शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वादळग्रस्त तालुक्यात अंगणवाड्या वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST

मंडणगड : निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील ६७ अंगणवाड्यांच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. आजही नुकसानग्रस्त इमारती त्या अवस्थेतच असून, या ...

मंडणगड : निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील ६७ अंगणवाड्यांच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. आजही नुकसानग्रस्त इमारती त्या अवस्थेतच असून, या इमारतींच्या दुरुस्तीकरिता शासनाकडून एकही रुपयांचा निधी मंजूर न झाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. नुकसानग्रस्त इमारतींची दुरुस्ती न झाल्यास लहान बालकांना बसावायचे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात एकूण १६६ अंगणवाडी आहेत. त्यापैकी ६७ अंगणवाड्यांना स्वमालकीच्या इमारती आहेत, तर उर्वरित ९९ अंगणवाड्या या समाजमंदिरे, खासगी जागा व शाळांच्या इमारतीमध्ये भरवण्यात येतात.

शून्य ते सहा वर्षे वयोगटातील सुमारे ३,५९४ बालके अंगणवाड्यांतून शिक्षण घेतात. निसर्ग चक्रीवादळात अंगणवाडी इमारतींचे छप्पर, पत्रे उडाले तर काही ठिकाणी इमारती मोडल्या. त्याचे पंचनामे करण्यात आले असून, दुरुस्तीचा अहवाल महिला व बालकल्याण विभाग रत्नागिरी यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती प्रभारी अधिकारी व पर्यवेक्षिका एस. मालोंडकर यांच्याकडून प्राप्त झाली आहे. तसेच वेळोवेळी होणाऱ्या सभांमध्येही अंगणवाड्यांच्या नुकसानीची बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त अंगणवाड्या आजही त्याच अवस्थेत आहेत.

पाच वर्षांपासून प्रकल्प अधिकारी पद रिक्त

तालुक्यातील मोठ्या अंगणवाड्या ११९ असून १०६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत, तर १३ पदे रिक्त आहेत तसेच मदतनीसांची १०१ पदे कार्यरत असून १८ पदे रिक्त आहेत. ४७ मिनी अंगणवाड्यातील ९ पदे रिक्त आहेत. तालुक्याण्या महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयात ५ सुपरवायझर पदे मंजूर असून यापैकी २ पदे रिक्त आहेत, तर प्रकल्प अधिकाऱ्यांचे पद गेली पाच वर्षे रिक्त असून प्रभारींच्या माध्यमातून या पदाचा कार्यभार चालविला जात आहे.