शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

फक्त २१४ विंधनविहिरी यशस्वी

By admin | Updated: June 23, 2016 02:22 IST

पाणीटंचाईच्या काळात दरवर्षी जिल्ह्यात हातपंप घेण्याचा खटाटोप सुरू असतो. या वर्षीही सहा भूवैज्ञानिकांच्या टीमने जिल्हा पिंजून काढला. मात्र, हातपंपासाठी साईटच मिळत नसल्याचे समोर आले आहे.

पुणे : पाणीटंचाईच्या काळात दरवर्षी जिल्ह्यात हातपंप घेण्याचा खटाटोप सुरू असतो. या वर्षीही सहा भूवैज्ञानिकांच्या टीमने जिल्हा पिंजून काढला. मात्र, हातपंपासाठी साईटच मिळत नसल्याचे समोर आले आहे. १२0३ ठिकाणी सर्व्हे करून फक्त २८७ योग्य जागा मिळून २४८ ठिकाणी खोदाई केल्यानंतर त्यात फक्त २१४ यशस्वी झाल्याचे भूवैज्ञानिक किशोर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. टंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील १४0४ ग्रामपंचायतींत गेल्या वर्षीपर्यंत १६ हजार २२७ हातपंप घेतले आहेत. यातील तब्बल १ हजार ९९८ हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. नादुरुस्त हातपंप किती असतील हे सांगता येत नाही. यातील जिल्हा परिषदेशी करार असलेले १३ हजार ७४६ हातपंप आहेत. हे वास्तव असताना टंचाईच्या नावाखाली दरवर्षी २ हजार ते ३ हजार हातपंप घेण्याचा नवा खटाटोप सुरू असतो. या वर्षीही टंचाईची चाहूल लागताच जिल्हा परिषदेने सुमारे ४१ कोटी ९१ लाखांचा टंचाई आराखडा तयार केला. त्यात ११ कोटी ४३ लाख ९५ हजारांचा निधी एकट्या हातपंपासाठी देण्यात आला होता. १० कोटी ३२ लाख ८0 हजार नवीन हातपंपांसाठी तर दुरुस्तीसाठी १ कोटी ११ लाख १५ हजार इतका निधी देण्यात आला होता. यातून २१५४ हातपंप घेण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. खरंच टंचाई संपते का?टंचाई निवारणासाठी या विंधनविहिरी घेतल्या जातात. या वर्षी मे संपला तरी शिरूर तालुक्यात टँकर नव्हता. आता तेथे फक्त ५ टँकर सुरू आहेत. असे असताना शिरूर तालुक्यात सर्वाधिक ४५ विंधनविहिरी घेण्यात आल्या आहेत. म्हणजे जिथे टंचाई जास्त तिथे कमी व जिथे टंचाई कमी तिथे जास्त विहिरी घेतल्या. मग खरंच टंचाई निवारण होते का? हा प्रश्न निर्माण होतो.