शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

निराधारांन आधार देणारे पतंगराव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:34 IST

सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या सत्त्वपरीक्षा घेणाऱ्या परिस्थितीने मला खूप काही शिकवले. पुण्यात आल्यावर मला ममता या माझ्या मुलीला ...

सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या

सत्त्वपरीक्षा घेणाऱ्या परिस्थितीने मला खूप काही शिकवले. पुण्यात आल्यावर मला ममता या माझ्या मुलीला शिकवायचे होते. माझी आर्थिक ऐपत नव्हती. मुलीने खूपखूप शिकावे असे वाटत होते, पण मला समोर रस्ताच दिसत नव्हता. तो दिवस मला अजूनही स्पष्ट आठवतो. मी पतंगरावांना भेटायला गेले. आज माझे बऱ्यापैकी नाव झाले आहे. समाज मला ‘माई’ म्हणून आदराने स्थान देतो. त्या वेळी मी एवढी लोकांना माहिती नव्हते. प्रसिद्धीचे वलयही माझ्या पाठीमागे नव्हते. त्यामुळे मी पतंगरावांना माहीत असण्याची शक्यताच नव्हती, पण त्यांच्या कानावर माझ्या कामाची माहिती गेलेली होती. मी भीतभीतच त्यांना भेटायला गेले. माझे डोळे पाणावले होते. मी पतंगरावांना माझी अडचण सांगितली. माझी मुलगी वयाने मोठी आहे. सेवासदनमध्ये पुढच्या शिक्षणासाठी तिला ठेवायचे नाही असे ठरवलेले आहे. मला अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घ्यायची आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या मुलीचे पालकत्व कोण स्वीकारेल, याच विचारात मी आहे. आपण माझ्यासाठी काय करू शकता?

पतंगरावांनी माझ्या बोलण्यावर त्यांची खाली असलेली मान वर केली, माझ्याकडे पाहिले. त्यांच्या त्या पाहण्यात मला एक विश्वास दिसला. माझे काम या ठिकाणी नक्की होणार याची खात्री पटली. त्यांनी माझ्या मुलीला भारती विद्यापीठाने मायेचे छत्र दिले.

तिला एम.एस.डब्ल्यू.करण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. तिचा राहण्याच्या, खाण्याच्या खर्चाचा भार भारती विद्यापीठाने उचलला म्हणून मी निश्चिंत मनाने अनेक अनाथांची आई होऊ शकले. नात्यागोत्यातल्या माणसांसाठी मदतीसाठी कुणीही तयार असते, पण ज्यांची कुठेही ओळख नाही, वशिला नाही, पाठराखण करणारे कोणी नाही, शिफारस करणारे कोणी नाही, अशा गरजू माणसांच्या पाठीशी आभाळाएवढे मन असणारा हा माणूस कायम उभा राहत आलेला आहे. हे विद्यापीठ माणुसकीचे मंदिर आहे. म्हणून या विद्यापीठातली माणसे मला खूप भावतात.

माझ्या संस्थेतली ५-१० मुले मुली दरवर्षी भारती विद्यापीठात उच्च-शिक्षण घेतात. त्यांचा संपूर्ण खर्च भारती विद्यापीठाने उचललेला असतो. माझ्या लेकरांवर पोटच्या पोरांप्रमाणे माया करणारे हे विद्यापीठ आहे. सतत जगाचे भले चिंतणाऱ्या या माणसाचा हातातोंडाशी आलेला घास दैवाने हिसकावून नेला. तरूण पोरगा या जगातून गेला. काळजाला चटका लावणारी ही जखम कशानीही भरून येणारी नाही. पतंगराव आणि आमच्या विजयमाला वहिनी यांनी या दुखातूनही वाट शोधली आणि मुलाच्या नावे ‘अभिजित कदम मेमोरियल फौंडेशन’ची स्थापना केली. आपला मुलगा गेला तरी या जगात अशी हजारो मुले आहेत, ज्यांना

मायेच्या पंखाची गरज आहे, अशा मुलांच्या पाठीशी पतंगराव आणि वहिनीसाहेब सातत्याने उभे राहिले आहेत. त्यांना मायेची ऊब दिली आहे. त्यांचे पालकत्व त्यांनी स्वीकारलेले आहे. पतंगराव नावाच्या महात्म्याच्या विजयमालावहिनी हीच खरी ऊर्जा होती. वहिनीसाहेबांनी भारती विद्यापीठाचे मातृत्व त्यांनी स्वीकारले. पतंगरावांच्या जाण्याने या विद्यापीठाचा बापच गेला.