शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांमुळे विषमतेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 06:40 IST

देशात गोरक्षा, बीफ, नथुराम गोडसे आदी नॉन-इशू पुढे आल्यामुळे दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडले होते. विषमतेच्या प्रश्नांवरील लढे पडद्याआड टाकण्यासाठीच हे मुद्दे पुढे आणले जात होते.

देशात गोरक्षा, बीफ, नथुराम गोडसे आदी नॉन-इशू पुढे आल्यामुळे दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडले होते. विषमतेच्या प्रश्नांवरील लढे पडद्याआड टाकण्यासाठीच हे मुद्दे पुढे आणले जात होते. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व शेतकºयांनी एकत्र येऊन त्यांच्या प्रश्नांवर मोठे आंदोलन उभारले. या आंदोलनामुळे विषमतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात काही महिन्यांपूर्वी विविध समाजांचे मोर्चे निघाले होते. या मोर्चांची ऊर्जा शेतकरी आंदोलनाकडे वळली आहे, हीदेखील चांगली गोष्ट यानिमित्ताने घडली, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.देशात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांच्या जगण्याशी संबंधित असलेले अनेक महत्त्वाचे विषय पडद्याआड पडले होते. मात्र राज्याच्या सर्व भागांतून शेतकºयांनी एकत्र येत मोठे आंदोलन केल्यामुळे विषमतेचे मूळ प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्यास मदत झाली आहे.शहरी व नोकरदारवर्गाने शेतकºयांचे प्रश्न नीट समजून घेतले पाहिजेत. कर भरण्याशी शेतकºयांची कर्जमाफी जोडता येणार नाही.जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे शेतमालाचे भाव नेहमीच कमी राहिले आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षांनीही त्यांच्या फायद्यासाठी महागाई वाढू नये म्हणून शेतकºयांचे भाव पाडण्याचे डावपेच खेळले. त्यामुळे वर्षानुवर्षे शेतकरी पिचला गेला आहे. त्या तुलनेत शासनाकडून शेतकºयांना देण्यात आलेली कर्जमाफी ही अगदी किरकोळ आहे.नियोजित अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण या दोन्हीचे तोटे शेतीला सहन करावे लागले. देशाच्या अन्नसुरक्षिततेसाठी शेती व्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र आज शेतकºयाला अनेक प्रकारच्या रिस्क घेऊन शेती करावी लागत आहे. वस्तुत: देशाच्या अन्नसुरक्षितेसाठी सरकारने शेतीकडे जास्त लक्ष देणे आवश्यक होते. मात्र ते झाले नाही, त्यामुळे शेतकºयांचे प्रश्न गंभीर झाले आहेत.राज्यात उभ्या राहिलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. जागतिकीकरणामुळे शेतीचे नुकसान झाले असे मानणाºया डाव्या संघटना व जागतिकीकरणाचे फायदे शेतीला मिळू शकणार नाहीत असे मानणाºया इतर शेतकरी संघटनांचे नेते हे सगळेच सुकाणू समितीमध्ये एकत्र आले आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला आणखी धार आली आहे.संविधान हीरक महोत्सवी वर्ष २०१०मध्ये साजरे करण्यात आले. त्या वेळी संविधानाबद्दल लोकांना खूपच कमी माहिती असल्याचे आम्हाला दिसून आले. त्यातून संविधानाबद्दल अनेक गैरसमजही निर्माण झाले होते. संविधान हे केवळ संसद आणि सर्वोच्च न्यायालयासाठीच आहे, त्याचा आमच्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध, संविधान म्हणजे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आरक्षणाची तरतूद असे गैरसमज लोकांमध्ये होते. हे गैरसमज दूर करून लोकांना खºया अर्थाने संविधानातील विविध पैलू उलगडून दाखविण्यासाठी संविधानाच्या प्रचार व प्रसाराचे काम आम्ही हाती घेतले.संविधानाबाबत विविध गटांतील लोकांशी संवाद साधण्यास आम्ही सुरुवात केली. संविधानाची अंमलबजावणी केवळ संसदेने करायची नाही तर अगदी आपल्या घरातही संविधानाच्या तत्त्वांचा संबंध येतो. संविधानाच्या कलमानुसार त्यांना ते उलगडून दाखविण्यात आले. संविधानाने दिलेल्या हक्कांसाठी तुम्ही रस्त्यावर आले पाहिजे हे त्यांना या वेळी सांगण्यात आले. गेल्या ७ वर्षांत संविधान परिचयाचे २०० कार्यक्रम, शिबिरे घेण्यात आले. संविधानावर एक पुस्तक मागील वर्षी प्रकाशित करण्यात आले होते. वर्षभरात त्याच्या १७ हजार प्रती विकल्या गेल्या आहेत.कष्टकºयांच्या जगण्या-मरण्याच्या लढाईमध्ये जात हा घटक सातत्याने आड येत आहे. त्यांच्यातील जातीय अस्मितेची धार कमी करण्यासाठी काय करता येईल यावर सध्या प्राधान्याने विचार करण्यात येत आहे.जात पंचायतीच्या विषयावर एस. एम. जोशी फाउंडेशन व मासूम या संस्थांच्या वतीने ८ मार्च रोजी एक शिबिर घेण्यात आले. त्याचाचपुढचा भाग म्हणून येत्या १०, ११व १२ आॅगस्ट २०१७ रोजी ‘जातीव्यवस्थेचे स्वरूप आणि जाती अंत’ या विषयावर ३ दिवसांची परिषद घेण्यात येणार आहे.