शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

वळतीत भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: July 14, 2014 05:11 IST

उरुळी कांचनपासून साधारणपणे ८ किलोमीटर अंतरावर असणारे वळती (ता. हवेली) या गावामध्ये गेली ४ वर्षांपासून टँकर सुरू

उरुळी कांचन : उरुळी कांचनपासून साधारणपणे ८ किलोमीटर अंतरावर असणारे वळती (ता. हवेली) या गावामध्ये गेली ४ वर्षांपासून टँकर सुरू असून, पाणीटंचाई भीषण असल्याने गावठाणासह वाड्यावस्त्यांवर टँकरची मागणी ग्रामसेवकांचा संप असल्याने पंचायत समितीतील गटविकास अधिकारी, तसेच तहसीलदार यांच्याकडे करणार असण्याची माहिती वळतीच्या उपसरपंच सारिका घोलप व ग्रामपंचायत सदस्य संदीप गायकवाड यांनी दिली. वळती गावची लोकसंख्या दोन हजारांच्या वर असून, वळती परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत, तर ५०० फुटांपर्यंत विंधन विहिरीची पातळी गेली असूनही, पाण्याचा थेंबही नाही. रेल्वे स्टेशन, वरचा मळा, खालचा मळा, नागपुरेवस्तीवर असणाऱ्या पाण्याचे पाणवठे आटले असून, हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. १९७२मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये डॉ. दादा गुजर यांनी गावाची कायमस्वरूपी तहान भागवण्यासाठी दगडी बांधकामात बांधून दिलेला तलावही ४ वर्षांपासून कोरडा आहे. गावात येणाऱ्या दोन टँकरचे पाणी विहिरीत टाकण्यात येते व तेथून गावाजवळच्या टाकीत सोडण्यात येते. पाणी भरण्यासाठी जवळपास २५० प्लॅस्टिकचे कॅन घेऊन नागरिक पहाटेपासून उभे असतात. पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. पाण्यासाठी वादावादीही होतात. या भीषण परिस्थितीमुळे गावातील प्रवेशद्वाराजवळच कॅनची लाईन (रांगा) पाहूनच गावात येणारे पाहुणे पाण्याची पारख करतात. पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांना कोणी मुलीही देईनात, अशी अवस्था झाली असल्याची खंत संतोष घोलप व संदीप गायकवाड यांनी व्यक्त केली.