शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

पळसनाथाच्या शिल्पसौंदर्याचे जतन होणार का?

By admin | Updated: May 23, 2016 01:55 IST

उजनी जलाशयात गडप झालेल्या पळसनाथ मंदिराचा पुरातनकालीन ठेवा सध्या पर्यटकांना खुणावत आहे. उजनी जलाशयात पाणी आल्यावर मंदिराचे अस्तित्व पुसले जाते

रविकिरण सासवडे,  बारामतीउजनी जलाशयात गडप झालेल्या पळसनाथ मंदिराचा पुरातनकालीन ठेवा सध्या पर्यटकांना खुणावत आहे. उजनी जलाशयात पाणी आल्यावर मंदिराचे अस्तित्व पुसले जाते. वर्षातील १२ महिने हे मंदिर पाण्याखाली असते. तीव्र दुष्काळाच्या काळातच मंदिर पाहावयास मिळते. पाण्याखाली राहूनदेखील मंदिराची वास्तू उजनीच्या लाटांना तोंड देत भक्कमपणे उभी आहे. हा पुरातन कालीन ठेवा जतन होणार का? असा सवाल येथे भेट देणाऱ्या शिल्पप्रेमी पर्यटकांसह, इतिहास संशोधकांमधून विचारला जात आहे. १९७८ साली उजनी जलाशय पूर्ण झाल्यानंतर हे मंदिर कायमस्वरूपी पाण्याखाली गेले. तसेच पळसदेव हे गावदेखील पाण्याखाली गेले. मंदिर पाण्याखाली गेल्यानंतर नवीन वसलेल्या गावात पळसनाथाचे मंदिर बांधण्यात आले. धरणात बुडालेल्या मंदिरातील शिवलिंग या नवीन मंदिरात स्थापन करण्यात आले. त्यामुळे येथील देव वाचला, पण देवाचे घर कायमस्वरूपीच पाण्यात बुडाले. अप्रतिम कलाकुसर असणारे पळसनाथाचे हे मंदिर यादवकालीन हेमाडपंती प्रकारातील आहे. मंदिराचे शिखर, गाभारा, सभामंडप, खांब आजही सुस्थितीत आहेत. सभामंडपाच्या खांबांवरील साखळीचे कोरीवकाम थक्क करणारे आहे. सभामंडपाच्या बाहेरील भिंतीवरील कोरीव नक्षीकामही अप्रतिम आहे. मंदिर संपूर्ण काळ्या पाषाणात तर शिखर चपट्या भाजक्या विटांमध्ये बांधलेले आहे. शिखराच्या एकदम अग्रभागी असणारे सहस्र कमळदेखील आपले सौंदर्य ताठ मानेने दाखवत उभे आहे. मंदिराच्या आवारामध्ये ओवऱ्या, सतीशिळा, चारी बाजूंनी कोरलेल्या विरगळ, भग्न झालेली मारुतीची सुमारे ५ फूट उंच मूर्ती, भंगलेला नंदी व त्यावर एक बसलेली मानवाकृती, मंदिराच्या पाठीमागील बाजूस भग्न झालेली शंकर पार्वतीची मूर्ती, तर तटबंदीला असणारे ढासळलेले प्रवेशद्वारही दिसते. - आणखी छायाचित्रे/८मुख्य मंदिराच्या शेजारीच आणखी एक हेमाडपंती मंदिर उभे आहे. येथील स्थानिक नाविक पोपट नगरे यांनी हे बळीश्वराचे मंदिर असल्याचे सांगितले. या मंदिराची अवस्था मात्र वाईट झाली आहे. मंदिराच्या मोठमोठ्या शिळा ढासळलेल्या आहेत तर काही ढासळण्याच्या स्थितीत आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सभामंडपाच्या बाहेरच्या बाजूस ‘आॅरगन’सारखी रचना असणाऱ्या कोरीव शिळा आहेत. या शिळा वाजवल्यास त्यामधून सात प्रकारचे स्वर ऐकू येतात. थक्क करणारी ही वास्तुरचना आणि त्यामागील शास्त्र यांना सलाम करावासा वाटतो. सभामंडपाच्या एका खांबावर प्राचीन शिलालेख आहे. बारामती, इंदापूर तालुक्यात अनेक ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार ठरलेल्या वास्तू आहेत. या वास्तू इतिहासाच्या आठवणी ताज्या करणाऱ्या आहेत. मात्र, या ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, किल्ले, वाडे दुर्लक्षित राहिल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा ‘लोकमत’ने घेतलेला आढावा.....मंदिर यंदाच्या दुष्काळात संपूर्ण उघडे पडले आणि आपसुकच इतिहासप्रेमी, संशोधक, पर्यटकांची पावले पळसदेवकडे वळली. येथे येणारा प्रत्येक जण ही नखशिखांत सौंदर्याने नटलेली मंदिरे पाहून हळहळ व्यक्त करत आहे. येथील स्थानिक पोपट नगरे यांच्यासारखे नाविक डोळ्यात पाणी अणून ‘साहेब, ही मंदिरे वाचतील का हो’ म्हणून विचारणा करतात.