शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखालीच!

By admin | Updated: July 25, 2015 04:32 IST

दप्तरांच्या ओझ्याच्या प्रश्नावर राज्यात चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रत्यक्षात ते कमी करण्यासाठी ना शासन, ना पालक, ना शाळा पुढे येत आहेत

पुणे : दप्तरांच्या ओझ्याच्या प्रश्नावर राज्यात चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रत्यक्षात ते कमी करण्यासाठी ना शासन, ना पालक, ना शाळा पुढे येत आहेत. त्यामुळे आजही विद्यार्थी दप्तरांच्या ओझ्याखाली दबलेलेच आहेत. आपल्या वयाच्या, उंचीच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक रोज दप्तराचे ओझे विद्यार्थी मुकाटपणे वाहत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना खांदेदुखी, पाठदुखी झाली आहे. ‘लोकमत’ टीमने केलेल्या पाहणीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी शुक्रवारी शहराच्या विविध भागांमधील शाळांची पाहणी केली. शाळेतील विद्यार्थ्यांचे वजन आणि त्यांच्या दप्तराचे वजन करण्यात आले. यात सर्वच शाळांमधील पहिली ते दहावीतील सर्वच विद्यार्थी जास्त वजन असलेले दप्तर आणत आल्याचे दिसून आले.या राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच घोषणा केली की, ‘‘आता मुलांच्या दप्तरांचे वजन हे त्या मुलाच्या वजनाच्या दहा टक्के असेल.’’ या घोषणेमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला. त्याचबरोबर न्यायालयाने विद्यार्थांच्या पाठीवरील ओझे निश्चित कालावधीत कमी करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. पण ही चर्चा तशी जुनीच आहे. आघाडीचे सरकार असतानाही दप्तरांच्या ओझ्याचा प्रश्न राज्यभर विविध कारणांने गाजत राहिला. यावर मुख्यमंत्र्यांपासून शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक यांच्यापासून या क्षेत्रातील तज्ज्ञांनी खूप उहापोह केला. पण या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर काहीच झाले नाही. युतीचे सरकार येऊन ८ महिने उलटले तरी हे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यापलिकडे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असे काहीच झालेले नाही. त्यामुळे बहुतांशी शाळांमधील मुले आजही २ किलोंपासून १० किलोंपर्यंतचे दप्तराचे वजन मुकाटपणे वाहत आहेत. अनेक मुलांचे वजन अवघे ३०-४० किलो असताना विद्यार्थी ७ ते ८ किलो वजन असलेले दप्तर वाहत आहेत. यावरून या विद्यार्थ्यांची केविलवाणी अवस्था दिसून येत आहे. या मुलांशी चर्चा केली असता, ‘‘सर्व विषयांची पुस्तके, वह्या शाळांमध्ये घेऊन येतो. त्यामुळे रोज दप्तर भरलेलेच असते. कधी कधी तर शाळेनंतर क्लासही असतो. त्यामुळे त्याच्या वह्या, गाईडही दप्तरात आणावी लागतात. दप्तरांच्या ओझ्याने खांदे दुखतात, पाठ दुखते, कंटाळा येतो. पण काय करणार?’’ अशा बोलक्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. काही शाळांमध्ये तर तासांचे वेळापत्रकच नसल्याने मुलांना नाईलाजास्तव सर्वच विषयांच्या वह्या, पुस्तके आणावी लागत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, मुलांच्या या त्रासाकडे पालक आणि शाळा दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.