शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

दुसऱ्याच्या दारात टाकण्यापेक्षा परिसरातच जिरवा कचरा

By admin | Updated: August 12, 2014 03:48 IST

शहरात दररोज दीड हजार टनांवर निर्माण होत असलेला कचरा कोठे टाकायचा, हा प्रश्न महापालिकेसमोर उभा आहे. ग्रामीण भागात जागा शोधल्या जात आहेत

पुणे : शहरात दररोज दीड हजार टनांवर निर्माण होत असलेला कचरा कोठे टाकायचा, हा प्रश्न महापालिकेसमोर उभा आहे. ग्रामीण भागात जागा शोधल्या जात आहेत; परंतु तेथील ग्रामस्थांचा विरोध आहे. उरुळी देवाची-फुरसुंगीच्या एका आंदोलनाने संपूर्ण शहराला कचऱ्याच्या ढिगात लोटले. त्यामुळे दुसऱ्याच्या दारात टाकण्यापेक्षा परिसरात निर्माण झालेला कचरा तेथेच जिरविण्याचे प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. गेल्या दशकभरात शहराची झपाट्याने होणारी वाढ, वाढती लोकसंख्या, तसेच या लोकसंख्येच्या तुलनेत दर वर्षी सरासरी २० ते ३० टक्क्यांनी वाढणाऱ्या कचऱ्याच्या बोजाची स्थिती पाहता भविष्यात ही कचराकोंडी कायम राहणार आहे. २००७ मध्ये शहरात दर वर्षी अवघा ७५० टन कचरा निर्माण होत होता. या कचऱ्याचे प्रमाण २०१३ मध्ये १५०० ते १६०० टनांवर पोहोचलेले आहेत. सद्या या निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रियेत पालिकेस यश येत असले, तरी २०२५ पर्यंत शहराची लोकसंख्या ५० लाखाच्यावर पोहोचण्याची शक्यता असून, कचरानिर्मिती ३ ते ४ हजार टनांच्या घरात पोहोचेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील कचऱ्याच्या प्रकल्पांसाठी जागा मिळविताना येणाऱ्या अडचणी, प्रकल्पांना असणारा स्थानिक नागरिकांचा विरोध पाहता कचरा परिसरातच जिरविणे गरजेचे आहे.