शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आमचे मित्रबी नाहीत आणि गावबी राहिला नाही...

By admin | Updated: July 28, 2016 03:53 IST

माळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. नशिबाने वाचलेल्या ग्रामस्थांना जुने गाव, गावातील लोक, सणसमारंभ आठवतात

- नीलेश काण्णव,  घोडेगावमाळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. नशिबाने वाचलेल्या ग्रामस्थांना जुने गाव, गावातील लोक, सणसमारंभ आठवतात व या जुन्या आठवणींनी ते गहिवरतात... ग्रामस्थांना हक्काचे घर देण्यासाठी सध्या नवीन गाव वसवण्याचे काम सुरू आहे... घडलेल्या घटनेचा व घटनेनंतर घडलेल्या घडामोंडीचा आढावा ‘लोकमत’ आजपासून घेत आहे.आमचे मित्रबी नाहीत आणि गावबी राहिला नाही... चोर-पोलीस खेळताना पायाखाली घातलेले गाव आठवते आणि आज त्याच रस्त्याने रोज घरी जाताना सगळा मातीचा ढिगारा दिसतो... मित्रांची घरं दिसत नाहीत.‘लोकमत’ने माळीण घटनेला ३0 जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने गावात जाऊन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांना आठवणी सांगताना गहिवरून आले.झरझरा आला वारा, टपटप पडला पाऊस सारा, ढडम ढडम ढगांचा आवाज, कोकिळा म्हणते पाऊस आला.. पावसा पावसा ये रे.. पीक पाणी खूप रे! अशी गाणी आम्ही भेट दिली असता हे विद्यार्थी गुणगुणत होते. दुर्घटनेतून वाचलेल्या मुलांना अजूनही जुने मित्र, गावातील मारुतीचं मंदिर, मंदिराजवळ खेळत असलेले गावातील सवंगडी आठवतात. माळीण येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा असून, येथे एकूण ७१ मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेत अडिवरे, पंचाळे, वचपे, आमडे व माळीणमधील मुलं शिक्षण घेत आहेत. या मुलांमध्ये प्रतीक राजेंद्र झांजरे, ऋतीक जालिंदर झांजरे, मनाली गणेश झांजरे, रोनित गणेश झांजरे, रोशन जालिंदर झांजरे, प्रतीक सुनील झांजरे, केतन सुनील झांजरे, अनुष्का दगडू झांजरे ही दुर्घटनेतून बचावलेली आठ मुले शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मागची काही झांजरेंची घरे बचावली व पोटे, लेंभे, विरणक यांची घरे गाडली गेली; त्यामुळे सध्या शाळेत झांजरेंची मुले जास्त आहेत. या मुलांशी बोलताना त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. बालवाडीच्या कुसुमबाई आणि तान्हूबाई खूप आवडायच्या. त्या आम्हाला खाऊ करून द्यायच्या...हे मुलं आजही सांगत आहेत. चिंचेचीवाडीमध्ये राहणाऱ्या दीपाली विजय लेंभे या मुलीला मानसी, पूजा, प्रियंका या मैत्रिणी आठवल्या. त्यांच्या बरोबर जुन्या गावातील मारुती मंदिरासमोर आम्ही खूप खेळायचो. मानसीचं घर खूप आवडायचं आणि आता रोज त्याच रस्त्याने घरी जाताना सगळा मातीचा ढिगाराच दिसतो. आम्ही खेळायचो ते मारुतीचे मंदिर दिसत नाही, आणि माझ्या मैत्रिणीचं घरंबी तिथं नाही.’- गावातील यात्रा व बैलपोळ्याच्या आठवणी मुलांनी सांगितल्या. ‘यात्रेत आम्ही खूप मजा करायचो, फुगे,गाड्या, खेळणी घ्यायचो. दिवसभर यात्रेत फिरायचो. लय मजा यायची. ‘बैलपोळ्याला बैल सजवायचो, मंदिरासमोर मिरवणूक काढायचो. खूप नाचायचो... - अविनाश सखाराम लेंभे या मुलाचे मयूर संजय पोटे आणि संतोष दिलीप लेंभे हे मित्र होते. यांच्या खप्ूा साऱ्या आठवणी त्याने सांगितल्या. ‘गावातील आख्खी पोरं चोर-पोलीस खेळायचो. - तेव्हा पूर्ण गावातून आम्ही फिरायचो, लय मजा यायची. खेळून झाल्यावर मग संतोषच्या घरी जाऊन जेवण करायचो...हे सांगत असतानाच अविनाश गप्प होऊन गहिवरला.मुले गप्प झाली : प्रतीक सुनील झांजरे, रोशन जालिंदर झांजरे या मुलांची घरे शाळेच्या मागे असल्यामुळे वाचली. पण, त्यांना आजही जुन्या गावातील चिंचेच्या झाडाखाली मुलं खेळताना आठवतात. ते म्हणाले, ‘सोहम झांजरे, सागर पोटे या मित्रांबरोबर मंदिरासमोर बॅटबॉल खेळायचो. कबड्डी, लपाछपी खेळायचो पण आता आम्ही तेथे खेळायला जात नाही. कारण, आमचे मित्र बी नाहीत आणी गाव बी राहिला नाही, असे सांगत ही मुले गप्प झाली.