शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अठरा गाव मावळातील लोकांनी मांडला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:11 IST

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील अठरा गाव परिसरातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचत आपल्या व्यथा मांडल्या. सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ...

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील अठरा गाव परिसरातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचत आपल्या व्यथा मांडल्या. सर्व समस्यांचे निराकरण करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. वेल्हे तालुक्यातील पासली येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांनी

येथील ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेत शंकाचे निरसन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, पंचायत समिती सभापती दिनकर सरपाले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक रेवन्नाथ दारवटकर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष रेणुसे, माजी अध्यक्ष शंकर भुरुक, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने नंदू रसाळ, सुधीर रेणुसे, रोहिदास शेंडकर, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, महावितरणचे कार्यकारी उपअभियंता शैलेश गिते, वेल्हे शाखा अभियंता संतोष शिंदे, शिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

अठरा गाव परिसरात कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे आहेत. परंतु या एकाही बंधाऱ्यात पाणी साठत नाही, कारण हे सर्व बंधाऱ्याची दुरुस्ती झालेली नाही. सर्व ठिकाणी गळती असल्याने पाणी साठत नसल्याची तक्रार विलास शिळीमकर यांनी केली. तर निगडे, कुंबळे, केळद, पासली येथील गावठाणातील महावितरणचे सडलेले खांब त्वरित बदलावे तर पासली येथे स्वंतत्र रोहित्र बसवावे,

अशी मागणी केळदचे सरपंच रमेश शिंदे यांनी केली. तसेच वेल्हे ते पासली रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करुन मिळावा, असे बापू कुमकर यांनी सांगितले. तर शाळा दुरुस्ती, तसेच शाळांना नवीन इमारती, नवीन वर्गखोल्या लागणार असल्याचे शिवाजी पोटे यांनी सांगितले. निगडे, कुंबळे, वरोती, हारपुड आदी गावांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असून या ठिकाणी विहिरी तसेच पाईप लाईन टाकण्याची अत्यंत गरज असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

अठरा गाव मावळ परिसरात कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे असुन देखील निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने एकाही बंधाऱ्यात पाणी साठत नाही. हे बंधारे ताबडतोब दुरुस्त करावेत, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. सूत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले तर आभार विलास शिळीमकर यांनी मानले.

चौकट

मंजुर झालेली व सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता नागरिकांनी, सरपंचांनी तपासून घ्यावी तसेच कामे दर्जेदार झाली पाहिजेत, यासाठी सतर्क रहावे. शाळा दुरुस्ती,तसेच नवीन वर्गखोली, अंगणवाडी इमारतीसाठी प्रस्ताव ताबडतोब द्या. अठरा गाव मावळ परिसरातील गळती असलेल्या बंधाऱ्यांची ताबडतोब दुरुस्ती करुन घेण्याच्या सूचना छोटे पाटबंधारे विभागाला दिल्या. पाणीपुरवठा योजनेतील कामे त्वरित सुरु करा व टंचाईग्रस्त गावात जाऊन पाण्यासाठी अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतीपंपासाठी वीज कनेक्शन ताबडतोब शेतकऱ्यांना देण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

-रणजित शिवतरे, उपाध्यक्ष

फोटो - पासली (ता. वेल्हे) येथे आढावा बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे.