शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखालीच!

By admin | Updated: July 25, 2015 04:32 IST

दप्तरांच्या ओझ्याच्या प्रश्नावर राज्यात चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रत्यक्षात ते कमी करण्यासाठी ना शासन, ना पालक, ना शाळा पुढे येत आहेत

पुणे : दप्तरांच्या ओझ्याच्या प्रश्नावर राज्यात चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रत्यक्षात ते कमी करण्यासाठी ना शासन, ना पालक, ना शाळा पुढे येत आहेत. त्यामुळे आजही विद्यार्थी दप्तरांच्या ओझ्याखाली दबलेलेच आहेत. आपल्या वयाच्या, उंचीच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक रोज दप्तराचे ओझे विद्यार्थी मुकाटपणे वाहत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना खांदेदुखी, पाठदुखी झाली आहे. ‘लोकमत’ टीमने केलेल्या पाहणीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी शुक्रवारी शहराच्या विविध भागांमधील शाळांची पाहणी केली. शाळेतील विद्यार्थ्यांचे वजन आणि त्यांच्या दप्तराचे वजन करण्यात आले. यात सर्वच शाळांमधील पहिली ते दहावीतील सर्वच विद्यार्थी जास्त वजन असलेले दप्तर आणत आल्याचे दिसून आले.या राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच घोषणा केली की, ‘‘आता मुलांच्या दप्तरांचे वजन हे त्या मुलाच्या वजनाच्या दहा टक्के असेल.’’ या घोषणेमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला. त्याचबरोबर न्यायालयाने विद्यार्थांच्या पाठीवरील ओझे निश्चित कालावधीत कमी करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. पण ही चर्चा तशी जुनीच आहे. आघाडीचे सरकार असतानाही दप्तरांच्या ओझ्याचा प्रश्न राज्यभर विविध कारणांने गाजत राहिला. यावर मुख्यमंत्र्यांपासून शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक यांच्यापासून या क्षेत्रातील तज्ज्ञांनी खूप उहापोह केला. पण या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर काहीच झाले नाही. युतीचे सरकार येऊन ८ महिने उलटले तरी हे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यापलिकडे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असे काहीच झालेले नाही. त्यामुळे बहुतांशी शाळांमधील मुले आजही २ किलोंपासून १० किलोंपर्यंतचे दप्तराचे वजन मुकाटपणे वाहत आहेत. अनेक मुलांचे वजन अवघे ३०-४० किलो असताना विद्यार्थी ७ ते ८ किलो वजन असलेले दप्तर वाहत आहेत. यावरून या विद्यार्थ्यांची केविलवाणी अवस्था दिसून येत आहे. या मुलांशी चर्चा केली असता, ‘‘सर्व विषयांची पुस्तके, वह्या शाळांमध्ये घेऊन येतो. त्यामुळे रोज दप्तर भरलेलेच असते. कधी कधी तर शाळेनंतर क्लासही असतो. त्यामुळे त्याच्या वह्या, गाईडही दप्तरात आणावी लागतात. दप्तरांच्या ओझ्याने खांदे दुखतात, पाठ दुखते, कंटाळा येतो. पण काय करणार?’’ अशा बोलक्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. काही शाळांमध्ये तर तासांचे वेळापत्रकच नसल्याने मुलांना नाईलाजास्तव सर्वच विषयांच्या वह्या, पुस्तके आणावी लागत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, मुलांच्या या त्रासाकडे पालक आणि शाळा दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.