शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

ठायी ठायी तुकोबाराय!

By admin | Updated: March 7, 2015 00:40 IST

श्री संत तुकाराममहाराजांचा वैकुंठगमन सोहळा म्हणजेच तुकाराम बीज. हा सोहळा शनिवारी (दि. ७) श्रीक्षेत्र देहू येथे होणार आहे.

मंगेश पांडे ल्ल पिंपरीश्री संत तुकाराममहाराजांचा वैकुंठगमन सोहळा म्हणजेच तुकाराम बीज. हा सोहळा शनिवारी (दि. ७) श्रीक्षेत्र देहू येथे होणार आहे. तुकोबारायांवरील भक्तीमुळे या सोहळ्याची व्यापकता वाढत आहे. दळणवळणाच्या सुविधेमुळे भाविकांची संख्या वाढली आहे. ३६७ वर्षांपूर्वी फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबारायांचे वैकुंठगमन झाले. दुपारी बाराला बीजदिनी इंद्रायणी नदीतीरावरील वैकुंठस्थान येथे नांदुरकीच्या वृक्षाची पाने सळसळतात, अशी नागरिकांची भावना आहे. दुपारी बाराला कीर्तनाचा समारोप होतो अन् वृक्षावर पुष्पवृष्टी झाल्यानंतर बीज सोहळा पार पडतो. हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अडीच ते तीन लाख भाविक देहूत येतात. देहू भक्तिरसात डुंबून जाते. मुख्य बीज सोहळ्यासह द्वितीया ते अष्टमी अशा सहा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी पूर्वी दूर अंतरावरील भाविक पायी अथवा बैलगाडीने देहूत यायचे. हा सोहळा सहा दिवस सोहळा चालायचा. आता तो तीन तासांतच पार पडतो. वैकुंठगमन सोहळा पार पडताच भाविक परतीच्या मार्गाला निघतात. त्यामुळे दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत गर्दी ओसरते. एसटी, पीएमपी बससह, रेल्वे, तसेच खासगी वाहने उपलब्ध झाल्याने सोहळ्यासाठी येणाऱ्यांना सोईचे झाले आहे. पीएमपी व एसटी महामंडळाकडून जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या जातात. मानाच्या दिंड्या, तसेच काही वारकरी अष्टमीनंतरच माघारी फिरतात. एकाच वेळी लाखो भाविक इंद्रायणीतीरी दाखल होत असल्याने पूर्वी जागा अपुरी पडायची. आता रस्तारुंदीकरण, तसेच नदीतीरावरील घाटाचे काम केल्याने वैकुंठस्थानमंदिर परिसरही प्रशस्त झाला. तीर्थक्षेत्र विकास आराखडयातील प्रामुख्याने सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्पांचे काम पूर्ण झालेले नाही. यासाठी शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. ४यात्रा काळात ग्रामपंचायत प्रशासनाकडून रस्त्याकडेची, तसेच मंदिरासमोरील दुकाने हटविण्यात येतात. यामुळे विक्रेते व प्रशासन यांच्यातील वाद ठरलेले आहेत. वर्षानुवर्षे या ठिकाणी व्यवसाय करणारे व्यावसायिक शासन अथवा संस्थानाने गाळे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करीत आहेत. ४तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरणासाठी स्वत:हून मिळकती हटविणाऱ्या बाधित मिळकतधारकांना मोबदल्याची पहिल्या टप्प्यातील रक्कम देण्यात आली. मात्र, दोन वर्षे उलटूनही दुसऱ्या टप्प्यातील रक्कम मिळकतधारकांच्या हातात पडलेली नाही. या विकास आराखड्यात महत्त्वाचे प्रकल्प राबविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बीजसोहळा, तसेच पालखी प्रस्थान सोहळ्यासह इतर दिवशी देहूत येणाऱ्या मंत्रिमहोदयांनी देहूतील प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.