शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भोरच्या बाजारावर नोटाबंदीचा परिणाम

By admin | Updated: November 16, 2016 03:04 IST

पाचशे व हजारच्या नोटाबंदचा परिणाम मंगळवारच्या भोरच्या आठवडेबाजारावर दिसून आला. बाजारात ग्राहक कमी झाल्याने बाजारावर

भोर : पाचशे व हजारच्या नोटाबंदचा परिणाम मंगळवारच्या भोरच्या आठवडेबाजारावर दिसून आला. बाजारात ग्राहक कमी झाल्याने बाजारावर ५० टक्के मंदीचे सावट दिसून आले. त्यामुळे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना आपला माल परत घरी घेऊन जावे लागले.भोर शहरात दर मंगळवारी आठवडेबाजार भरतो. या बाजाराला शिरवळ, लोणंद, सासवड, फलटण, महाड व भोर तालुक्यातील विविध गावांतून भाजीपाला, कडधान्य, फळे, कपडे, चप्पल, खाऊ, मासे, बोंबिल अशा विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणारे सुमारे ४०० ते ४५० लहान मोठे व्यापारी येतात.खरेदीसाठी भोर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी खरेदीसाठी येतात. साधारणपणे ८० ते ९० लाखांची उलाढाल दर मंगळवारी या बाजारात होते. यामुळे अनेकांचे संसार चालतात. मात्र, नोटा बदलून मिळत नसल्याने सदरची उलाढाल ५० टक्क्यांवर आली आहे. बाजारात १०, २०, ५०, १०० रु. नोटांचे सुटे पैैसे मिळत नाहीत. त्यामुळे अनेक जण बाजाराला येऊनही त्यांना बाजार न करताच परत जावे लागले. व्यापाऱ्यांचा ६० टक्के माल विकला गेला नाही. पालेभाज्या व इतर बाजार खराब होत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बाजार संपत आला, तरी २० टक्के माल खपला नाही. सदरचा माल पुन्हा गावाला घेऊन जावा लागणार असल्याने जाणे-येण्याचा खर्च व दिवभर बसण्याचा रोजही निघाला नाही, असे पुरंदर तालुक्यातून आलेले फळ व्यापारी इरफान बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.अनेकांना माल उधार दिलेला आहे. आणलेला मालही खपला नाही. त्यामुळे पुन्हा गावाला परत घेऊन जाण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे उधारीवरही माल विकला असल्याचे सासवडचे भाजी व्यापारी विजय ढेरे, हर्णसचे विलास भिकाजी हिरगुडे यांनी सांगितले. बँकेतही सुटे मिळत नसल्याने दर मंगळवारी भाजीपाला इतर बाजार खरेदी करण्यासाठी पैसे आणायचे कुठून, असे गृहिणी वर्षा शिंदे व सुशीला खुटवड यांनी सांगितले. (वार्ताहर)