शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

संचालक मंडळाची देणी आम्ही फेडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2015 00:38 IST

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगामाच्या काळात तत्कालीन अध्यक्षांनी आणि संचालक मंडळाने अगदी ३३०० रुपये दराने मागणी आली,

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगामाच्या काळात तत्कालीन अध्यक्षांनी आणि संचालक मंडळाने अगदी ३३०० रुपये दराने मागणी आली, तरीदेखील साखरविक्रीचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या काळातील थकीत देणी देण्यासाठी कर्जाचे हप्ते, व्याज, तसेच यंदाच्या गळीत हंगामासाठी मिळेल त्या दराने साखरविक्री करावी लागली. त्यातून त्यांच्या काळातील देणी भागवली. त्यामुळेच एफआरपीपेक्षा जादा आगाऊ हप्ता देणारा कारखाना म्हणून ‘माळेगाव’ची ओळख झाली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. माळेगावच्या संचालक मंडळाने कमी दराने विक्री केल्याने कारखान्याचे नुकसान झाले, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. याशिवाय राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने कारखान्याच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने सत्ताधारी संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेतली. या वेळी उपाध्यक्ष रामदास आटोळे, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. १९ एप्रिल २०१५ पासून आम्ही सत्तेवर आलो. तेव्हापासून काही धाडसी निर्णय घेऊन ९९ कोटी ६९ लाख ५७ हजार रुपये उभे केले. त्यातून स खरेदी, गेटकेनवाल्यांची देणी भागवणे, त्यांच्या मुदत ठेव, त्यावरील व्याज, २०१३ /१४ च्या काळातील ऊस अनुदान खरेदी, व्यापाऱ्यांची देणी, बडोदा बॅँकेचे कर्ज व्याजासह परत करणे, आयसीआयसी बॅँकेचे तोडणी वाहतूक कर्ज व्याजासह परत करणे, तोडणी वाहतुकीचे थकीत देणी, कमिशन, सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा हप्ता, व्याज, एसएमपीचा हप्ता, कामगारांचे २०१३ /१४ चे बोनस, रिटेन्शन, पगार असा खर्च करून २ कोटी १७ लाख रुपये शिल्लक ठेवले. बाळासाहेब तावरे अध्यक्ष असतानाची देणी आम्ही सत्तेवर असताना भागवली. त्याचबरोबर हंगाम सुरू असतानाच त्या वेळी साखरविक्री करण्याची निर्णय त्यांच्या काळात घेतला नाही. त्यामुळे १० लाख ७६ हजार साखर पोती पडून होती. त्या वेळी छत्रपती, सोमेश्वर कारखान्याने हंगाम सुरू असतानाच साखरेची विक्री केली. त्यामुळे त्यांची कमी साखर शिल्लक राहिली. माळेगावच्या तत्कालीन मंडळाला मुख्य लेखाधिकाऱ्यांनी साखरेचे दर कोसळत असताना टप्प्या टप्प्याने साखर विक्रीचा निर्णय घ्या, असे लेखी पत्र दिले होते. त्या वेळीच्या विरोधी संचालकांसह सर्वांनी त्याला संमती दिली होती. तरीदेखील साखरविक्री केली नाही. इथेनॉलची निर्मिती केली नाही. विक्री केली नाही. त्यामुळे कारखान्याची देणी वाढत राहिली. त्यांच्या काळातील देणी आम्हाली देणे भाग पडले. त्यामुळे जवळपास सव्वा लाख पोती साखर शिल्लक ठेवून ९ लाख ४३ हजार पोती साखरेची विक्री करावी लागली. त्याचप्रमाणे सोमेश्वर, छत्रपतीने साखर विक्री केली आहे. त्याच आमचे काय चुकले, असे चंद्रराव तावरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)