शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

म्हसळा येथे सर्वाधिक पाऊस

By admin | Updated: June 25, 2016 01:54 IST

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६२.७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १५१ मिलीमीटर पाऊस पडला, तर त्या खालोखाल श्रीवर्धन १५० मिमी आणि तळा तालुक्यात ९४ मिमी

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६२.७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १५१ मिलीमीटर पाऊस पडला, तर त्या खालोखाल श्रीवर्धन १५० मिमी आणि तळा तालुक्यात ९४ मिमी पावसाने बरसून गेल्या १५ दिवसांचा बॅकलॉग भरुन काढण्याचा प्रयत्न केला. पावसाच्या दमदार आगमनाने मात्र शेतीच्या कामांना सुरुवात झाल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाला सातत्याने बगल देत मान्सून उशिरा दाखल झाला. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. त्यामुळे मान्सून वेळेवर दाखल होईल, असे वाटत होते मात्र त्याने हुलकावणी दिल्याने मान्सूनचे आगमन तब्बल २० दिवस लांबले. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. त्या करपण्याच्या स्थितीत असल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला होता. त्याचप्रमाणे वातावरणात प्रचंड उष्णता वाढल्याने नागरिकही प्रचंड हैराण झाले होते.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनाही मोठ्या संख्येने सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंता आता त्यानिमित्ताने दूर झाल्याचे दिसून येते. गेल्या २४ तासात सरासरी ६२.७१ मिमी पाऊस बरसला आहे. त्यामुळे नद्या, नाले छोटी-मोठी धरणे, विहिरींमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे टंचाईच्या ठिकाणी काही अंशी समाधानाची स्थिती निर्माण होण्यास मदत मिळत असल्याचे चित्र आहे. पावसाच्या कालावधीत एमएसईडीमार्फत होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामध्ये सातत्याने अडथळे येत असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. (प्रतिनिधी)अलिबाग: शुक्र वारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण १००३.४६मिमी पाऊस झाला असून हे सरासरी पर्जन्यमान ६२.७१ मिमी आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकूण पाऊस १८६५.४० मिमी होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ११६.५९ मिमी होते. यंदाचा पाऊस गतवर्षीच्या सरासरी प्रमाणास अद्याप पोहोचू शकलेला नाही.गेल्या २४ तासांत सरासरी ६२.७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १५१ मिलीमीटर पाऊस पडला, तर त्या खालोखाल श्रीवर्धन १५० मिमी आणि तळा तालुक्यात ९४ मिमी, मुरुड ८७ मिमी, रोहे ८५ मिमी, माणगाव ७३ मिमी, महाड ७२ मिमी, पोलादपूर ५५ मिमी, उरण ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.रोह्यात पावसाचे पुनरागमनरोहा : वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर रोहा तालुक्यात पावसाचे दमदार आगमन झाले होते. परंतु त्या नंतर तीन दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग काहीसा चिंतेत आला होता. परंतु संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर पावसाने तालुक्यात पुनरागमन केल्याने बळीराजा सुखावला असून शेतकऱ्यांनी चिखलणी,तसेच राबांना खत मारणे ही कामे सुरू केली आहेत. मत्स्यप्रेमी जोरदार पावसाची वाट पाहत आहेत. जोरदार पाऊस झाल्यास वळगणीचे मासे खाण्यास मिळतील अशी मासेप्रेमींची अपेक्षा आहे.