शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

वादळग्रस्त तालुक्यात अंगणवाड्या वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST

मंडणगड : निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील ६७ अंगणवाड्यांच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. आजही नुकसानग्रस्त इमारती त्या अवस्थेतच असून, या ...

मंडणगड : निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील ६७ अंगणवाड्यांच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. आजही नुकसानग्रस्त इमारती त्या अवस्थेतच असून, या इमारतींच्या दुरुस्तीकरिता शासनाकडून एकही रुपयांचा निधी मंजूर न झाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. नुकसानग्रस्त इमारतींची दुरुस्ती न झाल्यास लहान बालकांना बसावायचे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात एकूण १६६ अंगणवाडी आहेत. त्यापैकी ६७ अंगणवाड्यांना स्वमालकीच्या इमारती आहेत, तर उर्वरित ९९ अंगणवाड्या या समाजमंदिरे, खासगी जागा व शाळांच्या इमारतीमध्ये भरवण्यात येतात.

शून्य ते सहा वर्षे वयोगटातील सुमारे ३,५९४ बालके अंगणवाड्यांतून शिक्षण घेतात. निसर्ग चक्रीवादळात अंगणवाडी इमारतींचे छप्पर, पत्रे उडाले तर काही ठिकाणी इमारती मोडल्या. त्याचे पंचनामे करण्यात आले असून, दुरुस्तीचा अहवाल महिला व बालकल्याण विभाग रत्नागिरी यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती प्रभारी अधिकारी व पर्यवेक्षिका एस. मालोंडकर यांच्याकडून प्राप्त झाली आहे. तसेच वेळोवेळी होणाऱ्या सभांमध्येही अंगणवाड्यांच्या नुकसानीची बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त अंगणवाड्या आजही त्याच अवस्थेत आहेत.

पाच वर्षांपासून प्रकल्प अधिकारी पद रिक्त

तालुक्यातील मोठ्या अंगणवाड्या ११९ असून १०६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत, तर १३ पदे रिक्त आहेत तसेच मदतनीसांची १०१ पदे कार्यरत असून १८ पदे रिक्त आहेत. ४७ मिनी अंगणवाड्यातील ९ पदे रिक्त आहेत. तालुक्याण्या महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयात ५ सुपरवायझर पदे मंजूर असून यापैकी २ पदे रिक्त आहेत, तर प्रकल्प अधिकाऱ्यांचे पद गेली पाच वर्षे रिक्त असून प्रभारींच्या माध्यमातून या पदाचा कार्यभार चालविला जात आहे.