शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

अठरा गाव मावळातील लोकांनी मांडला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:11 IST

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील अठरा गाव परिसरातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचत आपल्या व्यथा मांडल्या. सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ...

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील अठरा गाव परिसरातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचत आपल्या व्यथा मांडल्या. सर्व समस्यांचे निराकरण करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. वेल्हे तालुक्यातील पासली येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांनी

येथील ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेत शंकाचे निरसन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, पंचायत समिती सभापती दिनकर सरपाले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक रेवन्नाथ दारवटकर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष रेणुसे, माजी अध्यक्ष शंकर भुरुक, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने नंदू रसाळ, सुधीर रेणुसे, रोहिदास शेंडकर, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, महावितरणचे कार्यकारी उपअभियंता शैलेश गिते, वेल्हे शाखा अभियंता संतोष शिंदे, शिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

अठरा गाव परिसरात कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे आहेत. परंतु या एकाही बंधाऱ्यात पाणी साठत नाही, कारण हे सर्व बंधाऱ्याची दुरुस्ती झालेली नाही. सर्व ठिकाणी गळती असल्याने पाणी साठत नसल्याची तक्रार विलास शिळीमकर यांनी केली. तर निगडे, कुंबळे, केळद, पासली येथील गावठाणातील महावितरणचे सडलेले खांब त्वरित बदलावे तर पासली येथे स्वंतत्र रोहित्र बसवावे,

अशी मागणी केळदचे सरपंच रमेश शिंदे यांनी केली. तसेच वेल्हे ते पासली रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करुन मिळावा, असे बापू कुमकर यांनी सांगितले. तर शाळा दुरुस्ती, तसेच शाळांना नवीन इमारती, नवीन वर्गखोल्या लागणार असल्याचे शिवाजी पोटे यांनी सांगितले. निगडे, कुंबळे, वरोती, हारपुड आदी गावांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असून या ठिकाणी विहिरी तसेच पाईप लाईन टाकण्याची अत्यंत गरज असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

अठरा गाव मावळ परिसरात कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे असुन देखील निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने एकाही बंधाऱ्यात पाणी साठत नाही. हे बंधारे ताबडतोब दुरुस्त करावेत, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. सूत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले तर आभार विलास शिळीमकर यांनी मानले.

चौकट

मंजुर झालेली व सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता नागरिकांनी, सरपंचांनी तपासून घ्यावी तसेच कामे दर्जेदार झाली पाहिजेत, यासाठी सतर्क रहावे. शाळा दुरुस्ती,तसेच नवीन वर्गखोली, अंगणवाडी इमारतीसाठी प्रस्ताव ताबडतोब द्या. अठरा गाव मावळ परिसरातील गळती असलेल्या बंधाऱ्यांची ताबडतोब दुरुस्ती करुन घेण्याच्या सूचना छोटे पाटबंधारे विभागाला दिल्या. पाणीपुरवठा योजनेतील कामे त्वरित सुरु करा व टंचाईग्रस्त गावात जाऊन पाण्यासाठी अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतीपंपासाठी वीज कनेक्शन ताबडतोब शेतकऱ्यांना देण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

-रणजित शिवतरे, उपाध्यक्ष

फोटो - पासली (ता. वेल्हे) येथे आढावा बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे.