शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरमध्ये विकासाच्या मुद्द्यावरच शिवसेनेची सरशी

By admin | Updated: February 25, 2017 02:12 IST

पुरंदर तालुक्यात केवळ विकासाच्या मुद्द्यावरच प्रचार करून शिवसेनेने बाजी मारली. एक सेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव वगळता सर्वच नवखे उमेदवार उभे

बी. एम. काळे, जेजुरीपुरंदर तालुक्यात केवळ विकासाच्या मुद्द्यावरच प्रचार करून शिवसेनेने बाजी मारली. एक सेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव वगळता सर्वच नवखे उमेदवार उभे करून यश मिळविले आहे. या विजयाने काँगे्रस वगळता तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांना नुसतेच चारीमुंड्या चीत केले असे नाही, तर भविष्यात उभे राहण्याची उमेदही संपवून टाकली आहे. या पक्षांच्या नेतृत्वाला आत्मचिंतन करायला लावणारी ही निवडणूक ठरली.पिण्याचे पाणी, गुंजवणी धरण, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचे नियोजन, येऊ घातलेला विमानतळ, हडपसर-जेजुरी महामार्गाचे काम, औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण व त्यासाठीचे भूसंपादन याच प्रमुख मुद्द्यांवर शिवसेनेने नियोजनबद्ध प्रचार केला. शिवाय सेनेकडून प्रचारात पहिल्यांदाच एक बदल केला होता. शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे व गटाचा आमचा संबंध नाही, याची अगदी गावागावांतील सभांमधून त्याच गावाच्या ग्रामदैवताची शपथ घेऊन खात्री दिल्याने मतदारांनीही सेनेला साथ दिली. याउलट, विरोधकांनी विकासकामाचे मुद्दे बाजूला ठेवून केवळ सेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनाच लक्ष केले. मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले.तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसची या निवडणुकीत अशी काही वाताहत झाली आहे, की त्यातून सावरण्यासाठी त्यांना राष्ट्रीय नेत्याचीच गरज भासेल. मुळातच राष्ट्रवादीते जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी तालुक्यातील कोणालाही विश्वासात न घेता उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले. तेथेच राष्ट्रवादीचा पक्षस्थापनेतील मूळ गट आणि नव्याने पक्षप्रवेश केलेल्या गटात बंडाळी निर्माण झाली होती. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. राष्ट्रवादीचे पानिपत झाले. याची जबाबदारी स्वीकारून तालुक्यातील पदाधिकारी राजीनामा देतील काय? गटातटाच्या राजकारणात पक्षाचा बळी दिला, पक्षनेते स्थानिक नेत्यांवर कोणती कारवाई करणार? पक्षनेतृत्वही तालुक्यातील नेत्यांच्या गटबाजीला समर्थन देते का? तालुक्यात एकच नेतृत्व का पुढे आणत नाहीत? या प्रतिक्रियाच पक्षाचे भवितव्य अधोरेखित करीत आहेत. पुरंदरच्या काँगे्रसचा एकखांबी तंबूही या निवडणुकीने हादरला आहे. नुकत्याच पार पाडलेल्या सासवड-जेजुरीच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते हवेतच होते. ही हवाच त्यांना या निवडणुकीत अपयशाला कारणीभूत ठरली आहे. नाही म्हणायला बेलसर माळशिरस गणात यश मिळालेले असले, तरीही ते यश पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे. तेथील विमानतळाचा मुद्दा आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी कॉँग्रेसला फायद्याची ठरली, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. स्वत:चा हक्काचा दिवे-गराडे गट इतक्या सहजपणी शिवसेना हिसकावून घेईल, अशी अपेक्षाही मनसेच्या नेतृत्वाला नसेल. सेनेची प्रत्यक्ष कामाची पद्धत व मतदारांशी थेट संपर्क, रायत्याचा रखडलेला प्रश्न यामुळे सेनेला मनसेचा गट जिंकता आला. यात मनसेचे तालुक्यातील अस्तित्वच संपले आहे. तीच गत भाजपाचीही.