शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' सीन; आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
10
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
11
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
13
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
14
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
15
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
16
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
17
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
18
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
19
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
20
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट

प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी मिळणार मोफत

By admin | Updated: March 11, 2017 03:15 IST

शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी बगीचा, रस्तेबांधणी, बांधकाम व वापरण्यासाठी टँकरद्वारे मोफत उपलब्ध करून देण्याची यंत्रणा पालिकेच्या वतीने

- दीपक जाधव,  पुणे शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी बगीचा, रस्तेबांधणी, बांधकाम व वापरण्यासाठी टँकरद्वारे मोफत उपलब्ध करून देण्याची यंत्रणा पालिकेच्या वतीने उभारण्यात आली आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे सांडपाण्याचा पुनर्वापर होऊन पाण्याची मोठी बचत होणार आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणारी पुणे महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे. शहरामध्ये दररोज ७५० एमएलडी इतके सांडपाणी तयार होते, त्यापैकी ४५० एमएलडी इतक्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा नदीत सोडले जाते. त्याऐवजी या सांडपाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची बचत करण्याचा आराखडा पालिकेच्यावतीने तयार करण्यात आला आहे. बगीचा, रस्तेबांधणी, बांधकाम यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. त्याऐवजी त्यासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यास सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे. वाचविलेले हे पाणी नागरिकांसाठी तसेच शेतीसाठी वापरता येणार आहे. मुख्य म्हणजे सांडपाण्याचा पुनर्वापर होत असल्याने नदीचे प्रदूषण टाळण्यास मोठी मदत होणार आहे.शहरामध्ये सध्या ९ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित आहेत. बोपोडी (१८ एमएलडी), एरंडवणा (५० एमएलडी), नवीन नायडू (११५ एमएलडी), विठ्ठलवाडी (३२ एमएलडी), बाणेर (३० एमएलडी), खराडी (४० एमएलडी), तानाजीवाडी (१७ एमएलडी), तोफखाना (४५ एमएलडी), नवीन कसबा (१६० एमएलडी) अशी या प्रकल्पांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. यापैकी भैरोबा नाला, विठ्ठलवाडी, बोपोडी, बाणेर, खराडी, नायडू आदी केंद्रांवर शुद्ध केलेले सांडपाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्याचबरोबर येत्या १५ दिवसांमध्ये पालिकेला सांडपाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र टँकर उपलब्ध होणार आहे. जायका कार्यान्वित झाल्यास मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार पाणीशहरात लवकर एक हजार कोटी रुपये खर्च करून नदीसुधारणेचा जायका प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. याअंतर्गत सांडपाणी शुद्धीकरणाचे मोठ्या क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यानंतर आणखी मोठ्या प्रमाणात नागरिकांना वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.पुनर्वापरामुळे पाण्याची मोठी बचतशहरातील महापालिकेची व खासगी उद्याने, रस्तेबांधणी, बांधकामे यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. यासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याच्या चांगल्या उपक्रमास सुरुवात झाल्यानंतर पाण्याची मोेठी बचत होणार आहे.पाश्चात्त्य देशांमध्ये मैलापाण्यांवर प्रक्रिया करून ते पिण्याइतपत योग्य बनविले जाते. आपल्याकडे सध्या प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्यासाठी सुरुवात केली जात असल्याने भविष्यातील पाणी बचतीचे ते मोठे पाऊल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.प्रक्रिया केलेले पाणी हवे असल्यास नागरिकांनी संपर्क करावा : नागरिकांना बगीचा, बांधकाम व वापरण्यासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी मोफत उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. ज्यांना त्याची आवश्यकता असेल त्यांनी महापालिकेच्या मैलापाणी शुद्धीकरण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी केले आहे.