शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

धरणफुटीचा नव्हे; अतिक्रमणांचा धोका

By admin | Updated: July 12, 2015 01:37 IST

तब्बल ५४ वर्षापूर्वी पानशेत धरण फुटीमुळे शहरात आलेल्या जलप्रलयाने ऐतिहासिक पुण्याचा चेहरामोहरचा बदलून टाकला. या घटनेस आज ५४ वर्षे पूर्ण होताना

पुणे : तब्बल ५४ वर्षापूर्वी पानशेत धरण फुटीमुळे शहरात आलेल्या जलप्रलयाने ऐतिहासिक पुण्याचा चेहरामोहरचा बदलून टाकला. या घटनेस आज ५४ वर्षे पूर्ण होताना, आता पुन्हा शहराला धरण फुटीचा धोका नसला, तरी मुठा नदीत झालेल्या बेसुमार अतिक्रमाणांमुळे शहरावर दरवर्षीच पुराचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे शेकडो कुटूंबे उध्वस्त तर होतच आहेत. शिवाय दरवर्षी लाखो रुपयांच्या नुकसानीबरोबर पर्यावरणाचीही बेसुमार हानी होत आहे. या अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र इतके अरूंद झाले आहे, की १९९७ मध्ये ९० हजार क्युसेक पाणी खडकवासला धरणातून नदीत सोडण्यात आल्यानंतर शहरात पूरस्थिती उद्भवली होती. आता हाच आकडा नदीची वहन क्षमता अतिक्रमणांंमुळे घटली असून गेल्या १८ वर्षात अवघ्या ५० हजार क्युसेकवर पोहचला आहे. मुठा नदीच्या दोन्ही बाजूला शहर वाढत गेले आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूस राजरोसपणे अतिक्रमणे होत असून पालिका प्रशासन तसेच पाटबंधारे विभागाचेही अतिक्रमणांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.वहन क्षमता ४० हजार क्यूसेक्सने घटली पानशेत धरणफुटीनंतर धरणांच्या सुरक्षेबाबत विशेष उपाययोजना केल्या जात असल्याने भविष्यात अशी घटना घटने शक्य नसले तरी, शहरात आता पूर नेहमीचाच होणार असल्याचे चित्र आहे. खडकवासला धरणाची विसर्ग क्षमता 1 लाख 28 हजार क्यूसेक्सची आहे. पानशेत दुर्घटनेनंतर 1997 मध्ये खडकवासला धरणातून सर्वाधिक 90 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी पुन्हा पावसाचे पाणी शहरात घुसले होते. त्यानंतर 2005 मध्ये 60 हजार क्यूसेक्सलाच पूरस्थिती उद्भवली, पुढे 2009 ला 45 हजार क्यूसेक्लाच शहरात अनेक ठिकाणी पाणी घुसले, तर 2011 मध्येही 50 हजार क्यूसेक्सालच अनेक भागात पाणी घुसले होते.नदी बनली अतिक्रमणांचे माहेरघरगेल्या दोन दशकात शहराच्या मध्यातून वाहनारी मुठा नदी अतिक्रमणांच माहेरघर बनली आहे. त्यात बांधकाम व्यावसायिकांसह महापालिका आणि नदीकाठावर असलेल्या ग्रामपंचायतींचाही तितकाच वाट आहे. गेल्या दिड दशकात नदी काठच्या परिसरात बेसुमार बांधकामे झाली असून या बांधकामांसाठी माती आणि राडारोडा टाकून नदीपात्रच गिळंकृत करण्यात आले. या प्रकाराकडे महापालिका प्रशासन तसेच पाटबंधारे विभागानेही सोयीस्कर दूर्लक्ष केले आहे. शहरात अनेक ठिकाणी पूररेषेच्या आत झोपडपटटया तसेच बांधकामे झालेली आहे. अशीच स्थिती नदीकाठच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतही आहे. या ठिकाणी नदीपात्रात तसेच नदीला जोडणाऱ्या नाल्यांमध्ये राडारोडयाचे भराव टाकून इमारती बांधल्या आहेत.पूररेषेचा खेळखंडोबा शहरातून वाहनारी मुठा नदीची पूररेषा कागदावरच असून महापालिकेकडे असलेल्या पूर रेषा आणि पाटबंधारे विभागाकडे असलेल्या पूर रेषा चक्क भिन्न आहेत. या रेषांच्या आधारेच महापालिकेने नदीकाठच्या परिसरात बेसुमार बांधकामांना परवानगी दिली आहे. तर आता या रेषेचे महत्त्व राष्ट्रीय हरीत लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेचे तसेच पाटबंधारे विभागाचे कान टोचल्यानंतर महापालिका आणि पाटबंधारे विभाग पुन्हा जागा झाला असून आता नव्याने पूर रेषा निश्चित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. त्यामुळे नदीची वहन क्षमता मोठया प्रमाणात घटली आहे. परिणामी खडकवासला धरणातून अवघा 45 हजार क्यूसेक्स विसर्गा नंतरही शहरात पाणी घुसते, ही अतिक्रणे तातडीने काढण्याची गरज आहे. अन्यथा शहरला भविष्यात मोठया संकटाचा सामना करावा लागेल. त्यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभागाने वेळीच जागे होण्याची गरज आहे. - सारंग यादवाडकर (पर्यावरणतज्ज्ञ)