शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

अधिकाऱ्यांना प्रतीक्षा माघारीची

By admin | Updated: September 30, 2014 23:53 IST

दोन यंत्रांची भीती : कामकाजावर पडणार ताण

नाशिक : विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीत झालेल्या फाटाफुटीमुळे अगोदरच एकाऐवजी दोन-दोन उमेदवार रिंगणात उतरून निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे असताना व त्यात भरमसाठ अपक्षांनी उड्या मारलेल्या असल्याने उमेदवारांच्या वाढत्या संख्येची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. पंधरापेक्षा अधिक उमेदवार असल्यास दोन मतदान यंत्रे लावावी लागणार असल्याने प्रशासकीय कामकाज दुपटीने वाढेल. त्यापेक्षा अधिकाधिक उमेदवारांची माघार व्हावी याची प्रतीक्षा अधिकाऱ्यांना लागून आहे. जिल्ह्यातील पंधरा जागांसाठी ३२३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातही देवळालीसारख्या मतदारसंघात ३९, नाशिक पश्चिममध्ये २३, नाशिक पूर्वमध्ये २२, बागलाणला २४, नांदगावला ३२, इगतपुरीत २२ अशाप्रकारे जवळपास पंधराहून अधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काही मतदारसंघांत एकाच यंत्रात नावे समाविष्ट होऊ शकतील इतकेच उमेदवार असल्याने त्याबाबत चिंता नसली, तरी जेथे पंधराच्या पुढे मतदारांची संख्या गेली त्याठिकाणी मात्र निवडणूकप्रक्रिया राबविताना कामकाजाचा ताण वाढणार आहे.या निवडणुकीतून माघार घेण्याची अंतिम मुदत बुधवार, दि. १ आॅक्टोबर असली, तरी सोमवारपासूनच उमेदवार माघार घेऊ शकतात; परंतु दोन दिवसांत अगदीच बोटावर मोजण्याइतक्याच उमेदवारांनी माघार घेतल्याने बुधवारी हीच परिस्थिती राहणार का, या प्रश्नाने निवडणूक अधिकारी परेशान झाले आहेत. एक उमेदवार वाढला तर त्याच्याबरोबर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्यामुळे त्यासाठी कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव व मतदान यंत्रांचा वापरही वाढणार आहे. (प्रतिनिधी)