शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

वळतीत भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: July 14, 2014 05:11 IST

उरुळी कांचनपासून साधारणपणे ८ किलोमीटर अंतरावर असणारे वळती (ता. हवेली) या गावामध्ये गेली ४ वर्षांपासून टँकर सुरू

उरुळी कांचन : उरुळी कांचनपासून साधारणपणे ८ किलोमीटर अंतरावर असणारे वळती (ता. हवेली) या गावामध्ये गेली ४ वर्षांपासून टँकर सुरू असून, पाणीटंचाई भीषण असल्याने गावठाणासह वाड्यावस्त्यांवर टँकरची मागणी ग्रामसेवकांचा संप असल्याने पंचायत समितीतील गटविकास अधिकारी, तसेच तहसीलदार यांच्याकडे करणार असण्याची माहिती वळतीच्या उपसरपंच सारिका घोलप व ग्रामपंचायत सदस्य संदीप गायकवाड यांनी दिली. वळती गावची लोकसंख्या दोन हजारांच्या वर असून, वळती परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत, तर ५०० फुटांपर्यंत विंधन विहिरीची पातळी गेली असूनही, पाण्याचा थेंबही नाही. रेल्वे स्टेशन, वरचा मळा, खालचा मळा, नागपुरेवस्तीवर असणाऱ्या पाण्याचे पाणवठे आटले असून, हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. १९७२मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये डॉ. दादा गुजर यांनी गावाची कायमस्वरूपी तहान भागवण्यासाठी दगडी बांधकामात बांधून दिलेला तलावही ४ वर्षांपासून कोरडा आहे. गावात येणाऱ्या दोन टँकरचे पाणी विहिरीत टाकण्यात येते व तेथून गावाजवळच्या टाकीत सोडण्यात येते. पाणी भरण्यासाठी जवळपास २५० प्लॅस्टिकचे कॅन घेऊन नागरिक पहाटेपासून उभे असतात. पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. पाण्यासाठी वादावादीही होतात. या भीषण परिस्थितीमुळे गावातील प्रवेशद्वाराजवळच कॅनची लाईन (रांगा) पाहूनच गावात येणारे पाहुणे पाण्याची पारख करतात. पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांना कोणी मुलीही देईनात, अशी अवस्था झाली असल्याची खंत संतोष घोलप व संदीप गायकवाड यांनी व्यक्त केली.