शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

क्रांतिकारकांचे कुटुंबीय येणार घुमानला

By admin | Updated: March 23, 2015 00:57 IST

शहीद शिवराम हरी राजगुरू यांचे कुटुंबीय घुमान (पंजाब) येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

पुणे : भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून लाहोरच्या तुरुंगात हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव थापर आणि शहीद शिवराम हरी राजगुरू यांचे कुटुंबीय घुमान (पंजाब) येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.घुमान येथे ३ ते ५ एप्रिलदरम्यान ८८वे संमेलन होत आहे. या विषयी माहिती देताना स्वागताध्यक्ष भारत देसडला म्हणाले, ‘‘भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान बहुमूल्य आहे. सायमन कमिशनचा निषेध करताना लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिशांनी लाठीहल्ला केला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी या त्रिमूर्तींनी जॉन सँडहर्स्ट या इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला. त्यामुळे त्यांना २३ मार्च १९३१ रोजी फासावर चढविण्यात आले. त्यांचे क्रांतिकार्य ऐक्य, बलिदान व त्यागाचे प्रतीक आहे. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना संमेलनाचे निमंत्रण दिले व त्यांनी ते स्वीकारले आहे.’’भगतसिंगांचे पुतणे सरदार कुलतारसिंग यांचा मुलगा किरणजितसिंग सहारणपूर येथून येणार आहे. सुखदेव यांचे नातू अनुज थापर उत्तर प्रदेशातून येणार आहेत. राजगुरू यांचे पुतणे सत्यशील आणि स्नुषा आरती राजगुरू पुण्यातून संमेलनासाठी येणार आहेत. (प्रतिनिधी)