शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

चाकण एमआयडीसीत चोरट्यांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:11 IST

चाकण : एमआयडीसीमधील छोट्या-मोठ्या कंपन्यांमधील लाखो रुपयांचा माल चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातील बहुतांश चोरट्यांना मुद्देमालासह पकडले ...

चाकण : एमआयडीसीमधील छोट्या-मोठ्या कंपन्यांमधील लाखो रुपयांचा माल चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातील बहुतांश चोरट्यांना मुद्देमालासह पकडले जात असूनही चोरीच्या घटनांमध्ये घट होण्याचे प्रमाण कमी होत नाही. यामुळे पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांत घडणाऱ्या चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत महाळुंगे पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये एमआयडीसीमधील जवळपास दोन ते तीन हजार लहान-मोठ्या कंपन्यांसह परिसरातील गावे महाळुंगे पोलीस चौकीत येतात. पोलिसांचे रात्रीचे पेट्रोलिंग सुरू असूनही मागील काही दिवसांपासून औद्योगिक वसाहतीच्या कंपन्यांमधील स्पेअर पार्टच्या लहान मोठ्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे कंपनी मालकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.

मागील दोन महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी चाकण एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांमधून लोखंडी, ॲल्युमिनिअम, पितळ, तांब्याच्या पट्ट्या, प्लेट आदी लाखो रुपयांचा कच्चा माल चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कुरुळी येथील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला धमकावून धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. भांबोली येथील एटीएम केंद्राला बॉम्बसदृश वस्तूने उडवून मोठी रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. रोजच घडणाऱ्या लहान मोठ्या चोरीच्या घटनांमुळे कंपनी मालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही चोरीच्या बहुतांश घटनांमधील चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु रोजच घडणाऱ्या चोरीच्या घटना कमी झालेल्या दिसून येत नाही.

चोरी करणाऱ्यांमध्ये काम करणारे कामगारच जास्त संख्येने सहभागी असल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रत्येक सुरक्षारक्षक आणि कामगाराचे रेकॉर्ड ठेवणे, कंपनी आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे. पोलीस आणि कंपन्यांच्या सहकार्याने गस्ती पथके तयार करून रात्रीचे पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे.

-अरविंद पवार, पोलीस निरीक्षक महाळुंगे पोलीस चौकी

सततच्या लॉकडॉउनने अनेक लहान-मोठे उद्योजक मेटाकुटीला आले आहे. त्यात दररोजच्या घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कंपनी मालकांमध्ये असुरक्षितेच वातावरण तयार झाले आहे. पोलिसांचे नाईट राउंड होऊनही चोऱ्या थांबत नाही. यासाठी पोलिसांनी आपले गोपनीय विभाग जास्त अलर्ट करणे गरजेचे आहे.

-दिलीप बटवाल, सचिव, इंडस्ट्रीयल फेडरेशन, चाकण