शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

संततधार!धरणक्षेत्रात दमदार पाऊस : खडकवासला पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ९३ मिलिमीटर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 03:19 IST

मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परिणामी शेतकऱ्यांम्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र शनिवारी (दि. १९) रात्री ११ वाजल्यापासून तसेच रविवारी दिवसभर पावसाने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे बळीराजा सुखावला. या पावसामुळे खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांना मोठा फायदा होणार आहे. पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली असून विसर्ग करण्यात येत आहे.

पुणे : मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परिणामी शेतकऱ्यांमध्ये  चिंतेचे वातावरण होते. मात्र शनिवारी (दि. १९) रात्री ११ वाजल्यापासून तसेच रविवारी दिवसभर पावसाने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे बळीराजा सुखावला. या पावसामुळे खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांना मोठा फायदा होणार आहे. पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली असून विसर्ग करण्यात येत आहे. पावसात सातत्य राहिल्यास आणखी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यातील डिंभे आणि चासकमान या दोन धरणांतून मोठ्या पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये डिंभे धरणातून १५ हजार ५१८ क्युसेक्सने, तर चासकमान धरणातून १२ हजार ८९६ क्युसेक्सने नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्यांनतर भामा आसखेड ६ हजार ८०० क्युसेक्स, मुळशी ६ हजार १०० क्युसेक्स, घोड ५ हजार ४० क्युसेक्स, पवना २ हजार २०८ क्युसेक्स, आंध्रा ७२२ क्युसेक्स, कळमोड ६२८ क्युसेक्स, गुंजवणी ३०८ क्युसेक्स, कासारसाई ३०० क्युसेक्स आणि नीरा देवघर ३० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस हा खडकवासला (९३ मिमी) धरण क्षेत्रात झाला आहे. त्याखालोखाल येडगाव (८५मिमी), पवना (६० मिमी), कासारसाई (५० मिमी), चासकमान (४९ मिमी), वरसगाव (४९ मिमी), पानशेत (४६ मिमी), भामा आसखेड (४३ मिमी), टेमघर (४२ मिमी), आंध्रा (४१ मिमी), कळमोडी (४० मिमी), वडीवळे (४० मिमी), वडज (३२ मिमी), नाझरे (३२ मिमी), मुळशी (३१ मिमी), पिंपळगाव जोगे (२३ मिमी), माणिकडोह (१५ मिमी), गुंजवणी (१५ मिमी) आणि भाटघर (१० मिमी) पावसाची रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झाली आहे. तर उजनी, नीरा देवघर, वीर, घोड आणि विसापूर या पाच धरण क्षेत्रात अद्याप पावसाने पाठ फिरवली आहे.पावसामुळे मुख्यत: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला प्रकल्पात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पात एकूण ८५.४२ टक्के म्हणजे २४.९१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पातील खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीन धरणे जवळपास भरली आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, तर टेमघर धरणात ४०.७० टक्के साठा झाला आहे. मात्र या धरणाची पावसाळ्यानंतर दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी नदीपात्रातून सोडण्यात येणार आहे. तर येडगाव, डिंभे, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंध्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, भाटघर, नीरा देवघर आणि खडकवासला आणि वीर आदी धरणे जवळपास भरली आहेत.नीरा खोऱ्यांतील भाटघर, नीरा देवघर आणि वीर आणि गुंजवणी धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक गुंजवणी १५ मिमी, तर भाटघरमध्ये १० मिमी पाऊस पडला आहे.जिल्ह्यातील २५ धरणांपैकी १५ धरणांत ९५ टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा झाला आहे. मात्र सहा धरणे अद्याप जेमतेम अर्धीच भरली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे खरीपाची पिकेही कात्रीत सापडली होती.पवनेला पूरपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, मुळशी भागात गेल्या २४ तासांपासून संततधार पावसाला सुरुवात झाली असून, रविवारीही पावसाचा जोर वाढलेलाच होता. त्यामुळे पवना धरणाचे सहाही दरवाजे उघडण्यात आले असून, ३६३६ क्युसेक पाणी नदीत सोडले आहे. पवनेला पूर आला आहे. इंद्रायणी, मुळा या नद्यांच्याही पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे.जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मावळातील पवना, लोणावळा, वळवण डॅम आणि कासारसाई येथील धरण भरले होते.नाझरे धरणक्षेत्रात ३२ मिमी पाऊसपावसाळा सुरू झाल्यापासून पुरंदर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. मात्र शनिवारी रात्रीपासून पुरंदर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे. पुरंदर तालुक्यासाठी महत्त्वाचे असलेल्या नाझरे धरणक्षेत्रात ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.बारामती, इंदापूर, पुरंदर, दौैंडला दिलासाउर्वरित २० टक्के शेतीपिकांना उपयोगबारामती : गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेल्या पावसाने बारामती शहर, तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. बागायती भागात नीरा डावा कालव्याच्या आवर्तनाने उसपिकाला जीवदान मिळाले आहे. मात्र, जिरायती भागातील जवळपास ८० टक्के पिके जळून गेली आहेत. त्यामुळे आज आलेला पाऊस म्हणजे शेतीपिकांना उपयुक्त ठरणार नसल्याचे चित्र आहे.बाजरी, मका, पिकाला फायदाइंदापूर : शनिवारी रात्रीपासून आज (दि.२०) सायंकाळी चारपर्यंत शहर परिसरात सर्वदूर चांगला पाऊस झाला. असाच पाऊस आठ ते दहा दिवस राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तो खरा ठरला तर बाजरी, मका, तूर आदि पिकांच्या वाढीसाठी फायदा होणार आहे, असे कृषीतज्ज्ञांचे मत आहे.पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात जोरजेजुरी : पुरंदर तालुक्यात काल रात्रीपासून ११ वाजल्यापासून आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात मात्र पावसाचा जोर होता. या परिसरातील ओढे-नाले वाहत होते.पावसाचा जोर कायम राहिलाच तर किमान रब्बी हंगामाला याचा फायदा होणार असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात वर्षभरात साधारणपणे ४५७ मिमी एवढी पावसाचीसरासरी आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आजअखेर केवळ १२५ मिमी सरासरी पाऊस झाला आहे, गेल्या वर्षी आजअखेर सरासरी २४५ मिमी पाऊस झाला होता.दौंडला सलग २० तास पाऊसदौंड : दौंड शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्व थरातून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, सलग २० तासांच्यावर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दौंडच्या आठवडेबाजारासह व्यापारपेठेवर परिणाम झाला. शनिवारी रात्री साडेदहा नंतर पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या. रात्रभर पावसाच्या सरी कमी-जास्त प्रमाणात पडत होत्या. रात्री खंडित झालेला वीजपुरवठा रविवारी दुपारी पूर्ववत झाला. रविवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला होता, तो जोर सायंकाळच्या सुमारास ओसरला. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते चिखलमय झाले, तर काही रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचलेले होते.दौंड तालुक्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे याचा फायदा शेतीला होईल. आठवडाभर जर असाच पाऊस अधूनमधून कायम राहिल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न राहणार नाही. ऐन पावसाळ्यात तालुक्यातील कासुरडी, भरतगाव, डाळिंब गावात टँकरची मागणी आहे.- विनायक गुळवे, ़प्रभारी गटविकास अधिकारी, दौंड