शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

रोजी गेली, तरी हजारो कुटुंबीयांना मिळणार रोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST

दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना लाभ

वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. पनवेल तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना या शासनाच्या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. याकरिता शिधापत्रिकाधारकांनी आपल्या जवळील रास्त भाव धान्य दुकानदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून या योजनेचा लाभ घ्यावा. एप्रिल महिन्यात या योजनेअंतर्गत धान्याचे वाटपदेखील सुरू झाले आहे. ज्या लाभार्थ्यांनी एप्रिल महिन्यात या योजनेचा लाभ घेतला नाही, अशा शिधापत्रिकाधारकांना मे महिन्यात या मोफत धान्याचा लाभ घेता येणार आहे.या योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य व प्राधान्य कुटुंबाअंतर्गत प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत धान्य वितरित केले जाणार आहे. पालिका क्षेत्रातील ज्या कुटुंबियांचे उत्पन्न ६९ हजार व पालिका क्षेत्राबाहेरील ज्या कुटुंबियांचे उत्पन्न ४४ हजार आहे, अशांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी दिली आहे. जे दुकानदार या योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यास टाळाटाळ करतील, अशा दुकानदारांची तक्रार तालुका पुरवठा अधिकारी अथवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करण्याचे आवाहनदेखील शासनाने केले आहे.

काय मिळणारतांदूळ आणि गहू या योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य व प्राधान्य कुटुंबाअंतर्गत प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत धान्य वितरित केले जाणार आहे.

शासनाची योजना खरोखर लाभदायक आहे. मात्र या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना आहे. दुकानदारांकडून मोफत धान्य देण्यास टाळाटाळ केली गेल्यास त्यांच्यावर कारवाईची गरज आहे.    - सुरेश लोंढे, लाभार्थी 

शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगार हिरावला गेला असल्याने मोफत धान्यामुळे लाभार्थी कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.    - मोहन पाटील, लाभार्थी

लॉकडाऊन सुरू झाला आहे. दुकानदारांनी लवकरात लवकर या मोफत धान्यांचे वाटप करावे, जेणे करून गरजुंना या योजनेचा लाभ मिळेल.    - कुंदा शिंदे, लाभार्थी