शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

अधिकाऱ्यांना प्रतीक्षा माघारीची

By admin | Updated: September 30, 2014 23:53 IST

दोन यंत्रांची भीती : कामकाजावर पडणार ताण

नाशिक : विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीत झालेल्या फाटाफुटीमुळे अगोदरच एकाऐवजी दोन-दोन उमेदवार रिंगणात उतरून निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे असताना व त्यात भरमसाठ अपक्षांनी उड्या मारलेल्या असल्याने उमेदवारांच्या वाढत्या संख्येची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. पंधरापेक्षा अधिक उमेदवार असल्यास दोन मतदान यंत्रे लावावी लागणार असल्याने प्रशासकीय कामकाज दुपटीने वाढेल. त्यापेक्षा अधिकाधिक उमेदवारांची माघार व्हावी याची प्रतीक्षा अधिकाऱ्यांना लागून आहे. जिल्ह्यातील पंधरा जागांसाठी ३२३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातही देवळालीसारख्या मतदारसंघात ३९, नाशिक पश्चिममध्ये २३, नाशिक पूर्वमध्ये २२, बागलाणला २४, नांदगावला ३२, इगतपुरीत २२ अशाप्रकारे जवळपास पंधराहून अधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काही मतदारसंघांत एकाच यंत्रात नावे समाविष्ट होऊ शकतील इतकेच उमेदवार असल्याने त्याबाबत चिंता नसली, तरी जेथे पंधराच्या पुढे मतदारांची संख्या गेली त्याठिकाणी मात्र निवडणूकप्रक्रिया राबविताना कामकाजाचा ताण वाढणार आहे.या निवडणुकीतून माघार घेण्याची अंतिम मुदत बुधवार, दि. १ आॅक्टोबर असली, तरी सोमवारपासूनच उमेदवार माघार घेऊ शकतात; परंतु दोन दिवसांत अगदीच बोटावर मोजण्याइतक्याच उमेदवारांनी माघार घेतल्याने बुधवारी हीच परिस्थिती राहणार का, या प्रश्नाने निवडणूक अधिकारी परेशान झाले आहेत. एक उमेदवार वाढला तर त्याच्याबरोबर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्यामुळे त्यासाठी कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव व मतदान यंत्रांचा वापरही वाढणार आहे. (प्रतिनिधी)