शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

परखड अभिव्यक्ती हेच ‘पुरुषोत्तम’चे यश

By admin | Updated: December 26, 2016 03:54 IST

पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानदंड प्रस्थापित करणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीमध्ये विविध महाविद्यालयांच्या संघांनी आपले कलात्मक कौशल्य सिद्ध केले.

नम्रता फडणीस/ पुणेपुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानदंड प्रस्थापित करणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीमध्ये विविध महाविद्यालयांच्या संघांनी आपले कलात्मक कौशल्य सिद्ध केले. ‘जिंकणे किंवा हारणे’ या हेतूच्या पलीकडे जाऊन पुरुषोत्तम करंडक स्पर्धा अभिव्यक्तीचा एक खुला रंगमंच म्हणून समोर येत आहे. महाअंतिम फेरीचे परीक्षक म्हणून मोलाची कामगिरी बजावलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शक किरण यज्ञोपवीतदेखील हेच निरीक्षण नोंदवितात. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून ‘तरुणाई कोणताही अभिनिवेश न ठेवता विषयांबाबतचे आकलन, विचार आणि सशक्त मांडणीतून परखडपणे अभिव्यक्त होत आहे, हेच या स्पर्धेचे यश आहे’ असे ते आवर्जून सांगतात. * गेल्या ५० वर्षांत पुरुषोत्तम स्पर्धेमध्ये झालेल्या बदलाविषयी काय सांगाल?- सुरुवातीपासूनच पुरुषोत्तमने एक ’पॅरामीटर सेट’ केला. स्पर्धेत अमूक एक प्रकारची एकांकिका अशा पद्धतीने सादर केली तर ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकेल किंवा हमखास पारितोषिकासाठी प्राप्त ठरेल हेच सादरीकरणाचे मोजमाप ठरलेले असायचे, ही मानसिकता आजही काही प्रमाणात कायम असल्याचे दिसले. त्यामुळे यंदा स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये तीस ते चाळीस वर्षांपूर्वी सादर झालेल्या ‘मैत’ किंवा ‘सांबरी’ या एकांकिका संघांकडून सादर झाल्या. कौतुकाचे आकर्षण असल्याने जुन्या विषयांना प्राधान्य दिले गेले. * संघाच्या सादरीकरणांमध्ये काय वेगळेपणा जाणवला?- काही संघांनी खूप छान विषय निवडले. त्यात अभिनयातील सशक्तता हा एक निकष ठेवून काही व्यक्तिरेखा विशिष्ट व्यक्तींसाठी निर्माण केल्या गेल्या. एका संघाने सेलिबल पायरसी विषयावर खूप सुंदरपणे मांडणी केली, त्या विषयाच्या सादरीकरणामागचा दृष्टिकोन खरच खूप वेगळा होता. ते अशाच पद्धतीने सादर करायचे असे काही ठरविण्यात आले नव्हते, मात्र विषयाचे भान ठेवून आकलनक्षमतेनुसार अत्यंत सच्चेपणाने या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. * सध्याच्या काळात तंत्र स्पर्धेवर हावी होत आहे असे वाटते का?- तंत्र हा खूप व्यापक विषय आहे. ते केवळ एक साधन आहे. एखाद्या विषयाची मांडणी वेगळ्या पद्धतीने कशी करता येऊ शकते, त्याची पडताळणी करणारी ही एक यंत्रणा आहे. तंत्रामुळे तुमच्या विचारांना दिशाही मिळू शकते, काही प्रसंगांमध्ये त्याचा हुकमी वापरही करता येऊ शकतो. स्पर्धेमध्ये तंत्राचा वापर झालाही; पण आशय हरवला आहे असे वाटले नाही. * एकांकिकांमध्ये प्रयोगमूलकतेला कितपत वाव असतो?- आपल्याला जे मांडायचे आहे ते त्याच पद्धतीने मांडले गेले पाहिजे याचे एक खुले अंगण अशा एकांकिकांमधून मिळते. मला माझे म्हणणे योग्य पद्धतीने पोहोचविता येते का? याची चाचपणीही करता येते. ‘पाझर’ ही मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर सादर झालेली एकांकिका याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. * या स्पर्धांचे समाजातील स्थान काय?- आपले म्हणणे मांडू शकणे, त्याची कदर होणे, नवीन विचारांना प्रवृत्त करणे, हेच या स्पर्धांचे प्रयोजन असते. जुन्याला भिरकावून नवीन विषयांची चाचपणी करणे, आपले विचार परखडपणे प्रस्तुत करणे हाच त्यामागचा हेतू आहे. सतीश आळेकर, विजय तेंडुलकर यांनी अशाच प्रकारे प्रस्थापित साचेबद्ध चौकटी ओलांडून नवीन विषयांची मांडणी केली. * यापुढील टप्प्यात स्पर्धेच्या सादरीकरणाचा प्रवाह कशापद्धतीने खळखळत राहिला पाहिजे असे वाटते?- जगभरात जे नाटक चालले आहे, त्यामधून जे वैचारिक मंथन होत आहे, त्याचे पडसाद या एकांकिकांमध्ये उमटायला हवेत. * महाराष्ट्र कलोपासक या आयोजक संस्थेविषयी काय सांगाल?- ही संस्था अत्यंत तळमळीने इतकी वर्षे कोणतीही अपेक्षा न ठेवता स्पर्धा आयोजित करीत आहे त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. परीक्षकांना चांगले प्रॉडक्ट देऊ शकलो नाही याची खंत पदाधिकाऱ्यांना वाटणे यातच सर्वकाही आले. या स्पर्धेचा दर्जा अधिकाधिक वर जात राहाणार यात शंकाच नाही.