शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

नववी, अकरावीचे ४० हजार ३०५ विद्यार्थी वरच्या वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने पहिली ते आठवीपर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने पहिली ते आठवीपर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५८४ शाळांमधील ४० हजार ३०५ विद्यार्थ्यांना ‘वरच्या वर्गात’ ढकलण्यात आले आहे.

गतवर्षी कोरोनामुळे दि. १५ मार्चपासून शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. कोरोना रुग्ण वाढल्यामुळे सुरक्षिततेसाठी परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दहावीचा एक पेपर रद्द करून मुलांना एकूण निकालावरून गुणांकन देण्यात आले होते. जूनमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले, मात्र कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करणे अशक्य असल्यामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू झाले. नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. त्यानंतर जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग पालकांच्या संमतीने सुरू झाले. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग मात्र अद्याप ऑनलाइन सुरू होते.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक सुरू झाल्याने शासनाला अखेर शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. वास्तविक एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा सुरू होतात. काही शाळांच्या परीक्षा सुरूही झाल्या होत्या. शनिवार दि. ३ एप्रिल रोजी अखेर शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थी पास करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता दि. ७ एप्रिल रोजी नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या नववीच्या ४३२ शाळांमधील २२ हजार ५७९ व बारावीचे १५२ कनिष्ठ महाविद्यालयातील १७ हजार ७२६ विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा न देता सलग दोन वर्ष पास करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा झाला असला तरी प्रत्यक्ष या मुलांचे नुकसान झाले आहे.

..........................

दरवर्षी परीक्षा न घेता मुलांना पास करण्यापेक्षा मोजक्या अभ्यासक्रमावर तरी परीक्षा घेणे आवश्यक होते. मुलांना अभ्यास करून परीक्षा देण्याची सवय मोडल्यामुळे पाठांतर, आकलन, इतकेच नव्हे तर लेखनाची सराव संपला आहे. मुले आळशी झाली आहेत.

- गिरजा पाटील, पालक

.................

कोरोनामुळे पहिल्या सत्रातील परीक्षा जर ऑनलाइन घेण्यात आल्या होत्या. तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा रद्द करण्याचे कारण काय? परीक्षा रद्द करून मुलांचे नुकसान झाले आहे. मुलांचे भविष्य मात्र धोक्यात आले आहे.

- प्रतीक्षा रामाणे, पालक

तालुकानिहाय नववी व अकरावीच्या शाळा व पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे

तालुका शाळा विद्यार्थी

मंडणगड ३१ १४००

दापोली ६९ ४०२५

खेड ७३ ५२४३

चिपळूण १०० ८०७२

गुहागर ३८ २५९४

संगमेश्वर ६५ ४२६१

रत्नागिरी ८२ ८५५१

लांजा ३५ २३९८

राजापूर ७१ ३७६१

एकूण ५८४ ४०३०५