शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
6
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
7
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
8
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
9
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
10
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
11
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
13
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
14
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
15
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
16
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
17
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
18
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
19
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
20
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय

जिल्ह्यात परतीच्या पावसाचा २३ हजार हेक्टरला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 02:02 IST

: रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सुमारे २३ हजार हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सुमारे २३ हजार हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे एक हजार ७०१ गावांतील ६७ हजार ४१६ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणांनी १०० टक्के नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. आता शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीचा हात पाहिजे असल्याने त्यांचे डोळे त्याकडे लागले आहेत.रायगड जिल्ह्यातील ९६ हजार २३१ हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने तसेच क्यार, ‘महा’वादळामुळे जोरदार बरसलेल्या पावसाने उभ्या शेतातील पीक आडवे झाले होते. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा मेटाकुटीला आला. सरकारने तातडीने नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.>भातपिकाचे क्षेत्र९६,२३१ हेक्टरनुकसानीचे क्षेत्र२२,८४७.८६ हेक्टरपंचनामे पूर्ण झालेले क्षेत्र२२,८४७.८६ हेक्टरकापणी पश्चात नुकसान झालेले शेतकरी२५,८६०कापणी पश्चात नुकसान झालेले क्षेत्र८,९२८.४७ हेक्टर>शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झालेले शेतकरी४१,५६६शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झालेले क्षेत्र१३,९१९.३९ हेविमा संरक्षण शेतकरी५२१विमा संरक्षण क्षेत्र२९६.९६ हेक्टर>प्रशासनाने युद्धपातळीवर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करून ते आता पूर्ण केले आहेत. सर्वाधिक नुकसान हे रोहे तालुक्यात झाले आहे. तेथील चार हजार १५० हेक्टर क्षेत्रावरील पीक वाया गेले आहे. शेतकºयांची संख्याही दहा हजार ९५२ आहे, तर उरण तालुक्यातील एक हजार ४४७ शेतकºयांचे ५०४ हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे.