शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

साखर आयुक्तांचे ‘छत्रपती’वर जप्तीचे आदेश

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी जप्तीचा आदेश काढला आहे. २०१४-१५ च्या गळीत हंगामात बेकायदेशीरपणे कपात केलेल्या एफआर

बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी जप्तीचा आदेश काढला आहे. २०१४-१५ च्या गळीत हंगामात बेकायदेशीरपणे कपात केलेल्या एफआरपीसंदर्भात हा जप्तीचा आदेश काढला आहे. मनमानी कारभारामुळे ही वेळ आली. संचालक मंडळाने राजीनामा देण्याची मागणी शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी केली आहे.जाचक याबाबत म्हणाले, की सन २०१५-१६ च्या गळीत हंगामात गाळप परवाना नसल्यामुळे कारखान्याला नुकताच २१ कोटी रुपये दंड झाला आहे. तसेच, एफआरपीमधून बेकायदेशीर कपात केल्यामुळे दंड झाला आहे. हा प्रकार ‘छत्रपती’च्या परंपरेला गालबोट लावणारा आहे. कारखान्याची उभारणी जुन्या-जाणत्या नेतेमंडळींनी मोठ्या कष्टाने केली. प्रपंचाला कात्री लावून भागभांडवल गोळा केले. मात्र, संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे ही वेळ ओढवली. त्यामुळे संचालक मंडळाने राजीनामे द्यावेत. उर्वरित चार वर्षे राज्य शासनाने प्रशासक नेमावा. कारखान्याला झालेला २१ कोटींचा दंड, थकीत एफआरपीच्या व्याजाची रक्कम संचालकांच्या मालमत्तेमधून वसूल करावी. या थकबाकीबाबत इंदापूर न्यायालयाने आदेश पारित केले आहेत. ‘छत्रपती’चा आदर्श इतर साखर कारखान्यांनी डोळ्यासमोर ठेवून साखर उद्योगाला चालना दिली. त्या कारखान्यावर ही वेळ आल्याची खंत जाचक यांनी व्यक्त केली. या वेळी बाळासाहेब कोळेकर, शिवाजीराव निंबाळकर, सतीश काटे, संभाजीराव काटे, विशाल निंबाळकर, बाळासाहेब रायते आदी उपस्थित होते. सहकार उद्ध्वस्त करण्याचा डावसभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर ही कारवाई करून सहकार उद्ध्वस्त करण्याचा डाव असल्याचा आरोप अध्यक्ष घोलप यांनी केला. पृथ्वीराज जाचक यांनी कोणता मनमानी कारभार केला हे दाखवून द्यावे. जाचक यांच्या अध्यक्षपदाच्या काळातदेखील कपात करण्यात आली आहे, असे घोलप म्हणाले. मंत्री समितीच्या प्रोसेडिंगनुसार सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मान्यतेने ही कपात करण्यात आली आहे. प्रकल्प उभा राहावा, ही त्यामागील भूमिका आहे. मात्र, कारण नसताना खोट्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. सहकारमंत्र्यांकडे याबाबत ११ मे रोजी सुनावणी आहे. तरीदेखील राजकीय दबावातून ही कारवाई करण्यात आली आहे. इतर कारखान्यांना स्थगिती देऊन केवळ ‘छत्रपती’वर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सहकारमंत्र्यांकडे दाद मागणार आहोत; अन्यथा वेळप्रसंगी उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. - अमरसिंह घोलप, कारखान्याचे अध्यक्ष