शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आमचे मित्रबी नाहीत आणि गावबी राहिला नाही...

By admin | Updated: July 28, 2016 03:53 IST

माळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. नशिबाने वाचलेल्या ग्रामस्थांना जुने गाव, गावातील लोक, सणसमारंभ आठवतात

- नीलेश काण्णव,  घोडेगावमाळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. नशिबाने वाचलेल्या ग्रामस्थांना जुने गाव, गावातील लोक, सणसमारंभ आठवतात व या जुन्या आठवणींनी ते गहिवरतात... ग्रामस्थांना हक्काचे घर देण्यासाठी सध्या नवीन गाव वसवण्याचे काम सुरू आहे... घडलेल्या घटनेचा व घटनेनंतर घडलेल्या घडामोंडीचा आढावा ‘लोकमत’ आजपासून घेत आहे.आमचे मित्रबी नाहीत आणि गावबी राहिला नाही... चोर-पोलीस खेळताना पायाखाली घातलेले गाव आठवते आणि आज त्याच रस्त्याने रोज घरी जाताना सगळा मातीचा ढिगारा दिसतो... मित्रांची घरं दिसत नाहीत.‘लोकमत’ने माळीण घटनेला ३0 जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने गावात जाऊन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांना आठवणी सांगताना गहिवरून आले.झरझरा आला वारा, टपटप पडला पाऊस सारा, ढडम ढडम ढगांचा आवाज, कोकिळा म्हणते पाऊस आला.. पावसा पावसा ये रे.. पीक पाणी खूप रे! अशी गाणी आम्ही भेट दिली असता हे विद्यार्थी गुणगुणत होते. दुर्घटनेतून वाचलेल्या मुलांना अजूनही जुने मित्र, गावातील मारुतीचं मंदिर, मंदिराजवळ खेळत असलेले गावातील सवंगडी आठवतात. माळीण येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा असून, येथे एकूण ७१ मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेत अडिवरे, पंचाळे, वचपे, आमडे व माळीणमधील मुलं शिक्षण घेत आहेत. या मुलांमध्ये प्रतीक राजेंद्र झांजरे, ऋतीक जालिंदर झांजरे, मनाली गणेश झांजरे, रोनित गणेश झांजरे, रोशन जालिंदर झांजरे, प्रतीक सुनील झांजरे, केतन सुनील झांजरे, अनुष्का दगडू झांजरे ही दुर्घटनेतून बचावलेली आठ मुले शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मागची काही झांजरेंची घरे बचावली व पोटे, लेंभे, विरणक यांची घरे गाडली गेली; त्यामुळे सध्या शाळेत झांजरेंची मुले जास्त आहेत. या मुलांशी बोलताना त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. बालवाडीच्या कुसुमबाई आणि तान्हूबाई खूप आवडायच्या. त्या आम्हाला खाऊ करून द्यायच्या...हे मुलं आजही सांगत आहेत. चिंचेचीवाडीमध्ये राहणाऱ्या दीपाली विजय लेंभे या मुलीला मानसी, पूजा, प्रियंका या मैत्रिणी आठवल्या. त्यांच्या बरोबर जुन्या गावातील मारुती मंदिरासमोर आम्ही खूप खेळायचो. मानसीचं घर खूप आवडायचं आणि आता रोज त्याच रस्त्याने घरी जाताना सगळा मातीचा ढिगाराच दिसतो. आम्ही खेळायचो ते मारुतीचे मंदिर दिसत नाही, आणि माझ्या मैत्रिणीचं घरंबी तिथं नाही.’- गावातील यात्रा व बैलपोळ्याच्या आठवणी मुलांनी सांगितल्या. ‘यात्रेत आम्ही खूप मजा करायचो, फुगे,गाड्या, खेळणी घ्यायचो. दिवसभर यात्रेत फिरायचो. लय मजा यायची. ‘बैलपोळ्याला बैल सजवायचो, मंदिरासमोर मिरवणूक काढायचो. खूप नाचायचो... - अविनाश सखाराम लेंभे या मुलाचे मयूर संजय पोटे आणि संतोष दिलीप लेंभे हे मित्र होते. यांच्या खप्ूा साऱ्या आठवणी त्याने सांगितल्या. ‘गावातील आख्खी पोरं चोर-पोलीस खेळायचो. - तेव्हा पूर्ण गावातून आम्ही फिरायचो, लय मजा यायची. खेळून झाल्यावर मग संतोषच्या घरी जाऊन जेवण करायचो...हे सांगत असतानाच अविनाश गप्प होऊन गहिवरला.मुले गप्प झाली : प्रतीक सुनील झांजरे, रोशन जालिंदर झांजरे या मुलांची घरे शाळेच्या मागे असल्यामुळे वाचली. पण, त्यांना आजही जुन्या गावातील चिंचेच्या झाडाखाली मुलं खेळताना आठवतात. ते म्हणाले, ‘सोहम झांजरे, सागर पोटे या मित्रांबरोबर मंदिरासमोर बॅटबॉल खेळायचो. कबड्डी, लपाछपी खेळायचो पण आता आम्ही तेथे खेळायला जात नाही. कारण, आमचे मित्र बी नाहीत आणी गाव बी राहिला नाही, असे सांगत ही मुले गप्प झाली.