शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
3
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
4
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
5
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
6
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
7
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
8
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
9
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
10
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
11
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
12
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
13
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
14
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
15
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
16
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
17
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
19
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
20
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”

संचालक मंडळाची देणी आम्ही फेडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2015 00:38 IST

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगामाच्या काळात तत्कालीन अध्यक्षांनी आणि संचालक मंडळाने अगदी ३३०० रुपये दराने मागणी आली,

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगामाच्या काळात तत्कालीन अध्यक्षांनी आणि संचालक मंडळाने अगदी ३३०० रुपये दराने मागणी आली, तरीदेखील साखरविक्रीचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या काळातील थकीत देणी देण्यासाठी कर्जाचे हप्ते, व्याज, तसेच यंदाच्या गळीत हंगामासाठी मिळेल त्या दराने साखरविक्री करावी लागली. त्यातून त्यांच्या काळातील देणी भागवली. त्यामुळेच एफआरपीपेक्षा जादा आगाऊ हप्ता देणारा कारखाना म्हणून ‘माळेगाव’ची ओळख झाली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. माळेगावच्या संचालक मंडळाने कमी दराने विक्री केल्याने कारखान्याचे नुकसान झाले, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. याशिवाय राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने कारखान्याच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने सत्ताधारी संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेतली. या वेळी उपाध्यक्ष रामदास आटोळे, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. १९ एप्रिल २०१५ पासून आम्ही सत्तेवर आलो. तेव्हापासून काही धाडसी निर्णय घेऊन ९९ कोटी ६९ लाख ५७ हजार रुपये उभे केले. त्यातून स खरेदी, गेटकेनवाल्यांची देणी भागवणे, त्यांच्या मुदत ठेव, त्यावरील व्याज, २०१३ /१४ च्या काळातील ऊस अनुदान खरेदी, व्यापाऱ्यांची देणी, बडोदा बॅँकेचे कर्ज व्याजासह परत करणे, आयसीआयसी बॅँकेचे तोडणी वाहतूक कर्ज व्याजासह परत करणे, तोडणी वाहतुकीचे थकीत देणी, कमिशन, सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा हप्ता, व्याज, एसएमपीचा हप्ता, कामगारांचे २०१३ /१४ चे बोनस, रिटेन्शन, पगार असा खर्च करून २ कोटी १७ लाख रुपये शिल्लक ठेवले. बाळासाहेब तावरे अध्यक्ष असतानाची देणी आम्ही सत्तेवर असताना भागवली. त्याचबरोबर हंगाम सुरू असतानाच त्या वेळी साखरविक्री करण्याची निर्णय त्यांच्या काळात घेतला नाही. त्यामुळे १० लाख ७६ हजार साखर पोती पडून होती. त्या वेळी छत्रपती, सोमेश्वर कारखान्याने हंगाम सुरू असतानाच साखरेची विक्री केली. त्यामुळे त्यांची कमी साखर शिल्लक राहिली. माळेगावच्या तत्कालीन मंडळाला मुख्य लेखाधिकाऱ्यांनी साखरेचे दर कोसळत असताना टप्प्या टप्प्याने साखर विक्रीचा निर्णय घ्या, असे लेखी पत्र दिले होते. त्या वेळीच्या विरोधी संचालकांसह सर्वांनी त्याला संमती दिली होती. तरीदेखील साखरविक्री केली नाही. इथेनॉलची निर्मिती केली नाही. विक्री केली नाही. त्यामुळे कारखान्याची देणी वाढत राहिली. त्यांच्या काळातील देणी आम्हाली देणे भाग पडले. त्यामुळे जवळपास सव्वा लाख पोती साखर शिल्लक ठेवून ९ लाख ४३ हजार पोती साखरेची विक्री करावी लागली. त्याचप्रमाणे सोमेश्वर, छत्रपतीने साखर विक्री केली आहे. त्याच आमचे काय चुकले, असे चंद्रराव तावरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)