शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखालीच!

By admin | Updated: July 25, 2015 04:32 IST

दप्तरांच्या ओझ्याच्या प्रश्नावर राज्यात चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रत्यक्षात ते कमी करण्यासाठी ना शासन, ना पालक, ना शाळा पुढे येत आहेत

पुणे : दप्तरांच्या ओझ्याच्या प्रश्नावर राज्यात चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रत्यक्षात ते कमी करण्यासाठी ना शासन, ना पालक, ना शाळा पुढे येत आहेत. त्यामुळे आजही विद्यार्थी दप्तरांच्या ओझ्याखाली दबलेलेच आहेत. आपल्या वयाच्या, उंचीच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक रोज दप्तराचे ओझे विद्यार्थी मुकाटपणे वाहत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना खांदेदुखी, पाठदुखी झाली आहे. ‘लोकमत’ टीमने केलेल्या पाहणीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी शुक्रवारी शहराच्या विविध भागांमधील शाळांची पाहणी केली. शाळेतील विद्यार्थ्यांचे वजन आणि त्यांच्या दप्तराचे वजन करण्यात आले. यात सर्वच शाळांमधील पहिली ते दहावीतील सर्वच विद्यार्थी जास्त वजन असलेले दप्तर आणत आल्याचे दिसून आले.या राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच घोषणा केली की, ‘‘आता मुलांच्या दप्तरांचे वजन हे त्या मुलाच्या वजनाच्या दहा टक्के असेल.’’ या घोषणेमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला. त्याचबरोबर न्यायालयाने विद्यार्थांच्या पाठीवरील ओझे निश्चित कालावधीत कमी करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. पण ही चर्चा तशी जुनीच आहे. आघाडीचे सरकार असतानाही दप्तरांच्या ओझ्याचा प्रश्न राज्यभर विविध कारणांने गाजत राहिला. यावर मुख्यमंत्र्यांपासून शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक यांच्यापासून या क्षेत्रातील तज्ज्ञांनी खूप उहापोह केला. पण या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर काहीच झाले नाही. युतीचे सरकार येऊन ८ महिने उलटले तरी हे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यापलिकडे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असे काहीच झालेले नाही. त्यामुळे बहुतांशी शाळांमधील मुले आजही २ किलोंपासून १० किलोंपर्यंतचे दप्तराचे वजन मुकाटपणे वाहत आहेत. अनेक मुलांचे वजन अवघे ३०-४० किलो असताना विद्यार्थी ७ ते ८ किलो वजन असलेले दप्तर वाहत आहेत. यावरून या विद्यार्थ्यांची केविलवाणी अवस्था दिसून येत आहे. या मुलांशी चर्चा केली असता, ‘‘सर्व विषयांची पुस्तके, वह्या शाळांमध्ये घेऊन येतो. त्यामुळे रोज दप्तर भरलेलेच असते. कधी कधी तर शाळेनंतर क्लासही असतो. त्यामुळे त्याच्या वह्या, गाईडही दप्तरात आणावी लागतात. दप्तरांच्या ओझ्याने खांदे दुखतात, पाठ दुखते, कंटाळा येतो. पण काय करणार?’’ अशा बोलक्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. काही शाळांमध्ये तर तासांचे वेळापत्रकच नसल्याने मुलांना नाईलाजास्तव सर्वच विषयांच्या वह्या, पुस्तके आणावी लागत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, मुलांच्या या त्रासाकडे पालक आणि शाळा दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.