शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पथारी विक्रेत्यांना हवी सुरक्षितता

By admin | Updated: November 16, 2016 03:12 IST

अतिक्रमण विभागाचा जाच कमी करावा, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून पथारीवाल्यांचे पुनर्वसन करून स्मार्ट सिटीमध्ये

पुणे : अतिक्रमण विभागाचा जाच कमी करावा, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून पथारीवाल्यांचे पुनर्वसन करून स्मार्ट सिटीमध्ये आम्हालाही सामावून घ्या, अशी पथारीवाल्यांची मागणी आहे. अपवादानेच पुण्यात एखादा रस्ता असा असेल, की त्यावर पथारी विक्रेते नाहीत. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग असे बहुतेक रस्ते विक्रेत्यांनी कायम गजबजलेले असतात. हातरुमालापासून कोटापर्यंत व साध्या टिकल्यांपासून ते महागड्या साड्यांपर्यंत सगळे काही त्यांच्याकडे मिळते.दिवसाच्या (व रात्रीच्याही) वेगवेगळ्या वेळचे विक्रेते वेगवेगळे आहेत. अगदी सकाळी काही जण नाष्टा विक्री करतात. स्टिलच्या डब्यांमध्ये इडली, उपमा, पोहे असे पदार्थ ठेवून त्याची विक्री करतात. सकाळ संपून दुपारची सुरुवात झाली की मग लहान मुलांचे कपडे, महिलांची सौंदर्यप्रसाधने अशा मालाची विक्री लक्ष्मी रस्त्यासारख्या व्यापारी पेठांमध्ये सुरू होते. संध्याकाळ झाली की भेळेपासून चायनिज खाद्यपदार्थ करणाऱ्या विक्रेत्यांची मक्तेदारी सुरू होते. अगदी रात्री काही ठराविक पदपथांवर भाजीपोळी, भातवरण असे जेवणही मिळते. ते खाणारेही विक्रेतेच असतात व विकणारेही विक्रेतच!शहरात सध्या सर्व मिळून एकूण ३ हजारांपेक्षा जास्त पथारी व्यावसायिक (रस्त्यावरील विक्रेत्यांचे सरकारी नाव) आहेत. रस्त्यावरची त्यांची जागा ठरलेली असते. ती रस्त्यावरची असली तरीही एखाद्याच्या दुकानापुढची असेल तर तो दुकानदार किंवा मग महापालिकेचे कर्मचारी, बरेचदा पोलीस अशांना पैसे द्यावेच लागतात. शहराच्या एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी लहानशा जागेवर त्यांचा संसार असतो. रस्त्यावर विक्री करूनच ते तो चालवित असतात. असा व्यवसाय करताना करावा लागणारा गुुंडगिरी, हप्तेवसुली यांच्याशी संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला असतो. तो करीतच त्यांना व्यवसाय करावा लागतो.जप्त केलेला माल सोडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे या सगळ्या त्रासाचा कळसच. त्यासाठी विशिष्ट नमुन्याचा अर्ज लिहून द्यावा लागतो. तो विशिष्ट कर्मचाऱ्यांकडेच द्यावा लागतो. तो कधीही जागेवर नसतो. असला तरी तो दंडाची रक्कम स्वीकारत नाही. त्यासाठी पुन्हा दुसऱ्याच कर्मचाऱ्याकडे खेटे घालावे लागतात. एवढे करून हातात काही पडेल याची खात्री नाही. उपयोगी पडणाऱ्या मालाची आधीच विल्हेवाट लागलेली असते. निरुपयोगी साहित्याची तोडफोड झालेली असते. एक नागरिक म्हणून हे शहर आमचा विचार करणार आहे का? ही त्याची हाक कोणापर्यंत पोहोचणार नाही याची खात्री असल्यामुळेच अशा प्रकारची कारवाई झाली की माल परत मिळविण्याच्या फंदात बहुसंख्य विक्रेते पडत नाहीत. दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर, त्याच वेळेस उभे राहण्यासाठी लागणारे भांडवल मिळविण्याच्या तयारीला ते लागतात.