शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अभियांत्रिकीकडेही पाठ

By admin | Updated: May 19, 2015 23:54 IST

आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनतर्फे (एआयसीटीई) महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना कोणतीही आडकाठी न करता अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.

पुणे : आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनतर्फे (एआयसीटीई) महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना कोणतीही आडकाठी न करता अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांपेक्षा प्रवेश पूर्व परीक्षा देऊन महाविद्यालयातील प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. यंदा त्यात आणखी घट होणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. परिणामी, २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सुमारे ६५ हजारांहून अधिक जागा रिक्त राहणार आहेत.गेल्या वर्षी राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सुमारे १ लाख ६५ हजार जागांसाठी केवळ १ लाख ६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला. त्यामुळे मागील वर्षी सुमारे ५८ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यातच पुणे विभागांतर्गत येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या तीन विद्यापीठांमधील २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात १७ हजार ३५७ जागा रिक्त राहिल्या होत्या. तर, २0१४-१५ या शैक्षणिक वर्षात २५ हजार ७५ जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा राज्यातून जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी, पुणे विभागातून अभियांत्रिकी अभ्यासक्रमास घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३0 हजारांपर्यंत घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. गजानन खराटे म्हणाले, की यंदा जेईई परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे ५0 हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशावर त्याचा निश्चितच परिणाम झालेला दिसेल. गेल्या वर्षी ५८ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या.त्यामुळे यंदा ६0 ते ६५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे यंदा इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) या दोन संस्थांमधील प्रवेशासाठी एकाच पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. परिणामी, राज्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाशिवाय वेगळा सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यार्थी मिळणे अवघड होणार आहे. (प्रतिनिधी)गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहणार आहेत. परंतु, अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थी मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर आणि त्यानंतर सिव्हील शाखेला पसंती देतील. केंद्र व राज्य शासनाने उद्योग व रोजगार वाढीसाठी धोरण निश्चित करण्याचा विचार केला आहे. परंतु,अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पुढील दोन ते तीन वर्षांत शासकीय धोरणांनुसार बदल झाले, तर अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल.- डॉ. अनिल सहस्रबुद्धे, संचालक, कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे.४मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दोन ते तीन वर्षे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर २0 ते २५ हजार रुपयांची नोकरी मिळावी, या उद्देशाने विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेत आहे.४अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहणार असल्या, तरी यंदा विद्यार्थी प्रथम मॅकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि आयटीला प्राधान्य देताना दिसून येतील.