शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अठरा गाव मावळातील लोकांनी मांडला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:11 IST

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील अठरा गाव परिसरातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचत आपल्या व्यथा मांडल्या. सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ...

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील अठरा गाव परिसरातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचत आपल्या व्यथा मांडल्या. सर्व समस्यांचे निराकरण करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. वेल्हे तालुक्यातील पासली येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांनी

येथील ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेत शंकाचे निरसन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, पंचायत समिती सभापती दिनकर सरपाले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक रेवन्नाथ दारवटकर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष रेणुसे, माजी अध्यक्ष शंकर भुरुक, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने नंदू रसाळ, सुधीर रेणुसे, रोहिदास शेंडकर, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, महावितरणचे कार्यकारी उपअभियंता शैलेश गिते, वेल्हे शाखा अभियंता संतोष शिंदे, शिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

अठरा गाव परिसरात कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे आहेत. परंतु या एकाही बंधाऱ्यात पाणी साठत नाही, कारण हे सर्व बंधाऱ्याची दुरुस्ती झालेली नाही. सर्व ठिकाणी गळती असल्याने पाणी साठत नसल्याची तक्रार विलास शिळीमकर यांनी केली. तर निगडे, कुंबळे, केळद, पासली येथील गावठाणातील महावितरणचे सडलेले खांब त्वरित बदलावे तर पासली येथे स्वंतत्र रोहित्र बसवावे,

अशी मागणी केळदचे सरपंच रमेश शिंदे यांनी केली. तसेच वेल्हे ते पासली रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करुन मिळावा, असे बापू कुमकर यांनी सांगितले. तर शाळा दुरुस्ती, तसेच शाळांना नवीन इमारती, नवीन वर्गखोल्या लागणार असल्याचे शिवाजी पोटे यांनी सांगितले. निगडे, कुंबळे, वरोती, हारपुड आदी गावांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असून या ठिकाणी विहिरी तसेच पाईप लाईन टाकण्याची अत्यंत गरज असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

अठरा गाव मावळ परिसरात कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे असुन देखील निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने एकाही बंधाऱ्यात पाणी साठत नाही. हे बंधारे ताबडतोब दुरुस्त करावेत, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. सूत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले तर आभार विलास शिळीमकर यांनी मानले.

चौकट

मंजुर झालेली व सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता नागरिकांनी, सरपंचांनी तपासून घ्यावी तसेच कामे दर्जेदार झाली पाहिजेत, यासाठी सतर्क रहावे. शाळा दुरुस्ती,तसेच नवीन वर्गखोली, अंगणवाडी इमारतीसाठी प्रस्ताव ताबडतोब द्या. अठरा गाव मावळ परिसरातील गळती असलेल्या बंधाऱ्यांची ताबडतोब दुरुस्ती करुन घेण्याच्या सूचना छोटे पाटबंधारे विभागाला दिल्या. पाणीपुरवठा योजनेतील कामे त्वरित सुरु करा व टंचाईग्रस्त गावात जाऊन पाण्यासाठी अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतीपंपासाठी वीज कनेक्शन ताबडतोब शेतकऱ्यांना देण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

-रणजित शिवतरे, उपाध्यक्ष

फोटो - पासली (ता. वेल्हे) येथे आढावा बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे.