यामुळे बाजारपेठ रात्री आठ वाजेपर्यंत उघडी राहण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याचा खूप मोठा फायदा झाला. सर्वच ठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे क्षण आले ते गणेशोत्सवामुळेच.

तिसरी लाट येणार, अशी चर्चा दुसरी लाट तीव्र असतानाच सुरू होती. त्यामुळे गणेशोत्सव धडपणे साजरा करता येईल की नाही, अशी भीती आधीपासून होती. पण सुदैवाने कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आणि म्हणून बाजारावरचे निर्बंधही कमी झाले. त्यामुळेच मुंबईकरांच्या येण्याचा मार्गही मोकळा झाला. चाकरमानी येणार म्हटल्यावर बाजारपेठेला चैतन्य येणार, हेही निश्चित झाले.

.............................

रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६६ हजार घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. या मूर्तिकामातूनच जवळपास ३ ते ४ कोटींची उलाढाल झाली आहे. कोरोनामुळे लोकांच्या उत्पन्नावर मर्यादा आली असली तरी गणपती बनवण्यासाठी लागणारे साहित्य महाग झाले असल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. त्यातून झालेली उलाढाल खूप मोठी आहे.

..................

गणपतीसाठी आरास करण्याची प्रथा शेकडो वर्षांची जुनी. पूर्वी आरास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वेलीझुडपांचा वापर होत होता. त्याला रत्नागिरी जिल्ह्यात मंडपी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात माटवी म्हणतात. त्याला शेरवाडे, सोनतळ, आगलावी (अग्निशिखा), कळलावी, कौंडाळं यांचा समावेश त्यात असायचा. आता काळानुसार त्यात बदल झाले आणि मंडपीची जागा कृत्रिम/तयार साहित्याने घेतली आहे. वेगवेगळ्या प्रकारची मखरे हा आता सजावटीचा मुख्य भाग झाला आहे. आधी त्यासाठी थर्माकोलचा वापर केला जात होता. मात्र आता थर्माकोलच्या वापरावर बंदी असल्याने कापडी मखर केले जाते. त्यासाठी बाजारात वेगवेगळे पर्याय आहेत. एकच मखर सातत्याने वापरले जात नाही. दरवर्षी वेगळे मखर वापरले जाते. त्यामुळे त्यातून दरवर्षी मोठी उलाढाल होते. यंदाही हा बाजार तेजीत होता.

............................

गणपतीचे पूजा साहित्य आणि मिठाई या दोन गोष्टी तर सर्वात महत्त्वाच्या. दीड दिवसाच्या गणपतीपासून ते २१ दिवसांच्या गणपतीपर्यंत प्रत्येक वेळी लागणाऱ्या पूजा साहित्य विक्रीतून मोठी उलाढाल होते. वाती, कापूर, वस्त्र, हळद-पिंजर, सुकामेवा याची विक्री खूप मोठ्या प्रमाणात होते. गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी मोदकाच्या आकाराचे पेढे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. दुसऱ्याकडे गणपती दर्शनाला जाताना मिठाई नेण्याची पद्धत आहे. त्यासाठी होणारा खपही खूप मोठा आहे. त्यामुळे मिठाई विक्रीनेही कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत.

.........................

बाजारपेठ बंद असल्याने दुकानदारांची आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे. कोरोनामुळे घराघरातले अर्थकारण बदलले आहे. लोकांनी आपले खर्च आटोक्यात आणले आहेत. मात्र गणेशोत्सवात लोकांनीही खर्चाची मर्यादा वाढवली. वर्षातून एकदाच येणारा आणि सर्वात लाडका सण असल्याने त्यासाठी लोकांनी खर्चावर बंधने ठेवली नाहीत. त्यामुळेही बाजारपेठेला चांगली चालना मिळाली आहे.