शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

आर्थिक कुवत तपासण्याची ‘शाळा’

By admin | Updated: January 31, 2015 01:00 IST

पूर्वप्राथमिक वर्गासाठी पालक रात्र रात्र जागून शाळांच्या बाहेर रांग लावतात. ठरावीक शाळेमध्ये पाल्यास प्रवेश मिळावा,

अमोल जायभाये, पिंपरीपूर्वप्राथमिक वर्गासाठी पालक रात्र रात्र जागून शाळांच्या बाहेर रांग लावतात. ठरावीक शाळेमध्ये पाल्यास प्रवेश मिळावा, यासाठी पालक हरतऱ्हेने प्रयत्न करतो. प्रसंगी अधिक डोनेशन देण्यास तयार होतात. पाल्यासोबत पालकांची मुलाखत घेणे, भरमसाट डोनेशन आदी प्रकारामुळे प्रवेशाचा मार्ग अधिक किचकट, गुंतागुंतीचा आणि त्रासदायक होत आहे. त्यातच काही शाळांनी पालकांची आर्थिक कुवत तपासण्याचा नवा फंडा शोधला असून, पालकांनी पेमेंटस्लिप प्रवेशअर्जासोबत जोडावी, असा फतवा काढला आहे.पूर्वप्राथमिक शाळा प्रवेशासाठी नियमावली पाळली जात नाही. यासाठी सगळे नियम शाळा ठरवत असल्याने पालकांची धावपळ होत आहे. शाळा प्रशासन यामध्ये मनमानी पद्धतीने कारभार करीत असतानाही त्याला लगाम घालण्यासाठी सरकार उदासीन असल्याचे दिसून येत आहे. पूर्वप्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी व वयाची निश्चिती करण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या हालचाली झाल्या आहेत. मात्र, नियमित भेडसावणारा प्रवेशाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याच प्रकारची उपायोजना करण्यात येत नाही, ही मोठी शोकांतिकाच आहे. प्रवेशासाठी मनमानी पद्धतीने रक्कम आकारतात. याकडेही शासन डोळेझाक करीत आहे. शहरातील काही इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेशअर्ज वाटपावरून गोंधळाचे प्रकार घडले आहेत. प्रत्येक शाळा मनमानी पद्धतीने अर्ज वाटपाची तारीख ठरवत आहेत. अर्जवाटपाची तारीख आधी जाहीर केली जात नाही. सगळ्या शाळांची तारीख समजण्यासाठी काहीच यंत्रणा नाही. शाळांची तारीख समजण्यासाठी प्रत्येक शाळेत हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे पालकांचा वेळ नाहक वाया जात आहे. त्यांना मोठा त्रासही सहन करावा लागतो. परिसरानुसार शाळा आपले शुल्क ठरवत आहेत. प्रत्येक ठिकाणी कमी-जास्त शुल्क आकारले जात आहेत. मूल लहान असल्याने जवळच्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी पालक आग्रही असतात. त्यामुळे कितीही शुल्क असले, तरी त्यांना ते भरावेच लागते. शुल्क भरण्यासाठीही रांग असतेच. शाळेने पालकांच्या मुलाखती घेणे, त्यांची आर्थिक पात्रता तपासणे यापेक्षा मुलांच्या गुणवत्तेवर अधिक भर देण्याची गरज आहे. विद्यार्थी घडविण्यावर अधिक भर दिला गेला पाहिजे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत शुल्क आणि अमाप पैसा कसा गोळा करता येईल, यासाठी वेगवेगळे तंत्रच शाळा वापरत आहेत. अनेक ठिकाणी पालकांनी गोंधळही केला आहे. मात्र, ते तेवढ्या प्रमाणात होते. त्यानंतर सगळेच विसरून जातात. पालकही याचा पाठपुरावा करीत नाही. शहरामध्ये पालक संघटित होत नसल्याने शाळा मनमानी करताना दिसून येतात. पालकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी शासकीय स्तरावर या शाळेच्या प्रवेशासाठी समितीची स्थापना करावी. या समितीच्या माध्यमातून सर्व शाळांवर वचक निर्माण केला जाण्याची गरज आहे. त्याचबरोबर प्रवेशाचे निकष काय, हेही ठरवले गेले पाहिजेत. शहरातील सगळ्या शाळांचे प्रवेश एकाच वेळी होतील. त्यांच्या संकेतस्थळावर याद्या टाकाव्यात. महाविद्यालयात प्रवेश घेताना राबवण्यात येणारी संकेतस्थळाची योजना येथे ही अमलात येणे गरजेचे आहे. रात्रभर जागून प्रवेश घ्यावा लागतो. त्यानंतर पैसे भरण्यासाठी सुद्धा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बँकेमध्ये चलन भरण्याची सुविधा निर्माण करून हे प्रवेश अधिक सुलभ व पालकांसाठी सोपे करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी शासन स्तरावर हलचाली होण्याची गरज आहे, अशी मागणी पालक वर्ग करीत आहे.