शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

आमचे मित्रबी नाहीत आणि गावबी राहिला नाही...

By admin | Updated: July 28, 2016 03:53 IST

माळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. नशिबाने वाचलेल्या ग्रामस्थांना जुने गाव, गावातील लोक, सणसमारंभ आठवतात

- नीलेश काण्णव,  घोडेगावमाळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. नशिबाने वाचलेल्या ग्रामस्थांना जुने गाव, गावातील लोक, सणसमारंभ आठवतात व या जुन्या आठवणींनी ते गहिवरतात... ग्रामस्थांना हक्काचे घर देण्यासाठी सध्या नवीन गाव वसवण्याचे काम सुरू आहे... घडलेल्या घटनेचा व घटनेनंतर घडलेल्या घडामोंडीचा आढावा ‘लोकमत’ आजपासून घेत आहे.आमचे मित्रबी नाहीत आणि गावबी राहिला नाही... चोर-पोलीस खेळताना पायाखाली घातलेले गाव आठवते आणि आज त्याच रस्त्याने रोज घरी जाताना सगळा मातीचा ढिगारा दिसतो... मित्रांची घरं दिसत नाहीत.‘लोकमत’ने माळीण घटनेला ३0 जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने गावात जाऊन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांना आठवणी सांगताना गहिवरून आले.झरझरा आला वारा, टपटप पडला पाऊस सारा, ढडम ढडम ढगांचा आवाज, कोकिळा म्हणते पाऊस आला.. पावसा पावसा ये रे.. पीक पाणी खूप रे! अशी गाणी आम्ही भेट दिली असता हे विद्यार्थी गुणगुणत होते. दुर्घटनेतून वाचलेल्या मुलांना अजूनही जुने मित्र, गावातील मारुतीचं मंदिर, मंदिराजवळ खेळत असलेले गावातील सवंगडी आठवतात. माळीण येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा असून, येथे एकूण ७१ मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेत अडिवरे, पंचाळे, वचपे, आमडे व माळीणमधील मुलं शिक्षण घेत आहेत. या मुलांमध्ये प्रतीक राजेंद्र झांजरे, ऋतीक जालिंदर झांजरे, मनाली गणेश झांजरे, रोनित गणेश झांजरे, रोशन जालिंदर झांजरे, प्रतीक सुनील झांजरे, केतन सुनील झांजरे, अनुष्का दगडू झांजरे ही दुर्घटनेतून बचावलेली आठ मुले शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मागची काही झांजरेंची घरे बचावली व पोटे, लेंभे, विरणक यांची घरे गाडली गेली; त्यामुळे सध्या शाळेत झांजरेंची मुले जास्त आहेत. या मुलांशी बोलताना त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. बालवाडीच्या कुसुमबाई आणि तान्हूबाई खूप आवडायच्या. त्या आम्हाला खाऊ करून द्यायच्या...हे मुलं आजही सांगत आहेत. चिंचेचीवाडीमध्ये राहणाऱ्या दीपाली विजय लेंभे या मुलीला मानसी, पूजा, प्रियंका या मैत्रिणी आठवल्या. त्यांच्या बरोबर जुन्या गावातील मारुती मंदिरासमोर आम्ही खूप खेळायचो. मानसीचं घर खूप आवडायचं आणि आता रोज त्याच रस्त्याने घरी जाताना सगळा मातीचा ढिगाराच दिसतो. आम्ही खेळायचो ते मारुतीचे मंदिर दिसत नाही, आणि माझ्या मैत्रिणीचं घरंबी तिथं नाही.’- गावातील यात्रा व बैलपोळ्याच्या आठवणी मुलांनी सांगितल्या. ‘यात्रेत आम्ही खूप मजा करायचो, फुगे,गाड्या, खेळणी घ्यायचो. दिवसभर यात्रेत फिरायचो. लय मजा यायची. ‘बैलपोळ्याला बैल सजवायचो, मंदिरासमोर मिरवणूक काढायचो. खूप नाचायचो... - अविनाश सखाराम लेंभे या मुलाचे मयूर संजय पोटे आणि संतोष दिलीप लेंभे हे मित्र होते. यांच्या खप्ूा साऱ्या आठवणी त्याने सांगितल्या. ‘गावातील आख्खी पोरं चोर-पोलीस खेळायचो. - तेव्हा पूर्ण गावातून आम्ही फिरायचो, लय मजा यायची. खेळून झाल्यावर मग संतोषच्या घरी जाऊन जेवण करायचो...हे सांगत असतानाच अविनाश गप्प होऊन गहिवरला.मुले गप्प झाली : प्रतीक सुनील झांजरे, रोशन जालिंदर झांजरे या मुलांची घरे शाळेच्या मागे असल्यामुळे वाचली. पण, त्यांना आजही जुन्या गावातील चिंचेच्या झाडाखाली मुलं खेळताना आठवतात. ते म्हणाले, ‘सोहम झांजरे, सागर पोटे या मित्रांबरोबर मंदिरासमोर बॅटबॉल खेळायचो. कबड्डी, लपाछपी खेळायचो पण आता आम्ही तेथे खेळायला जात नाही. कारण, आमचे मित्र बी नाहीत आणी गाव बी राहिला नाही, असे सांगत ही मुले गप्प झाली.