शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

फक्त २१४ विंधनविहिरी यशस्वी

By admin | Updated: June 23, 2016 02:22 IST

पाणीटंचाईच्या काळात दरवर्षी जिल्ह्यात हातपंप घेण्याचा खटाटोप सुरू असतो. या वर्षीही सहा भूवैज्ञानिकांच्या टीमने जिल्हा पिंजून काढला. मात्र, हातपंपासाठी साईटच मिळत नसल्याचे समोर आले आहे.

पुणे : पाणीटंचाईच्या काळात दरवर्षी जिल्ह्यात हातपंप घेण्याचा खटाटोप सुरू असतो. या वर्षीही सहा भूवैज्ञानिकांच्या टीमने जिल्हा पिंजून काढला. मात्र, हातपंपासाठी साईटच मिळत नसल्याचे समोर आले आहे. १२0३ ठिकाणी सर्व्हे करून फक्त २८७ योग्य जागा मिळून २४८ ठिकाणी खोदाई केल्यानंतर त्यात फक्त २१४ यशस्वी झाल्याचे भूवैज्ञानिक किशोर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. टंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील १४0४ ग्रामपंचायतींत गेल्या वर्षीपर्यंत १६ हजार २२७ हातपंप घेतले आहेत. यातील तब्बल १ हजार ९९८ हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. नादुरुस्त हातपंप किती असतील हे सांगता येत नाही. यातील जिल्हा परिषदेशी करार असलेले १३ हजार ७४६ हातपंप आहेत. हे वास्तव असताना टंचाईच्या नावाखाली दरवर्षी २ हजार ते ३ हजार हातपंप घेण्याचा नवा खटाटोप सुरू असतो. या वर्षीही टंचाईची चाहूल लागताच जिल्हा परिषदेने सुमारे ४१ कोटी ९१ लाखांचा टंचाई आराखडा तयार केला. त्यात ११ कोटी ४३ लाख ९५ हजारांचा निधी एकट्या हातपंपासाठी देण्यात आला होता. १० कोटी ३२ लाख ८0 हजार नवीन हातपंपांसाठी तर दुरुस्तीसाठी १ कोटी ११ लाख १५ हजार इतका निधी देण्यात आला होता. यातून २१५४ हातपंप घेण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. खरंच टंचाई संपते का?टंचाई निवारणासाठी या विंधनविहिरी घेतल्या जातात. या वर्षी मे संपला तरी शिरूर तालुक्यात टँकर नव्हता. आता तेथे फक्त ५ टँकर सुरू आहेत. असे असताना शिरूर तालुक्यात सर्वाधिक ४५ विंधनविहिरी घेण्यात आल्या आहेत. म्हणजे जिथे टंचाई जास्त तिथे कमी व जिथे टंचाई कमी तिथे जास्त विहिरी घेतल्या. मग खरंच टंचाई निवारण होते का? हा प्रश्न निर्माण होतो.