शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

शाळेत खिचडी शिजेना !

By admin | Updated: January 23, 2015 23:37 IST

गॅस एजन्सी व बँक यांच्या भोंगळा कारभारामुळे गॅस सिलिंडर बँक लिंकिंग करण्यात प्रचंड अडचणी येत असून, याचा फटका जिल्ह्यातील हजारो शाळांना बसत आहे.

पुणे : गॅस एजन्सी व बँक यांच्या भोंगळा कारभारामुळे गॅस सिलिंडर बँक लिंकिंग करण्यात प्रचंड अडचणी येत असून, याचा फटका जिल्ह्यातील हजारो शाळांना बसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा पोषण आहार शिजवणे कठीण झाले असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महेश बढे यांनी लोकमतला सांगितले.जिल्ह्यात १ जानेवारीपासून डीबीटीएल योजना लागू झाली आहे. यामुळे सर्व गॅस ग्राहकांनी आपले गॅस सिलिंडर कार्ड संबंधित गॅस एजन्सीच्या माध्यमातून बँक खात्यांशी लिंकिंग करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात २४ लाख गॅस ग्राहक असून, आतापर्यंत १४ लाख गॅस ग्राहकांनी बँक लिंकिंग गेले आहे. अद्यापही १० लाख गॅस ग्राहकांचे बँक लिंकिंग झाले नाही. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जानेवारी अखेरपर्यंत गॅस सिलिंडरचे बँक लिंकिंग करा अथवा गॅसचा पुरवठा बंद करू, असे आदेश दिले आहेत. परंतु, याच आदेशाचा फायदा घेऊन काही गॅस एजन्सीने गॅस सिलिंडर देण्यास नकार देत आहेत. दरम्यान, गॅस एजन्सी व बँकांच्या भोंगळ कारभारामुळे बँक खाते क्रमांक देऊनदेखील लिंकिंग होत नसल्याने अनेक ग्राहकांना याचा फटका बसत आहे.जिल्ह्यात डीबीटीएल योजना लागू झाल्याने अनेक शाळांना गॅस सिलिंडर मिळण्यास अडचण येत आहे. काही गॅस एजन्सीमध्ये बँक खाते क्रमांक दिले, तरी आधार कार्डची मागणी केली जाते. परंतु, शाळांच्या नावांवर गॅस असल्याने त्यांचे आधार कार्ड नाही. तसेच बँक खाते क्रमांक देऊनदेखील लिंकिंग होत नसल्याने याचा फटका शाळांना बसत आहे. - महेश बढे , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष बचत गटांचे मानधन थकलेप्रज्ञा कांबळे/ रविकिरण सासवडे ल्ल बारामतीपोषण आहारासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान थकल्याने बचतगटांना मानधन नाही, अनेक ठिकाणी शिक्षकांनाच पदरमोड करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उघडकीस आला आहे. त्यामुळे आहार बनविताना अनेकदा तडजोडी केल्या जात असल्याचेही दिसून आले आहे. निकृष्ठ पोषण आहारांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शाळांमध्ये पाहणी केली असता वेगळेच चित्र समोर आले आहे. अनेक शाळांमध्ये मागील तीन महिन्यांपासून पोषण आहार शिजवणाऱ्या बचत गटांच्या महिलांचे मानधन थकले आहे. त्यामुळे शाळांना स्वत:च हा खर्च भागवावा लागत आहे. मागील चार महिन्यांपासूनचे पोषण आहाराचे धनादेश ही शाळांना मिळाले नाहीत. पोषण आहारामध्ये मुख्यत्वे तांदूळ, डाळ आणि इतर कडधान्यांचा समावेश होतो. धान्याचा दर्जा तपासून पाहण्याची जबाबदारी संबंधित शाळा व मुख्याध्यापकांवर आहे. मात्र, अनुदान थकलेले असल्याने उपलब्ध निधीमध्ये अन्नाचा पुरवठा करावा लागतो. त्यामुळे अनेक ठिकाणी पोषण आहाराचा दर्जा चांगला नसल्याचेही पाहावयास मिळाले. निकृष्ठ आहाराची पाहणी करता मग आमच्या मानधनाकडे लक्ष द्यायला सांगा, असेही अनेक ठिकाणी सांगण्यात आले. ४बारामती तालुक्यातील ३५६ शाळांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘माध्यान्ह भोजन योजनेमध्ये ४६ हजार ३५७ विद्यार्थी समाविष्ट आहेत.४या विद्यार्थ्यांना एका दिवसाला २ हजार ६७२ किलो एवढे धान्य लागते. त्यानुसार महिना ६४ हजार १२८ किलो धान्य लागते. ४बारामती तालुक्यातील २६० स्वयंपाकगृह आहेत, तर ९६ शाळांमध्ये पोषण आहार महिला बचत गट आणि ठेकेदारांच्या मार्फत शिजवला जातो.