शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

सरदवाडीवर पाणी विकत घेण्याची वेळ

By admin | Updated: May 26, 2014 05:27 IST

पंचतारांकित दर्जा असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कारवायांमुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळाली.

प्रवीण गायकवाड, शिरूर - पंचतारांकित दर्जा असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कारवायांमुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळाली. मात्र, गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळे प्रभावित झालेल्या गावांपैकी सरदवाडी गावांवर पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. ज्यांची ऐपत आहे, त्याचं ठीक आहे, ज्यांची नाही, त्या नागरिकांना मात्र हे दूषित पाणी पिण्याशिवाय पर्याय नसल्याचे वास्तव आहे. २000मध्ये सुरू झालेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत सध्या २५0 ते ३00 कारखाने सुरू आहेत. या वसाहतीपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे सरदवाडी गाव. कारखानदारी येण्याअगोदर पाण्याची परिस्थिती चांगली होती. विहिरीचे स्रोत चांगले होते. पिण्याचे पाणी, शेतीला पाणी, सर्व काही योग्य होते. मात्र, एमआयडीसीतील कारखान्यांचे दूषित पाणी या गावच्या ओढ्यात येऊन मिळू लागले आणि विहिरींचे पाणीच खराब झाले. परक्युलेशनमुळे या ओढ्यातील दूषित पाणी या विहिरीत मिसळू लागले. केमिकलयुक्त काळे पाणी बघून पाणी पिण्याची इच्छा होईल तरी कशी? मजबुरी म्हणून पिलेच, तर विविध विकारांना आमंत्रण. पुणे-अहमदनगर रस्त्यावर वसलेल्या या गावात हॉटेल व्यवसायामुळे आर्थिक सुबत्ता आलेली. आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी विकत घेण्यास सुरुवात केली. १ रुपया प्रतिलीटर, असे २0 लिटरचा कॅन २0 रुपयांना ही ग्रामस्थ मंडळी विकत घेतात. या गावचे दीपक सरोदे म्हणाले, दूषित पाण्यामुळे गावावर पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. अनेकांनी पाणी शुद्धीकरण यंत्रणा घरात बसवली. मात्र, पाण्याचे टीडीएस दोन हजारांपेक्षा जास्त असल्याने (दूषित पाण्याचे जास्त प्रमाण) ही यंत्रणा दोन महिन्यांतच खराब होऊ लागल्याने या यंत्रणेचाही फायदा होईना. सर्वांनाच पाणी विकत घेणे शक्य नाही. एमआयडीसी जवळ असल्याने सरदवाडी परिसरात कामगारवर्ग वसू लागला आहे. या कामगारांना पाणी विकत घेणे परवडणारे नाही. कामावर गेल्यावर येताना कारखान्यातूनच पिण्याच्या पाण्याचे कॅन भरून ते आणतात. आर्थिक दुर्बल घटकाला हेपण शक्य नाही. त्यांनी काय करावे हा प्रश्न आहे.